शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

Hathras Stampede : योगी आदित्यनाथांनी दिला हाथरस चेंगराचेंगरीचा ग्राउंड रिपोर्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 15:47 IST

Hathras Stampede : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे मंगळवारी २ जून रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माहिती दिली आहे.

हाथरस : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे मंगळवारी २ जून रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला. याठिकाणी भोले बाबांच्या सत्संगाला अनेक राज्यांतून महिला आणि पुरुषांनी हजेरी लावली होती. यादरम्यान अचानक चेंगराचेंगरी झाली, त्यात लहान मुलांसह १२१ जणांना जीव गमवावा लागला. 

या घटनेसंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माहिती दिली आहे. या घटनेला जो कोणी जबाबदार असेल, त्याला कठोर शिक्षा केली जाईल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.  या दुर्दैवी घटनेचे मुख्य कारण स्पष्ट करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, भोले बाबांच्या सत्संगात त्यांना स्पर्श करण्याच्या शर्यतीत भक्तांमध्ये चेंगराचेंगरी झाली. 

कथावाचक मंचावरून खाली उतरत असताना महिलांचा एक गट त्यांना हात लावण्यासाठी पुढे गेला आणि त्याचवेळी ही घटना घडली. घटनास्थळी सेवा कर्मचारीही उपस्थित होते, त्यांच्याशी बाचाबाची झाली. मात्र, या घटनेतील व्यक्तींचा मृत्यू होण्यापूर्वीच सेवा कर्मचारीही तेथून निघून गेले, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

याचबरोबर, मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, केंद्र आणि राज्य सरकार मृत्युमुखी पडलेल्यांना ४ लाख रुपये आणि गंभीर जखमींना १ लाख रुपयांची मदत करणार आहे. तसेच, यापेक्षा मोठे कार्यक्रम आम्ही आयोजित केले असून अशी घटना घडली नाही, असे सांगत आम्ही कुंभसारख्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. 

३ मंत्री कालपासून तिथे तळ ठोकून आहेत - योगी आदित्यनाथमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, "मी घटनास्थळी भेट दिली आणि अपघाताच्या कारणांची प्राथमिक व्यवस्था पाहिली आणि आमचे ३ मंत्री कालपासून तिथे तळ ठोकून आहेत. मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक देखील उपस्थित आहेत. कालच वरिष्ठ पोलीस आणि प्रशासन अधिकारी तिथे उपस्थित असून या संपूर्ण घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असून प्राथमिक तपासानंतर पुढील कारवाई करू." 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथAccidentअपघात