शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 09:27 IST

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी लखनौ येथील लोकभवन सभागृहात महिलांची सुरक्षा, सन्मान आणि स्वावलंबनासाठी समर्पित 'मिशन शक्ती ५.०' या महत्त्वाकांक्षी अभियानाचा भव्य शुभारंभ केला.

पूर्वी मुली सुरक्षित नव्हत्या, पण आज त्या स्वतःच आपला मार्ग तयार करत आहेत, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. महिलांची सुरक्षा, सन्मान आणि आत्मनिर्भरता यासाठी समर्पित 'मिशन शक्ती ५.०' या महत्त्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. २०१७नंतर राज्यात महिलांच्या स्थितीत मोठे बदल झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

काय आहे 'मिशन शक्ती ५.०'?

'मिशन शक्ती'च्या पाचव्या टप्प्याचा शुभारंभ करताना मुख्यमंत्री म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी हे अभियान सुरू झाले तेव्हा अनेक शंका होत्या, पण आज त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. या अभियानाने महिलांना सुरक्षा, सन्मान आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला आहे.

यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील सर्व १६४७ पोलीस ठाण्यांमध्ये नव्याने स्थापन झालेल्या ‘मिशन शक्ती केंद्रां’चे उद्घाटन केले. महिला सुरक्षेशी संबंधित सर्व हेल्पलाईन (१०९०, १८१, ११२, १९३०, १०७६, १०२, १०१, १०८, १०९८) तसेच 'सशक्त नारी, समृद्ध प्रदेश'चेही प्रकाशन करण्यात आले.

महिला पोलिसांची संख्या १० हजारांवरून ४४ हजार पार!मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश पोलिसांमधील महिलांच्या सहभागातील क्रांतीकारी बदलावर भर दिला. २०१७पर्यंत पोलिसांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या केवळ १०,००० होती, जी आज ४४,०००पेक्षा जास्त झाली आहे. प्रत्येक भरतीमध्ये २०% महिलांचा सहभाग अनिवार्य करण्यात आला आहे.

अलीकडेच झालेल्या ६०,२०० पोलीस भरतीमध्ये १२ हजारांहून अधिक महिलांचा समावेश आहे. २०१७ पूर्वी पोलिसांना प्रशिक्षण देण्याची क्षमता केवळ ३००० होती, जी आता वाढवून ६०,०००हून अधिक करण्यात आली आहे.

सरकारची नियत स्वच्छ असेल, तर योजना स्वतःच मार्ग काढतात!सीएम योगी यांनी सांगितले की, केवळ पोलीसच नाही, तर शिक्षण आणि इतर विभागांमध्येही महिलांचा सहभाग वाढला आहे. ‘रोजगार मिशन’ सातत्याने सुरू आहे. २०१७पूर्वी महिलांच्या योजनांमध्ये घोटाळे होत होते. पोषण आहार मिशन आणि नोकऱ्यांमधील गैरव्यवहार ही त्याची उदाहरणे आहेत.आता पोषाहार मिशनमध्ये ६०,००० महिला काम करत आहेत आणि महिन्याला ८००० रुपये कमावत आहेत. 

कोरोना काळात सुरू झालेल्या बँकिंग कॉरेस्पॉन्डेंस सखी योजनेतून ४०,००० हून अधिक महिला हजारो कोटी रुपयांचे व्यवहार करत आहेत. मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजनेअंतर्गत २६ लाखांहून अधिक मुलींना जन्मापासून पदवीपर्यंत २५,००० रुपयांची मदत मिळत आहे. मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेत आता गरजू मुलींना १ लाख रुपयांची मदत मिळत आहे.

गुन्हेगार आता माफी मागतात!महिला सुरक्षेवर बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बरेली येथील घटनेचा उल्लेख केला. “बाहेरील गुन्हेगाराने महिला सुरक्षेत खोडा घालण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांच्या कारवाईनंतर तो म्हणाला, 'मी चुकून उत्तर प्रदेशात आलो, यापुढे अशी चूक करणार नाही'.” १ जानेवारी २०२४ पासून ९५१३ प्रकरणांमध्ये १२,२७१ गुन्हेगारांना शिक्षा देण्यात आली असून, त्यात १२ जणांना फाशीची शिक्षा, तर ९८७ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक, महिला कल्याण मंत्री बेबीराणी मौर्य यांच्यासह अनेक अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश