शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
2
Post Office ची जबरदस्त स्कीम, एकदा पैसे गुंतवा; नंतर व्याजाद्वारेच होईल ५ लाखांची कमाई, जाणून घ्या
3
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
4
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
5
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
6
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
7
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
8
IndiGo: विमानाला १२ तास विलंब, मदन लाल इंडिगोवर भडकले, विमानतळाला 'फिश मार्केट' म्हणाले!
9
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
10
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, पत्नीचं मराठी कलाविश्वाशी आहे खास कनेक्शन
12
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
13
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
14
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
15
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
16
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
17
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
18
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
19
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
20
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 12:50 IST

देशाचे सुपुत्र, अंतराळवीर आणि ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या सत्कार कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संवाद साधला.

चार दशकांनंतर एका भारतीयाला अंतराळ प्रवास करण्याची संधी मिळाली. लखनौमध्ये जन्मलेले शुभांशू शुक्ला यांना ही संधी मिळाली. यशस्वी प्रवासानंतर ते पहिल्यांदाच लखनौला आले. त्यांचा अंतराळ प्रवास आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. प्रत्येक भारतीय त्यांच्या अंतराळ प्रवासाकडे मोठ्या आशेने पाहत होता. देशाचे सुपुत्र, अंतराळवीर आणि ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या सत्कार कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संवाद साधला. 

ब्रजेश पाठक यांनी शुभांशू शुक्ला यांच्या आई आशा शुक्ला यांचा, केशव प्रसाद मौर्य यांनी वडील शंभू दयाल शुक्ला यांचा आणि महापौर सुषमा खरकवाल यांनी कामना शुक्ला यांचा सन्मान केला. तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केलं. याच दरम्यान माहिती आणि जनसंपर्क विभागाकडून शुभांशू यांच्या अंतराळ प्रवासावर आधारित एक लघुपट देखील दाखवण्यात आला.

शिष्यवृत्तीची केली घोषणा

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाला अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या अनुभवाचा वापर विभागात करण्यास सांगितलं. याशिवाय योगींनी स्पेस टेक्नॉलॉजी क्षेत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुभांशू शुक्ला यांच्या नावाने शिष्यवृत्तीची मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री म्हणाले की, "३ ते ४ वर्षांपूर्वी राज्यातील कोणत्याही विद्यापीठात किंवा संस्थेत स्पेस टेक्नॉलॉजीबाबत कोणताही अभ्यासक्रम नव्हता, पदवी नव्हती. सध्या राज्यातील अनेक टेक्निकल इन्स्टीट्यूशनमध्ये स्पेस टेक्नोलॉजीचे कोर्सेस आहेत."  

२०४७ पर्यंत देशाला विकसित भारत बनवण्याचं लक्ष्य

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत देशाला विकसित भारत बनवण्याचं लक्ष्य दिलं आहे. हे प्रत्यक्षात आणण्यासाठी, आपल्याला विकासाच्या त्या सर्व क्षेत्रांसाठी आपले दरवाजे उघडे ठेवावे लागतील जिथे प्रगतीची शक्यता आहे. शुभांशू शुक्ला यांचे वडील राज्य सरकारच्या सचिवालय प्रशासनात अधिकारी होते. त्यांच्या गौरवशाली मार्गावर चालणाऱ्या त्यांच्या मुलाचा केवळ उत्तर प्रदेशलाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान वाटत आहे. १८ दिवसांच्या अंतराळ प्रवासात त्यांनी ३२० वेळा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घातली. यावरून त्यांच्या प्रवासाचे महत्त्व आणि उद्देश स्पष्ट होतो." 

१८ दिवसांत संपूर्ण पृथ्वीचा प्रवास 

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांच्याशी अंतराळ प्रवासाबाबत चर्चा झाली, ज्यामध्ये ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचा प्रवास, अंतराळ मोहीम आणि भविष्यातील प्रयोगांवर चर्चा झाली. शुक्ला यांनी १८ दिवसांत संपूर्ण पृथ्वीचा प्रवास केला, जो कोणत्याही सामान्य नागरिकासाठी एक अविश्वसनीय अनुभव आहे. त्यांचा अनुभव भविष्यात उत्तर प्रदेश आणि देशातील तरुणांसाठी प्रेरणास्रोत बनेल. या प्रवासातून त्यांनी केवळ अंतराळात आपला ठसा उमटवला नाही तर नैसर्गिक आपत्ती, हवामान बदल, पूर, दुष्काळ आणि कृषी संकटांना तोंड देण्यासाठी एक नवीन दिशा दाखवली. 

शरीरात होतात अनेक बदल 

शुभांशू शुक्ला यांनी अंतराळात घालवलेले काही क्षण शेअर केले. त्यांनी सांगितलं की, "जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच अंतराळ स्थानकावर पोहोचता तेव्हा तुमचं शरीर पहिल्यांदाच मायक्रोग्रॅव्हिटीचा अनुभव शेअर करतं. तुमच्या शरीरात अनेक बदल होतात. तुमच्या शरीरातील सर्व रक्त डोक्यात येतं, ज्यामुळे तुमचं डोकं मोठं होतं. तुमचं हृदय मंदावतं. तुमच्या पोटात जे काही आहे ते देखील तरंगू लागतं. तुमच्या आत काय चाललं आहे ते तुम्हाला समजत नाही. तुम्हाला भूक लागत नाही. अनेक आव्हानं आहेत. भारत या दिशेने प्रवास करत आहे. मागे बसलेल्या मुलांना माझा मेसज आहे की २०४० पर्यंत तुमच्यापैकी एक जण नक्कीच चंद्रावर जाईल. मीही या स्पर्धेत त्यांच्यासोबत असेन."

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथisroइस्रो