शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेत अखिलेश यादव सहभागी होणार का? सपा नेत्यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 13:18 IST

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून चर्चा सुरू आहे.

देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमिवर विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची सुरू केली आहे. इंडिया आघाडीत जागावाटपावरुन चर्चा सुरू आहेत, तर दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी न्याय याऱत्रा सुरू केली आहे. ही यात्रा आता उत्तर प्रदेशमधून जाणार आहे, या यात्रेत सपा चे नेते अखिलेश यादव सहभागी होणार का अशा चर्चा सुरू आहेत. 

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून वाद सुरू आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार की नाही या चर्चेवर आता खुद्द अखिलेश यादव यांनीच उत्तर दिले आहे. जागावाटपाबाबत निर्णय झाल्यावरच भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अरविंद केजरीवाल आजही ईडीसमोर हजर होणार नाहीत; आपनं सांगितलं कारण...

भारत जोडो न्याय यात्रेबाबत अखिलेश यादव म्हणाले की, काँग्रेससोबत अजूनही चर्चा सुरू आहे. अनेक याद्या तिथून आल्या आणि गेल्याही. ज्या क्षणी जागांचे वाटप होईल, तेव्हाच समाजवादी पक्ष भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होईल.

सध्या काँग्रेसची भारत जोडो यात्रा उत्तर प्रदेशमध्ये असून ती आज अमेठीत पोहोचणार आहे. पक्षाने अखिलेश यादव यांना यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण पाठवले आहे. नुकतेच अखिलेश यादव यांनी यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले नसल्याचे सांगितले होते, त्यानंतर काँग्रेसने निमंत्रण पाठवले होते. अखिलेश या यात्रेत नक्कीच सहभागी होतील, अशी आशा काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, उद्या अखिलेश यादवही भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होतील अशी आशा आहे.

सपा आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. समाजवादी पक्ष १७ जागा देण्यास तयार आहे. या जागांची यादी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनाही पाठवण्यात आली आहे, मात्र काँग्रेसने मुरादाबाद विभागात दोन जागांची मागणी केली आहे. काँग्रेस पक्षालाही मुरादाबाद लोकसभेची जागा हवी आहे. गेल्या निवडणुकीत समाजवादी पक्षाने ही जागा जिंकली होती. समाजवादी पक्ष कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडण्यास तयार नाही.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवRahul Gandhiराहुल गांधी