शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 06:11 IST

गोरखपूरमध्ये २४ तासांत १५३ मिमी पाऊस झाला आहे. ९५ वर्षांत असे प्रथमच घडले आहे.

राजेंद्र कुमार/एस.पी. सिन्हालोकमत न्यूज नेटवर्कलखनौ/पाटणा: उत्तर प्रदेशात गत पाच दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे ११ जिल्ह्यांना पुराने वेढले आहे. गत पाच दिवसांत ३० जिल्ह्यांत घरे कोसळून आणि विजा पडून २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर नेपाळमधील पावसामुळे रविवारी पहाटे पाच वाजता कोसी, वीरपूरमधून ६,६१,२९५ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. ते ५६ वर्षांतील सर्वाधिक आहे. त्यामुळे बिहार राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.

गोरखपूरमध्ये २४ तासांत १५३ मिमी पाऊस झाला आहे. ९५ वर्षांत असे प्रथमच घडले आहे. यापूर्वी १९३० मध्ये २४ तासांत असा मोठा पाऊस झाला होता. उत्तर प्रदेशात हजारो एकरवरील पिके नष्ट झाली आहेत. पावसामुळे अवध भागाला सर्वाधिक फटका बसला आहे. अवधच्या आंबेडकरनगरमध्ये भिंत कोसळून दोन वृद्धांसह चार लोकांचा मृत्यू झाला आहे. सुल्तानपूरमध्ये घर कोसळून व वीज पडून दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. लखनौमध्ये गोमती नदीची पाणीपातळी वाढली आहे, तर श्रावस्ती आणि राप्ती या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी पूरस्थितीची माहिती घेतली आणि मदतकार्याच्या सूचना दिल्या. नेपाळमधील मुसळधारेमुळे कुसुमा नदी दुथडी वाहत आहे. ते पाणी राप्तीमध्ये सोडले जात आहे. सिद्धार्थनगर, कुशीनगर, महराजगंजमध्ये अनेक गावांत पाणी शिरले आहे. सोनौलीहून काठमांडू आणि पोखरा येथे जाणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत. 

नेपाळच्या पावसामुळे बिहारमध्ये नद्यांचे रौद्र रूपnनेपाळ आणि सीमावर्ती राज्यात सातत्याने होत असलेल्या जोरदार पावसामुळे बिहारमध्ये पूरस्थिती आहे. नद्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने २० जिल्ह्यांत पुराचा अलर्ट जारी केला आहे. nहवामान विभागाने आठ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. १३ जिल्ह्यांत पूरस्थिती आहे. १४० गावांमध्ये पाणी शिरले आहे. १.४१ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. कोसी नदीचे पाणी ज्या प्रमाणात वाढत आहे त्यावरून पूरस्थिती बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :floodपूर