शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
2
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
3
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
6
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
7
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
8
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
9
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
10
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
11
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
12
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
13
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
14
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
15
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
16
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
17
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
18
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
19
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
20
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : जमावबंदी म्हणजे काय? ती का लावतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 20:13 IST

आता आपण घरात बसणं हेच कोरोना शत्रूला हरवण्याचं सगळ्यात मोठं शस्र आहे.

ठळक मुद्देही जमावबंदी आपल्या भल्यासाठी आहे हे लक्षात ठेवा.

माणसांच्या जिवाला किंवा आरोग्याला काही कारणाने धोका असेल तर माणसांना एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी जमावबंदी लागू केली जाते. जी आपल्या महाराष्ट्रात सुरुवातीला लागू केली गेली होती. त्यानंतर येते ती संचारबंदी. सध्या आपल्या देशात सर्वत्र लॉकडाउन आहे. पण आधी जमावबंदी म्हणजे काय? जमावबंदीत 5 पेक्षा जास्त लोकांनी जमावबंदी लागलेल्या भागात एकत्र यायला परवानगी नसते. कोरोना विषाणू स्पर्शातून, शिंक, थुंकी यांच्यातून पसरत असल्याने माणसांमध्ये या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी माणसांनी एकत्र येण्यावर किंवा जमण्यावर बंदी घातली गेलेली आहे. जेणोकरून कोरोना विषाणू आपल्याकडे पसरू नये. जमावबंदीचा आदेश जिल्हाधिकारी देतात. तो सगळ्यांनी पाळायचा असतो.

जमावबंदीच्या काळात गरजेच्या सेवा जसं की औषधाची दुकानं, भाजीपाला, दूध, रुग्णालये, बँका चालू असतात बाकी सगळं बंद असतं. आता आपल्याकडे वाहतूक व्यवस्थाही बंद केलेली आहे. म्हणजे तुम्हाला कुठे गावाला जाता येणार नाही. कारण एके ठिकाणहून दुसरीकडे जाताना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता असते. एखादा कोरोना झालेला व्यक्ती दुस:या गावाला गेला अंडी तिथल्या लोकांच्या संपर्कात आला तर त्यांनाही कोरोना होण्याची भीती असते. असं होऊ नये म्हणून वाहतूक व्यवस्था म्हणजे ट्रेन्स आणि बससेवा बंद केलेली आहे. ही जमावबंदी आपल्या भल्यासाठी आहे हे लक्षात ठेवा. आणि मित्रमैत्रिणींकडे खेळायला जाण्याचा किंवा बिल्डिंगखाली सगळ्यांना जमवून खेळण्याचा हट्ट करू नका. आता आपण घरात बसणं हेच कोरोना शत्रूला हरवण्याचं सगळ्यात मोठं शस्र आहे.