शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
2
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ'वर तोडगा काढण्यासाठी भारत अन् युरोपियन युनियन एकत्र! 'एफटीए'सह अनेक मुद्द्यांवर विशेष प्लान बनवला
4
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
5
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
6
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
7
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
8
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
9
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
10
किम जोंग-पुतीन भेटीत ग्लास, ठशांचं रहस्य! ‘सीक्रेट’ कायम सीक्रेटच राहू द्यावं
11
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
12
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
13
विशेष लेख: राम आणि कृष्णकथेच्या हृदयातले अमृत!
14
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
15
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
16
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
17
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
18
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
19
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
20
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...

coronavirus : जमावबंदी म्हणजे काय? ती का लावतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 20:13 IST

आता आपण घरात बसणं हेच कोरोना शत्रूला हरवण्याचं सगळ्यात मोठं शस्र आहे.

ठळक मुद्देही जमावबंदी आपल्या भल्यासाठी आहे हे लक्षात ठेवा.

माणसांच्या जिवाला किंवा आरोग्याला काही कारणाने धोका असेल तर माणसांना एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी जमावबंदी लागू केली जाते. जी आपल्या महाराष्ट्रात सुरुवातीला लागू केली गेली होती. त्यानंतर येते ती संचारबंदी. सध्या आपल्या देशात सर्वत्र लॉकडाउन आहे. पण आधी जमावबंदी म्हणजे काय? जमावबंदीत 5 पेक्षा जास्त लोकांनी जमावबंदी लागलेल्या भागात एकत्र यायला परवानगी नसते. कोरोना विषाणू स्पर्शातून, शिंक, थुंकी यांच्यातून पसरत असल्याने माणसांमध्ये या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी माणसांनी एकत्र येण्यावर किंवा जमण्यावर बंदी घातली गेलेली आहे. जेणोकरून कोरोना विषाणू आपल्याकडे पसरू नये. जमावबंदीचा आदेश जिल्हाधिकारी देतात. तो सगळ्यांनी पाळायचा असतो.

जमावबंदीच्या काळात गरजेच्या सेवा जसं की औषधाची दुकानं, भाजीपाला, दूध, रुग्णालये, बँका चालू असतात बाकी सगळं बंद असतं. आता आपल्याकडे वाहतूक व्यवस्थाही बंद केलेली आहे. म्हणजे तुम्हाला कुठे गावाला जाता येणार नाही. कारण एके ठिकाणहून दुसरीकडे जाताना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता असते. एखादा कोरोना झालेला व्यक्ती दुस:या गावाला गेला अंडी तिथल्या लोकांच्या संपर्कात आला तर त्यांनाही कोरोना होण्याची भीती असते. असं होऊ नये म्हणून वाहतूक व्यवस्था म्हणजे ट्रेन्स आणि बससेवा बंद केलेली आहे. ही जमावबंदी आपल्या भल्यासाठी आहे हे लक्षात ठेवा. आणि मित्रमैत्रिणींकडे खेळायला जाण्याचा किंवा बिल्डिंगखाली सगळ्यांना जमवून खेळण्याचा हट्ट करू नका. आता आपण घरात बसणं हेच कोरोना शत्रूला हरवण्याचं सगळ्यात मोठं शस्र आहे.