शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

असा आहे निसर्गरम्य अरुणाचल प्रदेश; उगवत्या सूर्याच्या राज्यात जाणं आता झालं सोपं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 14:58 IST

भारतातील उगवत्या सूर्याचं राज्य म्हणून ओळखलं जाणारं अरुणाचल प्रदेश आपल्या निसर्गसौंदर्यासाठी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. लवकरच अरूणाचल प्रदेशमध्ये आणखी एक विमानतळ तयार होणार आहे.

भारतातील उगवत्या सूर्याचं राज्य म्हणून ओळखलं जाणारं अरुणाचल प्रदेश आपल्या निसर्गसौंदर्यासाठी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. लवकरच अरूणाचल प्रदेशमध्ये आणखी एक विमानतळ तयार होणार आहे. या नव्या विमानतळामुळे उत्तर भारतातील पर्यटनामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या एअरपोर्टचं नाव होलोंगी असणार आहे. काही दिवसांपूर्वीच शासनाने या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे विमानतळ अरुणाचल प्रेदशची राजधानी ईटानगरमध्ये तयार करण्यात येणार आहे. 

इटानगरपासून हे विमानतळ जवळपास 25 किलोमीटर अंतरावर आहे. ज्याचा रनवे जवळपास 2200 मीटर असणार आहे. असं म्हटलं जात आहे की, हे एअरपोर्ट सुरू झाल्यानंतर येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार आहे. देशाच्या इतर राज्यांसोबतच विदेशी पर्यटक अगदी सहज अरूणाचल प्रदेशलाही पोहचू शकतात. 

ईटानगरमधील टूरिस्ट स्पॉट

जर तुम्ही उत्तर भारतातील राज्यांचे सौंदर्य अनुभवण्यासाठी आतुर असाल तर तुम्हाला अरूणचल प्रदेशमधील काही ठिकाणांबाबत माहीत असणं आवश्यक आहे. तसं पाहायला गेलं तर अरूणाचलची राजधानी ईटानगरमध्येच फिरण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत.

तुम्ही ईटानगरला फिरण्यासाठी जाण्याचा विचार करत असाल तर गोंपा मंदिर, ईटा फोर्ट, गंगा झील, रूपा, ईटानगर वन्यजीव अभयारण्य आणि नामधापा नॅशनल पार्कमध्ये नक्की जा. 

ईटा फोर्ट 

ईटा फोर्ट ईटानगरच्या मध्यावर वसलेला आहे. या किल्ल्याच्या नावावरूनच या शहराचे नाव ईटानगर ठेवण्यात आले आहे. या किल्यामध्ये या शहराचा इतिहासही दडलेला आहे. साधारणतः 14व्या किंवा 15व्या शतकामध्ये हा किल्ला तयार करण्यात आला असून त्यासाठी सामान्य विटांपेक्षआ मोठ्या विटांचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे या किल्लाचे नाव ईटा फोर्ट असं ठेवण्यात आलं आणि या किल्लामुळे शहराचं नाव ठेवण्यात आलं. असं म्हटलं जातं की, किल्ला तयार करण्यासाठी 80 लाखांपेक्षा अधिक विटांचा वापर करण्यात आला होता. 

गंगा झील 

अरुणाचल प्रदेशमध्ये असलेल्या प्रमुख पर्यटन स्थळांमध्ये गंगा झीलचाही समावेश होतो. या शहरातील स्थानिक भाषेमध्ये या तलावाला गेकर सिन्यी असं म्हटलं जातं. हा तलाव शहरापासून जवळपास 6 किलोमीटर अंतरावर आहे. खास गोष्ट म्हणजे, ऋतू कोणताही असो येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या कधीच कमी होत नाही. या तलावाच्या चारही बाजूंना घनदाट जंगल आहे. त्यामुळे या तलावाच्या सौंदर्यात आणखी भर पडते. या तलाबाबत अनेक पौराणिक कथाही सांगितल्या जातात. 

रूपा

रूपा अरूणाचल प्रदेशमधील छोटंसं पण आकर्षक हिल स्टेशन आहे. हे हिल स्टेशन तेंगा नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या हिम श्रृंखलेवर स्थित आहे. येथील विंहगमय दृश्य आणि या हिल स्टेशनचं सौंदर्य येथे येणाऱ्या पर्यटकांचं मन अगदी तृप्त करतात. 

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेशTravel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन