शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ्यात केवळ पाच हजारात 'या' तीन ठिकाणांवर फिरण्याचा घेऊ शकता आनंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 14:41 IST

हिवाळ्याला सुरूवात होताच अनेकजण फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करत असतात. पण नेमकं कुठे जायचं? फिरायला किती खर्च येणार? कमी बजेटमध्ये सगळं झालं पाहिजे, हे सगळं बघावं लागतं.

हिवाळ्याला सुरूवात होताच अनेकजण फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करत असतात. पण नेमकं कुठे जायचं? फिरायला किती खर्च येणार? कमी बजेटमध्ये सगळं झालं पाहिजे, हे सगळं बघावं लागतं. तुम्हीही असाच फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल आणि तुम्हाला कमी बजेटमध्ये फिरायचं असेल तर आम्ही तुमच्यासाठी तीन ठिकाणांचे पर्याय घेऊन आलो आहोत. या तीनपैकी एका ठिकाणावर फिरण्यासाठी तुम्हाला केवळ ५ हजार रूपये खर्च करावे लागतील.

मंदारमणि

(Image Credit : mouthshut.com)

हे ते ठिकाण आहे, जिथे गंगा नदी बंगालच्या खाडीत जाऊन सामावते. पवित्र आणि प्राचीन मानल्या जाणाऱ्या या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा सगळा स्ट्रेस विसरून जाल. हा एक आकर्षक बीच असून इथे जास्त गर्दी गेखील नसते. जर तुम्ही दिल्लीहून इथे गेलात तर ६०० रूपयात रेल्वने कोलकाताला पोहोचू शकता. कोलकाताहून तुम्ही मंदारमणिला पोहोचू शकता. यासाठी तुम्हाला केवळ १४० रूपये लागतील. तसेच मंदारमणिमध्ये हॉटेल आणि रिसॉर्ट आहेत. इथे एका व्यक्तीच्या राहण्यासाठी ६०० रूपये भाडं लागेल. इथे फिरण्याचा सर्वात चांगला कालावधी नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान असतो. 

मुक्तेश्वर

(Image Credit : nativeplanet.com)

तुम्हाला जर अ‍ॅडव्हेंचरची आवड असेल तर तुम्ही ऑफबीट डेस्टिनेशन असलेल्या मुक्तेश्वरला भेट देऊ शकता. रॉक-क्लायम्बिंग, कॅम्पिंग, पॅराग्लायडिंग आणि अशा अनेक गोष्टी तुम्ही इथे करू शकता. इथे पोहोचण्याचा सर्वात चांगला आणि स्वस्त मार्ग दिल्ली ते काठगोदामपर्यंत रेल्वे आणि पुढे मुक्तेश्वरसाठी बस.

रेल्वे आणि बससाठी तुम्हा एकूण ७०० ते १५०० रूपये खर्च येईल. तर इथे राहण्यासाठी एका व्यक्तीचं एका रात्रीचं भाडं ५०० रूपये असेल. इथे राहण्यासाठी हॉस्टेलही आहेत. इथे फिरायला जाण्याचा सर्वात चांगला कालावधी हा ऑक्टोबर ते डिसेंबर मानला जातो. 

दमण आणि दीव

(Image Credit : lohanatoursindia.com)

गुजरातमधील लोकांना वीकेंडसाठी सर्वात बेस्ट ठिकाण दमण आणि दीव मानलं जातं. सुंदर बीच आणि सुंदर नजारे एका चांगल्या ट्रिपसाठी अजून काय हवंय? मुंबईतून जाणार असाल तर तुम्ही रेल्वेने फार कमी खर्चात इथे पोहोचू शकता. इथे फिरायला जाण्याचा सर्वात चांगला कालावधी ऑक्टोबर ते मार्च हा मानला जातो.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन