शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

समुद्राच्या मधोमध बांधला आहे हा पांबन पूल, घ्या रोमांचक प्रवासाचा अनुभव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 11:40 IST

तसं तर या पुलाला भारतातील सर्वात धोकादायक पूल मानलं जातं पण या पुलावरुन प्रवास केल्यास हा प्रवास आयुष्यभरासाठी तुमच्या स्मरणात राहील. 

सकाळची वेळ, तुमच्या दोन्ही बाजूंनी समुद्राच्या खवळणाऱ्या लाटा, वेगवान हवा आणि 30 च्या स्पीडने चालणारी तुमची ट्रेन. असा रोमांचक प्रवास कदाचितच कुणी केला असेल. पण मन्नार ते रामेश्वरम दरम्यान लागणारा हा पांबन पूलवरील प्रवास कोणत्याही अॅडव्हेंचरपेक्षा कमी नाहीये. तसं तर या पुलाला भारतातील सर्वात धोकादायक पूल मानलं जातं पण या पुलावरुन प्रवास केल्यास हा प्रवास आयुष्यभरासाठी तुमच्या स्मरणात राहील. 

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक रामेश्वरम

पांबन पूल हा भारताच्या तमिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम जिल्ह्यामधील एक सागरी रेल्वे पूल आहे. मन्नारचे आखात व पाल्कची सामुद्रधुनी ह्या हिंदी महासागराच्या उपसमुद्रावर बांधला गेलेला ६,७७६ फूट लांबीचा हा पूल रामेश्वरम द्वीपाला मुख्य भारतीय भूमीसोबत जोडतो. 

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले रामेश्वरम गावामध्ये फक्त ह्या पुलाद्वारेच प्रवेश शक्य आहे. वास्तविकपणे येथे रेल्वेवाहतूकीसाठी एक व मोटार वाहतूकीसाठी एक असे दोन वेगळे पूल अस्तित्वात असून दोन्ही पुलांना एकत्रितपणे पांबन पूल असेच म्हटले जाते.

भारतातील पहिला सर्वात मोठा सागरी पूल

२४ फेब्रुवारी १९१४ मध्ये वाहतुकीस खुला केला गेलेला पांबन रेल्वे पूल भारतामधील सर्वात पहिला सागरी पूल आहे व मुंबईमधील वांद्रे-वरळी सागरी महामार्ग बांधून पूर्ण होण्याअगोदर देशातील सर्वात लांब सागरी पूल होता. ह्या जुन्या पुलाच्या शेजारी १९८८ साली मोटार वाहतूक पूल बांधला गेला जो रेल्वे पूलाला पूर्णपणे समांतर धावतो.

100 वर्ष जुना पूल

पांबन पुलांचं बांधकाम ब्रिटीश रेल्वेने 1885 मध्ये सुरु केले होते. तर 1914 मध्ये या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. म्हणजे हा पूल आता 100 वर्षांपेक्षा जास्त जूना झाला आहे. पण अजूनही या पुलाचं बांधकाम मजबूत आहे. 

का सुरु केला होता हा पूल?

१९१४ ते १९६४ सालापर्यंत चेन्नईच्या इग्मोर स्थानकापासून रामेश्वरम बेटाच्या धनुषकोडी ह्या गावापर्यंत मीटर गेज रेल्वे धावत असे. १९६४ सालच्या एका प्रलयंकारी चक्रीवादळामध्ये धनुषकोडी गाव पूर्णपणे नष्ट झाल्यानंतर रेल्वेसेवा रामेश्वरमपर्यंतच चालवण्यात येते.  

टॅग्स :Travelप्रवासChennaiचेन्नई