शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

'या' किल्ल्यात झाली होती ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ची शूटिंग, किल्ल्याहून दिसतो पाकिस्तान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 13:30 IST

सध्या ऐतिहासिक सिनेमांची चांगलीच क्रेझ वाढत आहे. 'बाजीराव-मस्तानी', 'पद्मावत', मणिकर्णिका', 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हे सिनेमे त्यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे चर्चेत होते.  

सध्या ऐतिहासिक सिनेमांची चांगलीच क्रेझ वाढत आहे. 'बाजीराव-मस्तानी', 'पद्मावत', मणिकर्णिका', 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हे सिनेमे त्यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे चर्चेत होते. 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालला नसला तरी यातील लोकेशनची चांगलीच चर्चा झाली. या सिनेमाचं शूटिंग राजस्थानमधील भव्य मेहरानगढ या किल्ल्यात झालं. त्यामुळे या किल्ल्याबद्दलची उत्सुकता आणखीन वाढली आहे. चला जाणून घेऊ या किल्ल्याची खासियत..

या किल्ल्याच्या भींती १० किलोमीटरपर्यंत पसरलेल्या आहेत. यांची उंची २० फूट ते १२० फूट तर रुंदी १२ फूट ते ७० फूट इतकी आहे. या किल्ल्यातील रस्ते वळणादार असल्याने वेगळाच आनंद मिळतो. तसेच या किल्ल्याला चार दरवाजे आहेत. या किल्ल्याच्या आत अनेक भव्य महाल असून त्यावर सुंदर नक्षीकाम करण्यात आलं आहे. 

जोधपूरचे शासक राव जोधा यांनी १२ मे १४५९ मध्ये किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं होतं. आणि महाराज जसवंत सिंह यांनी १६३८ ते ७८ दरम्यान या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण केलं. म्हणजे या किल्ल्याचा इतिहास हा ५०० वर्ष जुना आहे. 

किल्ल्याहून दिसतो पाकिस्तान

१९६५ मध्ये भारत-पाक युद्धावेळी सर्वातआधी मेहरानगढाला टार्गेट केलं गेलं होतं. पण किल्ल्याचं काही नुकसान झालं नाही. या किल्ल्याच्या टोकावरून पाकिस्तानची सीमा बघायला मिळते. इथे अनेक लोक किल्ल्याच्या टोकावर जाऊन पाकिस्तानची सीमा बघण्यासाठी अधिक उत्सुक असतात. 

कसे पोहोचाल?

तुम्ही जर विमानाने जाणार असाल तर जोधपूर एअरपोर्ट तुमच्यासाठी सोपं पडेल. तर रेल्वे जाणार असाल तर जोधपूर रेल्वे स्टेशनवरून मुख्य शहारासाठी टॅक्सी किंवा बसेस सहज मिळतात. दिल्ली आणि आग्र्याहून जयपूरसाठी थेट बसेसही मिळतात. 

कधी जाल?

मेहरानगढ किल्ला बघण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा सर्वाच चांगला कालावधी मानला जातो. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटनRajasthanराजस्थान