शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

देशातील ते ठिकाण जिथे सर्वातआधी उगवतो सूर्य, सकाळी ३ वाजताच रंगतो किरणांचा खेळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 11:32 AM

आजच्या बिझी लाइफमध्ये लोक सकाळी इतक्या घाईत असतात की, ते सूर्याला उगताना पाहूच शकत नाही. कामाचा इतका थकवा त्यांना आलेला असतो की, ते सूर्योदय होत असताना जागंही होता येत नाही.

अमेरिकन लेखक आणि पत्रकार जेनेट वॉल्सने आपल्या एका पुस्तकात लिहिले आहे की, तुम्हाला जर देवाला जवळून अनुभवायचं असेल तर तुम्ही सूर्योदय होतांना पहायला हवं. आजच्या बिझी लाइफमध्ये लोक सकाळी इतक्या घाईत असतात की, ते सूर्याला उगताना पाहूच शकत नाही. कामाचा इतका थकवा त्यांना आलेला असतो की, ते सूर्योदय होत असताना जागंही होता येत नाही. लाल आणि पिवळ्या आकाशासोबत जेव्हा सूर्याची चमकदार किरणे जमिनीवर पडतात तेव्हा स्वर्गाचा अनुभव येतो. 

आपल्या बिझी शेड्यूलमधून तुम्हीही कधीना कधी सूर्योदय नक्की पाहिला असेल. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, देशातील कोणत्या भागात सर्वातआधी सूर्योदय होतो. आश्चर्याची बाब ही आहे की, जेव्हा तुम्ही तुमच्या बिछान्यावर झोपले असता आणि खिडकी बाहेर आकाश काळं असतं. तेव्हा कोण्या एका कोपऱ्यात सुर्याची किरणे पसरायला सुरुवात होते. असे केवळ दुसऱ्या देशात नाही तर आपल्या देशातील एका भागातही होतं. आज आम्ही तुम्हाला देशातील एका अशा जागेबाबत सांगणार आहोत जिथे सर्वातआधी सूर्योदय होतो. 

कुठे होतो सर्वातआधी सूर्योदय?

देशात सर्वातआधी सूर्योदय अरुणाचल प्रदेशात होतो. या प्रदेशाच्या नावातूनच हे स्पष्ट होतं. अरुणाचल प्रदेशाला उगवत्या सूर्याची भूमी मानलं जातं. या प्रदेशातील लहान ठिकाण डोंग व्हॅलीमध्ये सर्वातआधी सूर्य उगवताना पाहिला जाऊ शकतो. 

रात्री ३ वाजतापासून सुरु होते प्रक्रिया

सूर्याचा प्रकाश आणि किरणांची लाल रंगाची चादर डोंग व्हॅलीमध्ये रात्री ३ वाजतापासून बघायला मिळते. लोहित नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या ठिकाणाला निसर्गाची देण म्हटलं जातं. १९९९ मध्ये या गोष्टीचा शोध लावण्यात आला होता की, भारतात सर्वातआधी सूर्योदय अरुणाचल प्रदेशच्या डोंग व्हॅलीमध्ये होतो. चारही बाजूंनी उंचच उंच डोंगर, हिरवीगार झाडे आणि निळ्या आकाशावर पसरलेल्या सूर्यांच्या रंगात रंगलेले लाल-पिवळे ढग डोळे दिपवणारा नजारा असतो. 

८ किमी ट्रेकिंग करुन जावे लागते

नव्या वर्षानिमित्ताने देशभरातील पर्यटक सूर्याची पहिलं किरणं बघण्यासाठी डोंग व्हॅलीच्या देवांग घाटीत येतात. ही घाटी लोहित जिल्ह्याच्या मॅकमोहन लाइनजवळ आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये तशा तर बघण्यासाठी अनेक जागा आहेत पण लोक सूर्योदय बघण्यासाठी ८ किमी डोंगरांवर ट्रेकिंग करुन येतात. समुद्रसपाटीपासून १२४० मीटर उंचीवर असलेल्या या डोंग व्हॅलीमध्ये लोक एक वेगळीच शांतता आणि एक वेगळाच अनुभव घेऊ शकतात.  

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेशtourismपर्यटन