शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

४५० वर्ष जुन्या किल्ल्यात शेकडो भुयारे आणि तळघरे, बाहेरून बघितल्यावर दिसतही नाही किल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 15:50 IST

जगभरात असे अनेक किल्ले आहेत ज्यांचं रहस्य आजही रहस्य बनूनच आहे. असाच एक किल्ला बिहारमधील रोहतास जिल्ह्यात आहे. शेरगढ किल्ला असं या किल्ल्याला नाव देण्यात आलं आहे.

(All Image Credit : Social Media)

जगभरात असे अनेक किल्ले आहेत ज्यांचं रहस्य आजही रहस्य बनूनच आहे. असाच एक किल्ला बिहारमधील रोहतास जिल्ह्यात आहे. शेरगढ किल्ला असं या किल्ल्याला नाव देण्यात आलं आहे. अफगाण शासक शेरशाह सूरीच्या या किल्ल्यात शेकडो भुयारी रस्ते आणि तळघरे आहेत. हे भुयारी रस्ते कुठे उघडतात हे आजपर्यंत कुणालाच माहीत नाही. 

कैमूरच्या डोंगरांवर असलेल्या या किल्ल्याची बनावट इतर किल्ल्यांपेक्षा फार वेगळी आहे. हा किल्ला असा तयार केली की, बाहेरून कुणी बघितला तर दिसणार नाही. किल्ल्याच्या तीन बाजूने घनदाट जंगल तर एक बाजूने दुर्गावती नदी आहे.

किल्ल्याच्या आत जाण्यासाठी एका भुयारातून जावं लागतं. असे म्हणतात की, जर ही भुयारे बंद केली तर किल्ला कुणाला दिसणारही नाही. येथील तळघरांबाबत बोललं जातं की, हे इतके मोठे आहेत की, यात एकत्र १० हजार लोकही येऊ शकतात. 

असे म्हणतात की, हा किल्ला शेरशाह सूरीने दुश्मनांपासून वाचण्यासाठी तयार केला होता. तो त्याच्या परिवारासोबत आणि सैनिकांसोबत इथेच राहतं होता. इथे त्यांच्यासाठी सुरक्षेपासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा होत्या.

तसेच कोणत्याही दिशेने जर दुश्मन येत असतील आणि १० किलोमीटर दूरही असतील तर ते दिसतील अशी या किल्ल्याची बनावट आहे. असे म्हटले जाते की, याच किल्ल्यात शेरशाह सूरी, त्याचा परिवार आणि हजारो सैनिकांची मुघलांनी हत्या केली होती.

असे सांगितले जाते की, हा किल्ला १५४० ते १५४५ दरम्यान तयार करण्यात आला आहे. इथे शेकडो भुयार कारण म्हणजे अडचणीच्या वेळी सुरक्षित बाहेर पडता यावं. असे म्हणतात की, हे भुयार कुठे उघडतात हे केवळ शेरशाह सूरी आणि त्याच्या खास सैनिकांनाच माहीत होतं. या किल्ल्यातील एक भुयार रोहतास गढ किल्ल्यापर्यंत जाते, पण भुयार पुढे कुठपर्यंत आहे हे कुणालाच माहीत नाही.

असे म्हणतात की, या किल्ल्यात शेरशाहचा मोठा खजिनाही लपवलेला आहे. पण आजपर्यंत हा खजिना सापडलेला नाही. या किल्ल्यातील भुयारांचं आणि तळघरांचं जाळं असं पसरलेलं आहे की, लोक आत जाण्यासही घाबरतात.

टॅग्स :BiharबिहारTravel Tipsट्रॅव्हल टिप्सJara hatkeजरा हटके