शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

कल्याण-डोंबिवलीत ७.५ हजार रिक्षा नव्याने दाखल होणार

By अनिकेत घमंडी | Updated: February 13, 2018 16:28 IST

वाहतूक कोंडीमुळे कल्याण-डोंबिवली शहरांच्या वाहतूक नियंत्रण विभागाचे कंबरडे मोडलेले असतानाच मागेल त्याला परमिट या योजनेखाली कल्याण आरटीओ क्षेत्रात आता नव्याने १२ हजार रिक्षा सामील होणार असून त्यातील सुमारे ७.५ हजार रिक्षांची कल्याण-डोंबिवली शहरात वाढ होणार आहे. यासाठी कुठलेही नियोजन नसल्याने वाहतूक कोंडीत प्रचंड वाढ होणार आहे.

ठळक मुद्दे वाहतूक कोंडीत प्रचंड वाढ होणार इरादापत्रातील रहिवासी दाखल्यांची तहसीलादारांनी चौकशी करावी-प्रकाश पेणकर

डोंबिवली: वाहतूक कोंडीमुळे कल्याण-डोंबिवली शहरांच्या वाहतूक नियंत्रण विभागाचे कंबरडे मोडलेले असतानाच मागेल त्याला परमिट या योजनेखाली कल्याण आरटीओ क्षेत्रात आता नव्याने १२ हजार रिक्षा सामील होणार असून त्यातील सुमारे ७.५ हजार रिक्षांची कल्याण-डोंबिवली शहरात वाढ होणार आहे. आधीच कल्याणमध्ये असलेल्या ७.५ हजार अधिकृत रिक्षांमध्ये आता अडीच हजार रिक्षांची वाढ होणार असून डोंबिवलीची स्थिती आणखीनच भयंकर होणार आहे. सध्या डोंबिवलीत साडेपाच हजार वैध तेवढ्याच संख्येने अवैध रिक्षा धावत असून त्यात ५ हजारांची भर पडणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यात केंद्राच्या स्मार्ट सिटीच्या नियोजनात जून्यांसह नव्याने येणा-या रिक्षा उभ्या करण्यासाठी स्टँडचे कुठलेही नियोजन नसल्याने वाहतूक कोंडीत प्रचंड वाढ होणार आहे.कल्याण-डोंबिवलीसह ठाकुर्ली परिसरातील सर्वच रिक्षा या रेल्वे स्थानकाकडे येतात. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक नियोजनाचे तीनतेरा वाजलेले असतात. सामाजिक संस्थांसह रिक्षा युनियन आणि वाहतूक नियंत्रण पोलिस, वॉर्डन यांच्या हाताबाहेरची परिस्थिती ओढावलेली असते. त्यात आता नव्या रिक्षांची भर पडल्याने कोंडी जास्त वाढणार असल्याने वाहतूक पोलिसांसमोर मोठा पेच आहे.नव्याने रिक्षा वाढत असतांनाच देण्यात येणा-या इरादा पत्रांची चौकशी व्हावी असे पत्र कल्याणमधील रिक्षा युनियनचे अध्यक्ष प्रकाश (नाना) पेणकर यांनी ठाणे, कल्याण आरटीओ अधिका-यांना पत्र दिले आहे. पण पत्रानंतर आणि त्या आगोदर उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांनी स्वत:हून एकाही अर्जाची छाननी करतांन इरादापत्राची चौकशी व्हावी अशी नोंद केलेली नाही, तसा अर्ज तहसीलदार कार्यालयाकडे पाठवलेला नाही ही शोकांतिका असल्याचे पेणकर ‘लोकमत’ला म्हणाले. यावरुनच इरादापत्र वाटपाचा कारभार पारदर्शी झाला नसल्याची टिका त्यांनी केली. कल्याण आरटीओ अधिकारी सक्षम असून त्यांनी या पत्राकडे गांभिर्याने बघावे. पेणकर यांच्या अर्जावर आरटीओकडुन जे उत्तर आले त्यात काही गैर आढळल्यास नीदर्शनास आणुन द्यावे असे म्हंटले आहे. पण त्या पत्रामुळे ते समाधानी नसून आरटीओ अधिका-यांनीच गैरकारभाराला चाप लावण्यासाठी पुढे यावे. इरादापत्रासाठी आलेल्या अर्जांमधील रहिवासी दाखले योग्य आहेत की नाही ते तपासावे, नसतील तर चौकशी करण्यासाठी तहसीलदारांना द्यावेत. जेणेकरुन पारदर्शी कारभार होईल, शंकेला वाव राहणार नाही असेही ते म्हणाले.* कल्याण-डोंबिवली शहरांच्या लोकसंख्येच्या तुलनेत आता रिक्षांचे प्रमाण प्रचंड झाले आहे. रस्ते छोटे असून मागेल त्याला परमिट या संकल्पनेमुळे रिक्षा घेणा-यांचे प्रमाण वाढलेले आहे. नव्या रिक्षांपैकी सुमारे २० टक्के रिक्षा या चालक मिळत नसल्याने उभ्या आहेत. त्याचा फायदा काय झाला. तसेच भरमसाठ रिक्षा आल्यााने पूर्वी मालकासह इंधनाची खर्ची वगळता चालक साधारणपणे शिपमागे ३०० ते ४०० रुपये घरी घेऊन जात असे. पण आता शिपमागे चालकाला अवघे १००-१५० रुपये मिळतात ही वस्तूस्थिती असल्याचे पेणकर म्हणाले. त्यामुळे आता मागेल त्याला परमिट ही सुविधा निदान या शहरांसाठी बंद करा अशी मागणी ते करणार आहेत.* सूत्रांच्या माहितीनूसार आरटीओच्या सिरीजमधील डीसी कोड अंतर्गत १० हजार रिक्षा कल्याण आरटीओ क्षेत्रात आल्या, आता डिक्यू सिरीज सुरु आहे. त्यातीलही ५०० रिक्षांचे वाटप झाले आहे. सीपी सिरीज आधीच बंद झाली आहे. दुचाकीची सिरीज ही दोन महिन्यात पूर्ण होते, तर तीन चाकी वाहनांची साडेतीन महिन्यात, आणि चार चाकी वाहनांची वर्षाकाठी सिरीज पूर्ण होते. यामुळे दुचाकीसह तीन चाकी वाहनांची कल्याण आरटीओ क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. पण त्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने या प्रमुख शहरांमध्ये वाहतूक कोंडी जटील होणार आहे.* कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे स्टँडचे जाळे विकसीत करण्याची क्षमता नाही, मानसीकता नाही. गल्ली तिथे स्टँड असे डोंबिवलीतले विदारक चित्र आहे. अशातच नव्याने देण्यात येणा-या इरादापत्रामुळे कोंडीत वाढ होणार हे स्पष्ट आहे. एकीकडे शहरातील प्रदुषणाची समस्या असतांनाच वेगाने वाढणा-या वाहनांमुळे ध्वनी, वायु प्रदुषणाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. त्यातच वाहतूक नियंत्रण विभागाकडे अपु-या मनुष्यबळामुळे कोंडी सोडवायची कशी हे आव्हान आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीRto officeआरटीओ ऑफीसkalyanकल्याणtraffic policeवाहतूक पोलीस