शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

इथे आहे ११०० वर्ष जुनं सासू-सुनेचं मंदिर, कधीकाळी मुघलांनी केलं होतं बंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 15:18 IST

तुम्ही तशी तर भगवान शिवा, भगवान श्रीकृष्ण आणि भगवान गणेशाची वेगवेगळी मंदिरे पाहिली असतील. पण कधी तुम्ही सासू-सुनेचं मंदिर पाहिलंय का?

तुम्ही तशी तर भगवान शिवा, भगवान श्रीकृष्ण आणि भगवान गणेशाची वेगवेगळी मंदिरे पाहिली असतील. पण कधी तुम्ही सासू-सुनेचं मंदिर पाहिलंय का? तुम्हाला नक्कीच अशाप्रकारच्या मंदिराबाबत जाणून घेऊन आश्यर्य वाटेल. हे मंदिर राजस्थानच्या उदयपूरमध्ये आहे. आणि या मंदिराच्या निर्माणाची कथाही फारच रोमांचक आहे. 

सास-बहू म्हणजेच सासू सुनेचं हे प्रसिद्ध मंदिर एक ऐतिहासिक आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. पण नावानुसार, अनेकांना वाटलं असेल की, या मंदिरात सासू-सुनेची पूजा केली जाते. तर मुळात हे तसं नाही. या मंदिरात भगवान विष्णु आणि भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते. सुनेचं मंदिर सासूच्या मंदिरापेक्षा थोडं लहान आहे. १०व्या शतकात तयार करण्यात आलेल्या या मंदिराला अष्टकोनी छत आहे. मंदिराच्या भींतींवर रामायणातील वेगवेगळ्या घटना कोरल्या आहेत. मूर्तींना दोन भागात अशाप्रकारे व्यवस्थित ठेवण्यात आलं आहे.

सासू-सुनेच्या या मंदिरात एकाच मंचावर त्रिमुर्ती म्हणजे ब्रम्हा, विष्णु आणि महेशाची मूर्ती कोरण्यात आली आहे. तर दुसऱ्या मंचावर राम, बलराम आणि परशुरामाचे चित्र आहे. असे म्हणतात की, मेवाड राजघराण्याच्या राजमातेसाठी भगवान विष्णुचं मंदिर आणि सुनेसाठी शेषनागाचं मंदिर तयार केलं होतं. सासू-सुनेसाठी हे मंदिर तयार करण्यात आलं असल्यानेच या मंदिराला सासू-सुनेचं मंदिर म्हणून ओळखलं जातं. 

असं मानलं जातं की, ११०० वर्षांपूर्वी या मंदिराचं निर्माण राजा महिपाल आणि रत्नपाल यांनी केलं होतं. राजमाता या भगवान विष्णुच्या भक्त होत्या त्यामुळे आधी भगवान विष्णुचं मंदिर तयार करण्यात आलं. त्यानंतर राजा महिपाल यांचं लग्न झालं. राजा महिपालाच्या पत्नी या भगवान शिवाच्या भक्त होत्या. त्यामुळे त्यांच्यासाठी भगवान शिवाचं मंदिर तयार करण्यात आलं. 

सासू-सुनेचं मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात भगवान विष्णुची ३२ मीटर उंच आणि २२ मीटर रूंद प्रतिमा आहे. या प्रतिमेला हजारो भूजा आहेत. त्यामुळे हे मंदिर सहस्त्रबाहु मंदिर म्हणूनही ओळखलं जातं. भगवान विष्णु आणि भगवान शिवाच्या मंदिराच्या मधे एक भगवान ब्रम्हाचंही एक मंदिर आहे. 

अशीही एक मान्यता आहे की, इथे सर्वातआधी भगवान श्रीकृष्णाचं मंदिर बांधण्यात आलं होतं. यातील प्रतिमेला हजारो बाहु आहेत. कालांतराने सहस्त्रबाहु या शब्दाची फोड करून लोक या मंदिराला सास-बहू मंदिर म्हणू लागले. 

असेही म्हटले जाते की, या मंदिराच्या जवळपासच मेवाड राजवंशाची स्थापना झाली होती. असे म्हणतात की, या परिसरावर जेव्हा मुघलांनी ताबा मिळवला होता तेव्हा हे मंदिर वाळू आणि चुन्याच्या मदतीने बंद केलं होतं. मात्र नंतर जेव्हा इंग्रजांनी इथे ताबा मिळवला हे मंदिर पुन्हा खुलं करण्यात आलं. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सRajasthanराजस्थान