शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

इथे आहे ११०० वर्ष जुनं सासू-सुनेचं मंदिर, कधीकाळी मुघलांनी केलं होतं बंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 15:18 IST

तुम्ही तशी तर भगवान शिवा, भगवान श्रीकृष्ण आणि भगवान गणेशाची वेगवेगळी मंदिरे पाहिली असतील. पण कधी तुम्ही सासू-सुनेचं मंदिर पाहिलंय का?

तुम्ही तशी तर भगवान शिवा, भगवान श्रीकृष्ण आणि भगवान गणेशाची वेगवेगळी मंदिरे पाहिली असतील. पण कधी तुम्ही सासू-सुनेचं मंदिर पाहिलंय का? तुम्हाला नक्कीच अशाप्रकारच्या मंदिराबाबत जाणून घेऊन आश्यर्य वाटेल. हे मंदिर राजस्थानच्या उदयपूरमध्ये आहे. आणि या मंदिराच्या निर्माणाची कथाही फारच रोमांचक आहे. 

सास-बहू म्हणजेच सासू सुनेचं हे प्रसिद्ध मंदिर एक ऐतिहासिक आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. पण नावानुसार, अनेकांना वाटलं असेल की, या मंदिरात सासू-सुनेची पूजा केली जाते. तर मुळात हे तसं नाही. या मंदिरात भगवान विष्णु आणि भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते. सुनेचं मंदिर सासूच्या मंदिरापेक्षा थोडं लहान आहे. १०व्या शतकात तयार करण्यात आलेल्या या मंदिराला अष्टकोनी छत आहे. मंदिराच्या भींतींवर रामायणातील वेगवेगळ्या घटना कोरल्या आहेत. मूर्तींना दोन भागात अशाप्रकारे व्यवस्थित ठेवण्यात आलं आहे.

सासू-सुनेच्या या मंदिरात एकाच मंचावर त्रिमुर्ती म्हणजे ब्रम्हा, विष्णु आणि महेशाची मूर्ती कोरण्यात आली आहे. तर दुसऱ्या मंचावर राम, बलराम आणि परशुरामाचे चित्र आहे. असे म्हणतात की, मेवाड राजघराण्याच्या राजमातेसाठी भगवान विष्णुचं मंदिर आणि सुनेसाठी शेषनागाचं मंदिर तयार केलं होतं. सासू-सुनेसाठी हे मंदिर तयार करण्यात आलं असल्यानेच या मंदिराला सासू-सुनेचं मंदिर म्हणून ओळखलं जातं. 

असं मानलं जातं की, ११०० वर्षांपूर्वी या मंदिराचं निर्माण राजा महिपाल आणि रत्नपाल यांनी केलं होतं. राजमाता या भगवान विष्णुच्या भक्त होत्या त्यामुळे आधी भगवान विष्णुचं मंदिर तयार करण्यात आलं. त्यानंतर राजा महिपाल यांचं लग्न झालं. राजा महिपालाच्या पत्नी या भगवान शिवाच्या भक्त होत्या. त्यामुळे त्यांच्यासाठी भगवान शिवाचं मंदिर तयार करण्यात आलं. 

सासू-सुनेचं मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात भगवान विष्णुची ३२ मीटर उंच आणि २२ मीटर रूंद प्रतिमा आहे. या प्रतिमेला हजारो भूजा आहेत. त्यामुळे हे मंदिर सहस्त्रबाहु मंदिर म्हणूनही ओळखलं जातं. भगवान विष्णु आणि भगवान शिवाच्या मंदिराच्या मधे एक भगवान ब्रम्हाचंही एक मंदिर आहे. 

अशीही एक मान्यता आहे की, इथे सर्वातआधी भगवान श्रीकृष्णाचं मंदिर बांधण्यात आलं होतं. यातील प्रतिमेला हजारो बाहु आहेत. कालांतराने सहस्त्रबाहु या शब्दाची फोड करून लोक या मंदिराला सास-बहू मंदिर म्हणू लागले. 

असेही म्हटले जाते की, या मंदिराच्या जवळपासच मेवाड राजवंशाची स्थापना झाली होती. असे म्हणतात की, या परिसरावर जेव्हा मुघलांनी ताबा मिळवला होता तेव्हा हे मंदिर वाळू आणि चुन्याच्या मदतीने बंद केलं होतं. मात्र नंतर जेव्हा इंग्रजांनी इथे ताबा मिळवला हे मंदिर पुन्हा खुलं करण्यात आलं. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सRajasthanराजस्थान