शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

Indian Railway: 'ही' आहे भारतातील सर्वांत जुनी रेल्वे; तब्बल ११० वर्षांपासून करतेय प्रवाशांची सेवा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 15:34 IST

भारतीय रेल्वे जगात चौथ्या आणि आशियामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठं जाळं आहे.

नवी दिल्ली: भारतीय रेल्वे जगात चौथ्या आणि आशियामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठं जाळं आहे. इथे दिवसभर हजारो गाड्यांची ये-जा होत असते. भारतातील अनेक रेल्वे गाड्या आपल्या वैशिष्ट्यांमुळे जगभर प्रसिद्ध आहेत. रेल्वेचा इतिहास शेकडो वर्षे जुना आहे मात्र, भारतातील सर्वात जुन्या रेल्वेबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. विशेष म्हणजे आपल्या भारतात एक अशी देखील रेल्वे आहे जी मागील ११० वर्षांपासून प्रवाशांची सेवा करत आली आहे. वर्षोनुवर्षे रेल्वेमध्ये खूप सुधारणा होत गेली आहे, त्यामुळे ही ऐतिहासिक रेल्वे चर्चेचा विषय बनली आहे. 

भारतातील सर्वात जुनी रेल्वे म्हणून पंजाब मेलची जगभर ख्याती आहे. या रेल्वेची सुरूवात १ जून १९१२ रोजी झाली होती. तेव्हापासून आजतागायत ही रेल्वे प्रवाशांची सेवा करत आहे. मात्र कोरोनामध्ये लागलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर या रेल्वेच्या सेवेला काही काळ ब्रेक लागला होता. 

पेशावरपासून मुंबईपर्यंत प्रवास

मागील महिन्यात या रेल्वेने ११० वर्षे पूर्ण करून १११ व्या वर्षात पदार्पण केले आहे. मात्र आज देखील गाडीची वेगमर्यादा प्रति तास ११० किलोमीटर एवढी आहे. १९१२ मध्ये जेव्हा रेल्वे सुरू झाली होती तेव्हा भारतात इंग्रजांचे राज्य होते. त्या काळात ही रेल्वे मुंबई आणि पेशावर बंदरावर असलेल्या बॅलार्ड पिअर स्टेशनदरम्यान धावत असे. विशेष म्हणजे ही एकमेव अशी रेल्वे होती जी प्रवाशांना पेशावरपासून मुंबईपर्यंत पोहोचवत होती. 

प्रवासासाठी फक्त इंग्रजांना मुभा

सुरुवातीला या रेल्वेमधून फक्त ब्रिटिश अधिकारी आणि ब्रिटिश कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र १९३० मध्ये या गाडीतील प्रवास सर्वसामान्य जनतेसाठी खुला करण्यात आला. १९४७ मध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तान विभागले गेले, तेव्हा या रेल्वेचा मार्ग बदलण्यात आला. नंतर ही रेल्वे पंजाबमधील फिरोजपूर ते मुंबईपर्यंत धावू लागली. ही गाडी कोळशावर धावत होती आणि ती मुंबई ते पेशावर २४९६ किमीचे अंतर ४७ तासांत पूर्ण करत होती.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेTravel Tipsट्रॅव्हल टिप्सhistoryइतिहासMumbaiमुंबई