शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

Indian Railway: 'ही' आहे भारतातील सर्वांत जुनी रेल्वे; तब्बल ११० वर्षांपासून करतेय प्रवाशांची सेवा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 15:34 IST

भारतीय रेल्वे जगात चौथ्या आणि आशियामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठं जाळं आहे.

नवी दिल्ली: भारतीय रेल्वे जगात चौथ्या आणि आशियामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठं जाळं आहे. इथे दिवसभर हजारो गाड्यांची ये-जा होत असते. भारतातील अनेक रेल्वे गाड्या आपल्या वैशिष्ट्यांमुळे जगभर प्रसिद्ध आहेत. रेल्वेचा इतिहास शेकडो वर्षे जुना आहे मात्र, भारतातील सर्वात जुन्या रेल्वेबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. विशेष म्हणजे आपल्या भारतात एक अशी देखील रेल्वे आहे जी मागील ११० वर्षांपासून प्रवाशांची सेवा करत आली आहे. वर्षोनुवर्षे रेल्वेमध्ये खूप सुधारणा होत गेली आहे, त्यामुळे ही ऐतिहासिक रेल्वे चर्चेचा विषय बनली आहे. 

भारतातील सर्वात जुनी रेल्वे म्हणून पंजाब मेलची जगभर ख्याती आहे. या रेल्वेची सुरूवात १ जून १९१२ रोजी झाली होती. तेव्हापासून आजतागायत ही रेल्वे प्रवाशांची सेवा करत आहे. मात्र कोरोनामध्ये लागलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर या रेल्वेच्या सेवेला काही काळ ब्रेक लागला होता. 

पेशावरपासून मुंबईपर्यंत प्रवास

मागील महिन्यात या रेल्वेने ११० वर्षे पूर्ण करून १११ व्या वर्षात पदार्पण केले आहे. मात्र आज देखील गाडीची वेगमर्यादा प्रति तास ११० किलोमीटर एवढी आहे. १९१२ मध्ये जेव्हा रेल्वे सुरू झाली होती तेव्हा भारतात इंग्रजांचे राज्य होते. त्या काळात ही रेल्वे मुंबई आणि पेशावर बंदरावर असलेल्या बॅलार्ड पिअर स्टेशनदरम्यान धावत असे. विशेष म्हणजे ही एकमेव अशी रेल्वे होती जी प्रवाशांना पेशावरपासून मुंबईपर्यंत पोहोचवत होती. 

प्रवासासाठी फक्त इंग्रजांना मुभा

सुरुवातीला या रेल्वेमधून फक्त ब्रिटिश अधिकारी आणि ब्रिटिश कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र १९३० मध्ये या गाडीतील प्रवास सर्वसामान्य जनतेसाठी खुला करण्यात आला. १९४७ मध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तान विभागले गेले, तेव्हा या रेल्वेचा मार्ग बदलण्यात आला. नंतर ही रेल्वे पंजाबमधील फिरोजपूर ते मुंबईपर्यंत धावू लागली. ही गाडी कोळशावर धावत होती आणि ती मुंबई ते पेशावर २४९६ किमीचे अंतर ४७ तासांत पूर्ण करत होती.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेTravel Tipsट्रॅव्हल टिप्सhistoryइतिहासMumbaiमुंबई