शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

अजबच! 'या' मंदिरात देवाला अर्पण केली जाते बीडी, लोक म्हणतात अन्यथा कोप होतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 18:24 IST

एका मंदिरात देवाला नैवेद्य म्हणून चक्क विडी अर्पण केली जाते. विशेष म्हणजे या गोष्टीची कोणी चेष्टा-मस्करी केली तर त्याच्या जीवनात अनिष्ट घटना घडतात, असं सांगितलं जातं.

आपल्या देशात मंदिरांची (Famous Temples in India) संख्या अगणित आहे. प्रत्येक देवस्थानाचं खास असं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे अशा ठिकाणी श्रद्धाळू भाविकांची गर्दी नेहमीच पाहायला मिळते. जीवनातल्या अडचणी, त्रास दूर व्हावा, सुख-समृद्धी मिळावी यासाठी श्रद्धाळू नागरिक देवदर्शन, पूजाविधीला विशेष महत्त्व देतात. काही मंदिरांमध्ये पूजाविधी, नैवेद्याच्या अनोख्या प्रथा, परंपरा पाहायला मिळतात. बिहारमधल्या (Bihar) कैमूर जिल्ह्यातल्या (Kaimur District) एका मंदिरात देवाला नैवेद्य म्हणून चक्क विडी अर्पण केली जाते. विशेष म्हणजे या गोष्टीची कोणी चेष्टा-मस्करी केली तर त्याच्या जीवनात अनिष्ट घटना घडतात, असं सांगितलं जातं. याविषयीची माहिती 'पल-पल इंडिया डॉट कॉम'ने दिली आहे.

देशात काही देवस्थानं जागृत आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत; मात्र काही मंदिरं अनोखी असतात. बिहारमधल्या कैमूर जिल्ह्यातल्या भगवानपूर ब्लॉकमध्ये १ हजार ४०० फूट उंच डोंगरावर मुसहरवा मंदिर (Musarwa Temple) वसलेलं आहे. हे देवस्थान काही खास प्रथांमुळे चर्चेत असतं. या मंदिरात उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातले नागरिक आपलं गाऱ्हाणं मांडण्यासाठी येतात. भाविक आपला प्रवास सुखकर व्हावा यासाठी मुसहरवा बाबांना विडी अर्पण करतात आणि मग इच्छित स्थळी जातात. हा भाग नक्षलग्रस्त (Naxal affected) मानला जातो. अधौरा टेकडीवर नक्षलवाद्यांचं राज्य होतं आणि तेव्हापासून या मंदिरात विडी अर्पण करण्याची प्रथा आहे.

याबाबत मंदिराचे पुजारी गोपाळ बाबा यांनी सांगितलं, 'मुसहरवा बाबा यांच्या मंदिरात गेल्या २२ वर्षांपासून भाविक श्रद्धेनं पूजाविधी करत आहेत. या मार्गावरून जाणारा एखादा प्रवासी (Tourist) किंवा अधौरा येथे जाणाऱ्या प्रवाशांनी या मंदिरात विडी अर्पण करावी असा संकेत आहे. असे अनेक प्रवासी आहेत, की ज्यांनी बाबांविषयी असलेल्या या श्रद्धेचा अपमान केला आणि त्यामुळे त्यांना अनिष्ट घटनांना सामोरं जावं लागलं. त्यापैकी कोणी डोंगरावरून घसरून पडलं तर कोणी जखमी झालं. तुम्हाला या डोंगरावरून सुरक्षित प्रवास करायचा असेल तर प्रवासासाठी आवश्यक सुरक्षा साहित्यासोबत विडी बंडल आणणं गरजेचं आहे. तरच तुमचा प्रवास सुरक्षितरीत्या पूर्ण होतो.'

हा डोंगर चढण्यापूर्वी आणि चढून गेल्यावर मुसहरवा बाबांना विडी अर्पण करणं आवश्यक आहे. यामुळे प्रवाशांच्या मार्गातले सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात आणि प्रवास सुरक्षितपणे पूर्ण होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. ज्या व्यक्तीकडे बाबांना अर्पण करण्यासाठी विडी नसते, त्या व्यक्ती मुसहरवा बाबांच्या दान पेटीत विडी अर्पण करण्यासाठी पैसे टाकतात आणि पुढील प्रवास सुरू करतात. यामुळे त्यांच्या मार्गातले सर्व अडथळे, विघ्नं दूर होतात, अशी श्रद्धा आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेTravel Tipsट्रॅव्हल टिप्स