शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

अजबच! 'या' मंदिरात देवाला अर्पण केली जाते बीडी, लोक म्हणतात अन्यथा कोप होतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 18:24 IST

एका मंदिरात देवाला नैवेद्य म्हणून चक्क विडी अर्पण केली जाते. विशेष म्हणजे या गोष्टीची कोणी चेष्टा-मस्करी केली तर त्याच्या जीवनात अनिष्ट घटना घडतात, असं सांगितलं जातं.

आपल्या देशात मंदिरांची (Famous Temples in India) संख्या अगणित आहे. प्रत्येक देवस्थानाचं खास असं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे अशा ठिकाणी श्रद्धाळू भाविकांची गर्दी नेहमीच पाहायला मिळते. जीवनातल्या अडचणी, त्रास दूर व्हावा, सुख-समृद्धी मिळावी यासाठी श्रद्धाळू नागरिक देवदर्शन, पूजाविधीला विशेष महत्त्व देतात. काही मंदिरांमध्ये पूजाविधी, नैवेद्याच्या अनोख्या प्रथा, परंपरा पाहायला मिळतात. बिहारमधल्या (Bihar) कैमूर जिल्ह्यातल्या (Kaimur District) एका मंदिरात देवाला नैवेद्य म्हणून चक्क विडी अर्पण केली जाते. विशेष म्हणजे या गोष्टीची कोणी चेष्टा-मस्करी केली तर त्याच्या जीवनात अनिष्ट घटना घडतात, असं सांगितलं जातं. याविषयीची माहिती 'पल-पल इंडिया डॉट कॉम'ने दिली आहे.

देशात काही देवस्थानं जागृत आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत; मात्र काही मंदिरं अनोखी असतात. बिहारमधल्या कैमूर जिल्ह्यातल्या भगवानपूर ब्लॉकमध्ये १ हजार ४०० फूट उंच डोंगरावर मुसहरवा मंदिर (Musarwa Temple) वसलेलं आहे. हे देवस्थान काही खास प्रथांमुळे चर्चेत असतं. या मंदिरात उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातले नागरिक आपलं गाऱ्हाणं मांडण्यासाठी येतात. भाविक आपला प्रवास सुखकर व्हावा यासाठी मुसहरवा बाबांना विडी अर्पण करतात आणि मग इच्छित स्थळी जातात. हा भाग नक्षलग्रस्त (Naxal affected) मानला जातो. अधौरा टेकडीवर नक्षलवाद्यांचं राज्य होतं आणि तेव्हापासून या मंदिरात विडी अर्पण करण्याची प्रथा आहे.

याबाबत मंदिराचे पुजारी गोपाळ बाबा यांनी सांगितलं, 'मुसहरवा बाबा यांच्या मंदिरात गेल्या २२ वर्षांपासून भाविक श्रद्धेनं पूजाविधी करत आहेत. या मार्गावरून जाणारा एखादा प्रवासी (Tourist) किंवा अधौरा येथे जाणाऱ्या प्रवाशांनी या मंदिरात विडी अर्पण करावी असा संकेत आहे. असे अनेक प्रवासी आहेत, की ज्यांनी बाबांविषयी असलेल्या या श्रद्धेचा अपमान केला आणि त्यामुळे त्यांना अनिष्ट घटनांना सामोरं जावं लागलं. त्यापैकी कोणी डोंगरावरून घसरून पडलं तर कोणी जखमी झालं. तुम्हाला या डोंगरावरून सुरक्षित प्रवास करायचा असेल तर प्रवासासाठी आवश्यक सुरक्षा साहित्यासोबत विडी बंडल आणणं गरजेचं आहे. तरच तुमचा प्रवास सुरक्षितरीत्या पूर्ण होतो.'

हा डोंगर चढण्यापूर्वी आणि चढून गेल्यावर मुसहरवा बाबांना विडी अर्पण करणं आवश्यक आहे. यामुळे प्रवाशांच्या मार्गातले सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात आणि प्रवास सुरक्षितपणे पूर्ण होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. ज्या व्यक्तीकडे बाबांना अर्पण करण्यासाठी विडी नसते, त्या व्यक्ती मुसहरवा बाबांच्या दान पेटीत विडी अर्पण करण्यासाठी पैसे टाकतात आणि पुढील प्रवास सुरू करतात. यामुळे त्यांच्या मार्गातले सर्व अडथळे, विघ्नं दूर होतात, अशी श्रद्धा आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेTravel Tipsट्रॅव्हल टिप्स