शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई आणि पुणेकर दोघींनी पुर्ण केली काश्मिर ते कन्याकुमारी सायकलस्वारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 16:42 IST

या दोन मुलींनी एकत्र येऊन आपली ही सायकलरॅली पुर्ण केली असून यानंतर नविन प्लॅनसुध्दा तयार केला आहे.

ठळक मुद्देसायकल चालवण्याची आवड एकदा निर्माण झाली की सायकलच त्या व्यक्तीला विविध ठिकाणी घेऊन जाते. हेच सिद्ध करून दाखवलंय मुंबई आणि पुण्याच्या दोन ध्येयवेड्या तरुणींनी. मुंबई आणि पुण्याच्या या दोन तरूणींनी काश्मिर ते कन्याकुमारी असा सायकलप्रवास ३५ दिवसात यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. 

मुंबई : सायकल चालवण्याची आवड एकदा निर्माण झाली की सायकलच त्या व्यक्तीला विविध ठिकाणी घेऊन जाते. हेच सिद्ध करून दाखवलंय मुंबई आणि पुण्याच्या दोन ध्येयवेड्या तरुणींनी. मुंबईची सायली महाराव आणि पुण्याच्या पूजा बुधावले या दोन तरूणींनी काश्मिर ते कन्याकुमारी असा सायकलप्रवास ३५ दिवसात यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. 

काश्मिर ते कन्याकुमारी असा पल्ला सायकलने पार करण्यासाठी त्यांनी ३० नोव्हेंबरपासून सुरुवात केली. दिवसाला १२० ते १५० किलोमीटरचा पल्ला गाठत या २ तरुणींनी ३८६८ किलोमीटरचा एकूण प्रवास पूर्ण केलाय. या संपूर्ण सायकलस्वारीचे 'प्रदूषणमुक्त भारत' व 'बेटी बचाओ बेटी पढाओ' हे दोन मूळ उद्देश होते.

त्यामुळे सायली आणि पूजाच्या या प्रवासाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. एवढा खंडप्राय प्रवास करणाऱ्या सायली आणि पूजा इथवरच न थांबता सायकलवरून हिमालयात प्रवासदेखील करणार आहेत.

आणखी वाचा - ..... यामुळे आहे पुणे मुंबईपेक्षा वरचढ

दरदिवशी साधारण १२० -१५० किलोमीटरचा पल्ला या दोघी पार करत होत्या. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रवासात विविध राज्यातील बाईक रायडर्स व सायकल रायडर्सच्या क्लब्सने खूप मदत केली. अनेक लोकांनी होमस्टेची सोयसुद्धा करून दिली. त्याचसोबत विविध राज्यातील लोकांच्या आपुलकीसोबत तिथल्या पदार्थांच्या चवीसुद्धा चाखता येत होत्या.या मोहिमेआधी रोज ६० किलोमीटरची सायकल सफर या दोघी नियमित करत होत्या. त्याचसोबत पुणे ते सातारा, पुणे ते जेजुरी, पुणे-लोणावळा, कोल्हापूर ते पुणे असे छोटे प्रवास करण्याचा प्रयत्न सायली आणि पूजाने केले. ज्यामुळे या मोहिमेची पक्की तयारी झाली.

या सायकलस्वारीमुळे पहाटे लवकर उठून, सर्व आवरून वेळेत निघायची या तरुणींना सवय लागली. आयुष्यात पुढेही त्यांना या सवयीची नक्कीच मदत होईल असं त्या म्हणतात. त्याचसोबत स्वावलंबी होऊन निर्णय घेण्याची क्षमता वाढली आहे, असं दोघींचं मत आहे. तसंच, ‘हव्या त्या क्षेत्रात हवी ती गोष्ट एक महिला म्हणून तुम्ही मिळवू शकता. त्यामुळे महिलांनी आपल्या कुटूंबियांना आपली स्वप्नं पटवून देऊन ध्येय गाठण्याचा प्रयत्न करायला हवा, असंही त्या म्हणतात.

आणखी वाचा - बाइक रायडिंगचं पॅशन स्वस्थ बसू देत नाही मग या नऊ ठिकाणी जाऊन याच!

टॅग्स :MumbaiमुंबईPuneपुणेTravelप्रवास