शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

मुंबई आणि पुणेकर दोघींनी पुर्ण केली काश्मिर ते कन्याकुमारी सायकलस्वारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 16:42 IST

या दोन मुलींनी एकत्र येऊन आपली ही सायकलरॅली पुर्ण केली असून यानंतर नविन प्लॅनसुध्दा तयार केला आहे.

ठळक मुद्देसायकल चालवण्याची आवड एकदा निर्माण झाली की सायकलच त्या व्यक्तीला विविध ठिकाणी घेऊन जाते. हेच सिद्ध करून दाखवलंय मुंबई आणि पुण्याच्या दोन ध्येयवेड्या तरुणींनी. मुंबई आणि पुण्याच्या या दोन तरूणींनी काश्मिर ते कन्याकुमारी असा सायकलप्रवास ३५ दिवसात यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. 

मुंबई : सायकल चालवण्याची आवड एकदा निर्माण झाली की सायकलच त्या व्यक्तीला विविध ठिकाणी घेऊन जाते. हेच सिद्ध करून दाखवलंय मुंबई आणि पुण्याच्या दोन ध्येयवेड्या तरुणींनी. मुंबईची सायली महाराव आणि पुण्याच्या पूजा बुधावले या दोन तरूणींनी काश्मिर ते कन्याकुमारी असा सायकलप्रवास ३५ दिवसात यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. 

काश्मिर ते कन्याकुमारी असा पल्ला सायकलने पार करण्यासाठी त्यांनी ३० नोव्हेंबरपासून सुरुवात केली. दिवसाला १२० ते १५० किलोमीटरचा पल्ला गाठत या २ तरुणींनी ३८६८ किलोमीटरचा एकूण प्रवास पूर्ण केलाय. या संपूर्ण सायकलस्वारीचे 'प्रदूषणमुक्त भारत' व 'बेटी बचाओ बेटी पढाओ' हे दोन मूळ उद्देश होते.

त्यामुळे सायली आणि पूजाच्या या प्रवासाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. एवढा खंडप्राय प्रवास करणाऱ्या सायली आणि पूजा इथवरच न थांबता सायकलवरून हिमालयात प्रवासदेखील करणार आहेत.

आणखी वाचा - ..... यामुळे आहे पुणे मुंबईपेक्षा वरचढ

दरदिवशी साधारण १२० -१५० किलोमीटरचा पल्ला या दोघी पार करत होत्या. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रवासात विविध राज्यातील बाईक रायडर्स व सायकल रायडर्सच्या क्लब्सने खूप मदत केली. अनेक लोकांनी होमस्टेची सोयसुद्धा करून दिली. त्याचसोबत विविध राज्यातील लोकांच्या आपुलकीसोबत तिथल्या पदार्थांच्या चवीसुद्धा चाखता येत होत्या.या मोहिमेआधी रोज ६० किलोमीटरची सायकल सफर या दोघी नियमित करत होत्या. त्याचसोबत पुणे ते सातारा, पुणे ते जेजुरी, पुणे-लोणावळा, कोल्हापूर ते पुणे असे छोटे प्रवास करण्याचा प्रयत्न सायली आणि पूजाने केले. ज्यामुळे या मोहिमेची पक्की तयारी झाली.

या सायकलस्वारीमुळे पहाटे लवकर उठून, सर्व आवरून वेळेत निघायची या तरुणींना सवय लागली. आयुष्यात पुढेही त्यांना या सवयीची नक्कीच मदत होईल असं त्या म्हणतात. त्याचसोबत स्वावलंबी होऊन निर्णय घेण्याची क्षमता वाढली आहे, असं दोघींचं मत आहे. तसंच, ‘हव्या त्या क्षेत्रात हवी ती गोष्ट एक महिला म्हणून तुम्ही मिळवू शकता. त्यामुळे महिलांनी आपल्या कुटूंबियांना आपली स्वप्नं पटवून देऊन ध्येय गाठण्याचा प्रयत्न करायला हवा, असंही त्या म्हणतात.

आणखी वाचा - बाइक रायडिंगचं पॅशन स्वस्थ बसू देत नाही मग या नऊ ठिकाणी जाऊन याच!

टॅग्स :MumbaiमुंबईPuneपुणेTravelप्रवास