शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

मुंबई आणि पुणेकर दोघींनी पुर्ण केली काश्मिर ते कन्याकुमारी सायकलस्वारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 16:42 IST

या दोन मुलींनी एकत्र येऊन आपली ही सायकलरॅली पुर्ण केली असून यानंतर नविन प्लॅनसुध्दा तयार केला आहे.

ठळक मुद्देसायकल चालवण्याची आवड एकदा निर्माण झाली की सायकलच त्या व्यक्तीला विविध ठिकाणी घेऊन जाते. हेच सिद्ध करून दाखवलंय मुंबई आणि पुण्याच्या दोन ध्येयवेड्या तरुणींनी. मुंबई आणि पुण्याच्या या दोन तरूणींनी काश्मिर ते कन्याकुमारी असा सायकलप्रवास ३५ दिवसात यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. 

मुंबई : सायकल चालवण्याची आवड एकदा निर्माण झाली की सायकलच त्या व्यक्तीला विविध ठिकाणी घेऊन जाते. हेच सिद्ध करून दाखवलंय मुंबई आणि पुण्याच्या दोन ध्येयवेड्या तरुणींनी. मुंबईची सायली महाराव आणि पुण्याच्या पूजा बुधावले या दोन तरूणींनी काश्मिर ते कन्याकुमारी असा सायकलप्रवास ३५ दिवसात यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. 

काश्मिर ते कन्याकुमारी असा पल्ला सायकलने पार करण्यासाठी त्यांनी ३० नोव्हेंबरपासून सुरुवात केली. दिवसाला १२० ते १५० किलोमीटरचा पल्ला गाठत या २ तरुणींनी ३८६८ किलोमीटरचा एकूण प्रवास पूर्ण केलाय. या संपूर्ण सायकलस्वारीचे 'प्रदूषणमुक्त भारत' व 'बेटी बचाओ बेटी पढाओ' हे दोन मूळ उद्देश होते.

त्यामुळे सायली आणि पूजाच्या या प्रवासाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. एवढा खंडप्राय प्रवास करणाऱ्या सायली आणि पूजा इथवरच न थांबता सायकलवरून हिमालयात प्रवासदेखील करणार आहेत.

आणखी वाचा - ..... यामुळे आहे पुणे मुंबईपेक्षा वरचढ

दरदिवशी साधारण १२० -१५० किलोमीटरचा पल्ला या दोघी पार करत होत्या. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रवासात विविध राज्यातील बाईक रायडर्स व सायकल रायडर्सच्या क्लब्सने खूप मदत केली. अनेक लोकांनी होमस्टेची सोयसुद्धा करून दिली. त्याचसोबत विविध राज्यातील लोकांच्या आपुलकीसोबत तिथल्या पदार्थांच्या चवीसुद्धा चाखता येत होत्या.या मोहिमेआधी रोज ६० किलोमीटरची सायकल सफर या दोघी नियमित करत होत्या. त्याचसोबत पुणे ते सातारा, पुणे ते जेजुरी, पुणे-लोणावळा, कोल्हापूर ते पुणे असे छोटे प्रवास करण्याचा प्रयत्न सायली आणि पूजाने केले. ज्यामुळे या मोहिमेची पक्की तयारी झाली.

या सायकलस्वारीमुळे पहाटे लवकर उठून, सर्व आवरून वेळेत निघायची या तरुणींना सवय लागली. आयुष्यात पुढेही त्यांना या सवयीची नक्कीच मदत होईल असं त्या म्हणतात. त्याचसोबत स्वावलंबी होऊन निर्णय घेण्याची क्षमता वाढली आहे, असं दोघींचं मत आहे. तसंच, ‘हव्या त्या क्षेत्रात हवी ती गोष्ट एक महिला म्हणून तुम्ही मिळवू शकता. त्यामुळे महिलांनी आपल्या कुटूंबियांना आपली स्वप्नं पटवून देऊन ध्येय गाठण्याचा प्रयत्न करायला हवा, असंही त्या म्हणतात.

आणखी वाचा - बाइक रायडिंगचं पॅशन स्वस्थ बसू देत नाही मग या नऊ ठिकाणी जाऊन याच!

टॅग्स :MumbaiमुंबईPuneपुणेTravelप्रवास