शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दीस इज द बेस्ट पॉईंट... पावसाळ्यात राजस्थानमधील 'या' 5 पर्यटनस्थळांना भेट द्याच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 15:52 IST

पावसाळ्यात अनेकदा लॉन्ग विकेंडच्या सुट्टीच्या सुट्ट्यांची संधी मिळते. पण देशाच्या अनेक ठिकाणी पावसाळा असल्यामुळे फिरायला जाण्याचा प्लॅन करणं अजिबात शक्य होत नाही.

पावसाळ्यात अनेकदा लॉन्ग विकेंडच्या सुट्टीच्या सुट्ट्यांची संधी मिळते. पण देशाच्या अनेक ठिकाणी पावसाळा असल्यामुळे फिरायला जाण्याचा प्लॅन करणं अजिबात शक्य होत नाही. अशातच आपण सगळ्या सुट्ट्या घरात बसूनच वाया घालवतो. परंतु, यावर्षी असं अजिबात करू नका. कारण आम्ही तुम्हाला मान्सूनमध्ये राजस्थान फिरण्याच्या 5 फायद्यांबाबत सांगणार आहोत. हे जाणून घेतल्यानंतर पावसाळ्यामध्ये तुम्ही राजस्थान फिरण्याचा प्लॅन नक्की कराल. 

1. अरावलीमधील मनाला भूरळ घालणारी हिरवळ 

पाऊस, डोंगर आणि चहूकडे पसरलेली हिरवळ. असं दृश्य आपल्या सर्वांना पाहायची इच्छा असते. पावसाच्या पाण्यामुळे झाड आणखी चमकदार होतात. अशातच अरावलीची रोड ट्रिप आणखी मजेशीर होते. तुम्हाला गरज असेल तर तुम्ही ट्रिप वाढवून पुढे माउंट आबूपर्यंत जाऊ शकता. 

2. सरोवरांची सैर मन प्रसन्न करेल 

राजस्थानला नेहमी उन्हाळा आणि वाळवंटासाठी ओळखलं जातं. परंतु, एकदा तुम्ही पावसाळ्यात येथे नक्की भेट द्या. येथील सरोवरांमधील स्वच्छ पाणी आणि आभाळातून कोसळणाऱ्या पावसाच्या धारा तुम्हाला खरचं प्रसन्न करतील. 

3. राजस्थानची शान असलेले किल्ले

राजस्थानमध्ये अनेक किल्ले आहेत. पण येथे असणाऱ्या उष्ण वातावरणामुळे अनेक लोक किल्ले पाहायला जातात, परंतु फार काळ थांबणं पसंत करत नाहीत. पण पावसाळ्यात हे किल्ले पाहण्याची गंमत काही औरच... पावसाच्या पाण्यामुळे किल्ल्यांवर जमा जालेली माती निघून जाते आणि त्यांचं सौंदर्य आणखी बहरतं. 

4. मान्सूनमध्ये सणांचा आनंद घेण्यासाठी बेस्ट ठिकाण 

श्रावणाच्या महिन्यात हिन्दू कॅलेंडरनुसार, अनेक सण साजरे करण्यात येतात. यादरम्यान दहीहांडी, रक्षाबंधन यांसारखे सण येतात. हे सण राजस्थानमध्ये धुमधडाक्यात साजरे करण्यात येतात. अशातच मान्सूनमध्ये येथे जाऊन येथील संस्कृतीचाही आनंद घेऊ शकता. 

5. गर्दी नसल्यामुळे फिरण्याचा आनंद होईल दुप्पट

जेव्हा पर्यटक जास्त असतात, त्यावेळी फिरण्याचा आनंद पुरेपूर घेता येत नाही. परंतु मान्सूनमध्ये लोक आपल्या घरांतून बाहेर पडणं शक्यतो टाळतात. त्यामुळे पर्यटकांची गर्दी फार अनुभवता येत नाही. त्यामुळे या दिवसांमध्ये फिरण्यासाठी गेल्यावर त्या ठिकाणांवरील सौंदर्याचा पुरेपूर आनंद लूटता येतो. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानTravel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन