शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
2
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
3
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
4
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
5
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
6
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
7
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा...", राम गोपाल वर्मा यांचं वादग्रस्त ट्वीट, म्हणाले- "गेल्या ५० वर्षांत..."
8
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
9
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
10
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
11
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
12
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
13
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
14
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
15
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
16
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
17
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
18
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
19
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावमध्ये एमआयएम-काँग्रेस युतीचा प्रयोग; वरिष्ठांच्या हालचाली, जागा वाटपाचीही चर्चा
20
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
Daily Top 2Weekly Top 5

मोफत जेवणं, तिकीट कॅन्सल केल्यास चार्ज नाही; विमान प्रवासाचे नवे नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 13:35 IST

जर तुम्ही नेहमीच कामानिमित्त किंवा इतर कारणांसाठी हवाई मार्गाने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. मिनिस्ट्री ऑफ सिविल एविएशन  (Ministry of Civil Aviation) तर्फे काही नियमांमध्य बदल करण्यात आले आहेत.

जर तुम्ही नेहमीच कामानिमित्त किंवा इतर कारणांसाठी हवाई मार्गाने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. मिनिस्ट्री ऑफ सिविल एविएशन  (Ministry of Civil Aviation) तर्फे काही नियमांमध्य बदल करण्यात आले आहेत. ज्यानंतर प्रवाशांसाठी हवाई प्रवास करणं आणखी सोपं होणार आहे. हे सर्व नियम प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि त्यांचा प्रवास आणखी सुखकर व्हावा म्हणून तयार करण्यात आले आहेत. जाणून घेऊया मंत्रालयाने प्रवाशांच्या सोयीसाठी काय बदल केले आहेत... 

1. मोफत जेवण

जर तुमची फ्लाइट 2 ते 6 तास उशीराने असेल तर तुम्हाला प्रवासादरम्यान फ्लाइटमध्ये जेवण देण्यात येणार असून तुम्हाला यासाठी अजिबात पैसे मोजावे लागणार नाहीत. 

2. मोफत तिकीट

जर फ्लाइट 6 तासांपेक्षा जास्त उशीराने होत असेल तर तुम्ही हक्काने दुसऱ्या फ्लाइटचं तिकीट मागू शकता. एवढचं नाही तर तुम्हाला कोणताही एक्स्ट्रा चार्च द्यावा लागणार नाही. दुसऱ्या फ्लाइटऐवजी तुम्ही त्याचवेळी तत्काळ रिफंडही मागू शकता. 

3. कॅन्सल फ्लाइटचं संपूर्ण कन्सेशन 

जर फ्लाइट कॅन्सल झाल्याची सूचना तुम्हाला फ्लाइटच्या 24 तास आधी नाही मिळाली तर तुम्हाला संपूर्ण कन्सेशन देण्यात येइल. एवढचं नाही तर मागील फ्लाइटला उशीर झाल्यामुळे तुमची पुढची फ्लाइट मिस झाली तर त्या फ्लाइटसाठी तुम्हाला पूर्ण कंन्सेशन मिळेल. 

4. एयरलाइन स्वतः देणार दुसरी फ्लाइट 

जर प्रवासाच्या 24 तासांच्या आतमध्ये तुमची फ्लाइट कॅन्सल होत असेल तर एयरलाइन कंपनीकडून तुम्हाला दुसरी फ्लाइट मोफत देण्यात येईल. 

5. तिकीट कॅन्सल केल्यानंतर कोणताही चार्ज आकारण्यात येणार नाही

जर तिकीट बुक केल्यानंतर 24 तासांच्या आत तुम्ही तिकीट कॅन्सल करत असाल तर तुम्हाला संपूर्ण पैसे परत मिळतील. जर एक आठवड्याच्या आत कॅन्सल करत असाल तर फ्लूल आमि बेस फेयर चार्च अप्लाय करून उर्वरित रक्कम परत करण्यात येईल. 

6. कोणताही चार्ज आकारल्याशिवाय नाव बदला

जर तुम्ही तिकीट बुक करताना चुकीचं नाव टाकलतं तर 24 तासांच्या आतमध्ये कोणताही चार्ज न भरता तुम्ही ते बदलू शकता. पहिल्यांदा हा बदल तिकीट कॅन्सल केलं असं समजून चार्ज आकारण्यात येत होता.

7. तिकीटाचं पैसे परत मिळणार

जर फ्लाइटची तिकीट पूर्ण झाल्यानंतरही तुमचं तिकीट बुक झालं तर एयरलाइन कंपनीकडून  तुम्हाला दुसरी फ्लाइट देण्यात येइल. 

8. बॅग तुटली तर पैसे परत मिळणार

जर एयरलाइन कंपनीकडून प्रवासादरम्यान तुमची बॅग तुटली किंवा एखादं सामान हरवलं तर तुम्हाला 350 रूपये प्रति किलो वजनाच्या हिशोबाने पैसे मिळणार. 

9. फ्लाइटच्या दरम्यान मृत्यू झाल्यास

जर फ्लाइटमधून प्रवास करताना एयरलाइन्स कंपनीच्या चुकीमुळे मृत्यू झाला किंवा कोणताही त्रास झाल्यास कंपनी 20 लाख पर्यंत नुकसान भरपाई देण्यात येईल. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटनIndiaभारत