शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

मोफत जेवणं, तिकीट कॅन्सल केल्यास चार्ज नाही; विमान प्रवासाचे नवे नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 13:35 IST

जर तुम्ही नेहमीच कामानिमित्त किंवा इतर कारणांसाठी हवाई मार्गाने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. मिनिस्ट्री ऑफ सिविल एविएशन  (Ministry of Civil Aviation) तर्फे काही नियमांमध्य बदल करण्यात आले आहेत.

जर तुम्ही नेहमीच कामानिमित्त किंवा इतर कारणांसाठी हवाई मार्गाने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. मिनिस्ट्री ऑफ सिविल एविएशन  (Ministry of Civil Aviation) तर्फे काही नियमांमध्य बदल करण्यात आले आहेत. ज्यानंतर प्रवाशांसाठी हवाई प्रवास करणं आणखी सोपं होणार आहे. हे सर्व नियम प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि त्यांचा प्रवास आणखी सुखकर व्हावा म्हणून तयार करण्यात आले आहेत. जाणून घेऊया मंत्रालयाने प्रवाशांच्या सोयीसाठी काय बदल केले आहेत... 

1. मोफत जेवण

जर तुमची फ्लाइट 2 ते 6 तास उशीराने असेल तर तुम्हाला प्रवासादरम्यान फ्लाइटमध्ये जेवण देण्यात येणार असून तुम्हाला यासाठी अजिबात पैसे मोजावे लागणार नाहीत. 

2. मोफत तिकीट

जर फ्लाइट 6 तासांपेक्षा जास्त उशीराने होत असेल तर तुम्ही हक्काने दुसऱ्या फ्लाइटचं तिकीट मागू शकता. एवढचं नाही तर तुम्हाला कोणताही एक्स्ट्रा चार्च द्यावा लागणार नाही. दुसऱ्या फ्लाइटऐवजी तुम्ही त्याचवेळी तत्काळ रिफंडही मागू शकता. 

3. कॅन्सल फ्लाइटचं संपूर्ण कन्सेशन 

जर फ्लाइट कॅन्सल झाल्याची सूचना तुम्हाला फ्लाइटच्या 24 तास आधी नाही मिळाली तर तुम्हाला संपूर्ण कन्सेशन देण्यात येइल. एवढचं नाही तर मागील फ्लाइटला उशीर झाल्यामुळे तुमची पुढची फ्लाइट मिस झाली तर त्या फ्लाइटसाठी तुम्हाला पूर्ण कंन्सेशन मिळेल. 

4. एयरलाइन स्वतः देणार दुसरी फ्लाइट 

जर प्रवासाच्या 24 तासांच्या आतमध्ये तुमची फ्लाइट कॅन्सल होत असेल तर एयरलाइन कंपनीकडून तुम्हाला दुसरी फ्लाइट मोफत देण्यात येईल. 

5. तिकीट कॅन्सल केल्यानंतर कोणताही चार्ज आकारण्यात येणार नाही

जर तिकीट बुक केल्यानंतर 24 तासांच्या आत तुम्ही तिकीट कॅन्सल करत असाल तर तुम्हाला संपूर्ण पैसे परत मिळतील. जर एक आठवड्याच्या आत कॅन्सल करत असाल तर फ्लूल आमि बेस फेयर चार्च अप्लाय करून उर्वरित रक्कम परत करण्यात येईल. 

6. कोणताही चार्ज आकारल्याशिवाय नाव बदला

जर तुम्ही तिकीट बुक करताना चुकीचं नाव टाकलतं तर 24 तासांच्या आतमध्ये कोणताही चार्ज न भरता तुम्ही ते बदलू शकता. पहिल्यांदा हा बदल तिकीट कॅन्सल केलं असं समजून चार्ज आकारण्यात येत होता.

7. तिकीटाचं पैसे परत मिळणार

जर फ्लाइटची तिकीट पूर्ण झाल्यानंतरही तुमचं तिकीट बुक झालं तर एयरलाइन कंपनीकडून  तुम्हाला दुसरी फ्लाइट देण्यात येइल. 

8. बॅग तुटली तर पैसे परत मिळणार

जर एयरलाइन कंपनीकडून प्रवासादरम्यान तुमची बॅग तुटली किंवा एखादं सामान हरवलं तर तुम्हाला 350 रूपये प्रति किलो वजनाच्या हिशोबाने पैसे मिळणार. 

9. फ्लाइटच्या दरम्यान मृत्यू झाल्यास

जर फ्लाइटमधून प्रवास करताना एयरलाइन्स कंपनीच्या चुकीमुळे मृत्यू झाला किंवा कोणताही त्रास झाल्यास कंपनी 20 लाख पर्यंत नुकसान भरपाई देण्यात येईल. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटनIndiaभारत