शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

मोफत जेवणं, तिकीट कॅन्सल केल्यास चार्ज नाही; विमान प्रवासाचे नवे नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 13:35 IST

जर तुम्ही नेहमीच कामानिमित्त किंवा इतर कारणांसाठी हवाई मार्गाने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. मिनिस्ट्री ऑफ सिविल एविएशन  (Ministry of Civil Aviation) तर्फे काही नियमांमध्य बदल करण्यात आले आहेत.

जर तुम्ही नेहमीच कामानिमित्त किंवा इतर कारणांसाठी हवाई मार्गाने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. मिनिस्ट्री ऑफ सिविल एविएशन  (Ministry of Civil Aviation) तर्फे काही नियमांमध्य बदल करण्यात आले आहेत. ज्यानंतर प्रवाशांसाठी हवाई प्रवास करणं आणखी सोपं होणार आहे. हे सर्व नियम प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि त्यांचा प्रवास आणखी सुखकर व्हावा म्हणून तयार करण्यात आले आहेत. जाणून घेऊया मंत्रालयाने प्रवाशांच्या सोयीसाठी काय बदल केले आहेत... 

1. मोफत जेवण

जर तुमची फ्लाइट 2 ते 6 तास उशीराने असेल तर तुम्हाला प्रवासादरम्यान फ्लाइटमध्ये जेवण देण्यात येणार असून तुम्हाला यासाठी अजिबात पैसे मोजावे लागणार नाहीत. 

2. मोफत तिकीट

जर फ्लाइट 6 तासांपेक्षा जास्त उशीराने होत असेल तर तुम्ही हक्काने दुसऱ्या फ्लाइटचं तिकीट मागू शकता. एवढचं नाही तर तुम्हाला कोणताही एक्स्ट्रा चार्च द्यावा लागणार नाही. दुसऱ्या फ्लाइटऐवजी तुम्ही त्याचवेळी तत्काळ रिफंडही मागू शकता. 

3. कॅन्सल फ्लाइटचं संपूर्ण कन्सेशन 

जर फ्लाइट कॅन्सल झाल्याची सूचना तुम्हाला फ्लाइटच्या 24 तास आधी नाही मिळाली तर तुम्हाला संपूर्ण कन्सेशन देण्यात येइल. एवढचं नाही तर मागील फ्लाइटला उशीर झाल्यामुळे तुमची पुढची फ्लाइट मिस झाली तर त्या फ्लाइटसाठी तुम्हाला पूर्ण कंन्सेशन मिळेल. 

4. एयरलाइन स्वतः देणार दुसरी फ्लाइट 

जर प्रवासाच्या 24 तासांच्या आतमध्ये तुमची फ्लाइट कॅन्सल होत असेल तर एयरलाइन कंपनीकडून तुम्हाला दुसरी फ्लाइट मोफत देण्यात येईल. 

5. तिकीट कॅन्सल केल्यानंतर कोणताही चार्ज आकारण्यात येणार नाही

जर तिकीट बुक केल्यानंतर 24 तासांच्या आत तुम्ही तिकीट कॅन्सल करत असाल तर तुम्हाला संपूर्ण पैसे परत मिळतील. जर एक आठवड्याच्या आत कॅन्सल करत असाल तर फ्लूल आमि बेस फेयर चार्च अप्लाय करून उर्वरित रक्कम परत करण्यात येईल. 

6. कोणताही चार्ज आकारल्याशिवाय नाव बदला

जर तुम्ही तिकीट बुक करताना चुकीचं नाव टाकलतं तर 24 तासांच्या आतमध्ये कोणताही चार्ज न भरता तुम्ही ते बदलू शकता. पहिल्यांदा हा बदल तिकीट कॅन्सल केलं असं समजून चार्ज आकारण्यात येत होता.

7. तिकीटाचं पैसे परत मिळणार

जर फ्लाइटची तिकीट पूर्ण झाल्यानंतरही तुमचं तिकीट बुक झालं तर एयरलाइन कंपनीकडून  तुम्हाला दुसरी फ्लाइट देण्यात येइल. 

8. बॅग तुटली तर पैसे परत मिळणार

जर एयरलाइन कंपनीकडून प्रवासादरम्यान तुमची बॅग तुटली किंवा एखादं सामान हरवलं तर तुम्हाला 350 रूपये प्रति किलो वजनाच्या हिशोबाने पैसे मिळणार. 

9. फ्लाइटच्या दरम्यान मृत्यू झाल्यास

जर फ्लाइटमधून प्रवास करताना एयरलाइन्स कंपनीच्या चुकीमुळे मृत्यू झाला किंवा कोणताही त्रास झाल्यास कंपनी 20 लाख पर्यंत नुकसान भरपाई देण्यात येईल. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटनIndiaभारत