शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

असा किल्ला ज्यावर तोफेगोळेही व्हायचे निकामी, १३ वेळा आक्रमण करून इंग्रज फिरले होते माघारी! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 13:21 IST

भारतातील सगळेच किल्ले कोणत्या ना कोणत्या कारणाने लोकप्रिय आहेत. असाच एक किल्ला राजस्थानच्या भरतपुरमध्येही आहे.

भारतातील सगळेच किल्ले कोणत्या ना कोणत्या कारणाने लोकप्रिय आहेत. असाच एक किल्ला राजस्थानच्या भरतपुरमध्येही आहे. लोहगड(लोहागड) असं या किल्ल्याचं नाव आहे. कुणीही न जिंकू शकलेला हा भारतातील एकमेक किल्ला असल्याचं बोललं जातं. इतकेच काय तर इंग्रजांनीही इथे हार मानली होती.

या किल्ल्याची निर्मिती २८५ वर्षांआधी म्हणजे १९ फेब्रुवारी १७३३ ला जाट शासक महाराजा सूरजमल यांनी केली होती. त्या काळात बारूद आणि तोफेचा वापर अधिक होता. त्यामुळे हा किल्ला तयार करताना एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग करण्यात आला होता. ज्यामुळे तोफ गोळे किल्ल्याच्या भींतीवर पडूनही काहीच होत नव्हतं.

या किल्ल्याच्या निर्मितीच्या आधी एक रूंद आणि मजबूत दगडांची भींत तयार करण्यात आली. जेणेकरून तोफ गोळ्यांचा काहीच प्रभाव होऊ नये. त्यासाठी या भिंतीच्या चारही बाजूने शेकडो फूट कच्च्या मातीची भींत उभारण्यात आली आणि खाली खोल खड्डा करून त्यात पाणी टाकण्यात आलं. अशात जर दुश्मन सैन्याने पाणी पार केलं तरी ते सपाट भींतीवर चढू शकत नव्हते.

या किल्ल्यावर आक्रमण करणे कोणासाठीही सोपं नव्हतं. कारण तोफेतून निघणारे गोळे चिखलाच्या भींतीत घुसायचे आणि त्यांची आग विझली जायची. याने किल्ल्याचं काहीच नुकसान होत नव्हतं. त्यामुळेच दुश्मन किल्ल्याच्या आत प्रवेश मिळवू शकत नव्हते.

असे म्हणतात की, हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी इंग्रजांनी १३ वेळा आक्रमण केलं होतं. इंग्रज सैन्यांनी इथे शेकडो तोफगोळे फेकले होते. पण काहीच झालं नाही. ते १३ पैकी एकदाही किल्ल्यात घुसू शकले नाहीत. असे म्हणतात की, इंग्रज पुन्हा पुन्हा हरल्यानंतर निराश झाले आणि तेथून निघून गेले होते. 

इतिहासकार जेम्स टाड यांच्यानुसार, या किल्ल्याची सर्वात मोठी खासियत याच्या भींती होत्या. या भींती मातीपासून तयार केल्या होत्या. पण तरी सुद्धा हा किल्ला ताब्यात घेणे म्हणजे लोखंडाचे चणे खाण्यासारखंच होतं. 

टॅग्स :FortगडRajasthanराजस्थानTravel Tipsट्रॅव्हल टिप्स