शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

चीननंतर या किल्ल्यात आहे जगातली सगळ्यात मोठी भिंत, जाणून घ्या कधी आणि कसे जाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 13:46 IST

Kumbhalgarh fort : या किल्ल्याची भिंत ही जगातली दुसरी सर्वात मोठी भिंत आहे. ही भिंत ३६ किमी लांब आणि १५ फूट रुंद आहे. असे म्हटले जाते की, यावर एकत्र पाच घोडे धावू शकतात.

Kumbhalgarh fort : राजस्थानमधील राजसमन्द जिल्ह्यातील कुंभलगढ किल्ला हा भारतातील सर्वश्रेष्ठ किल्ल्यांपैकी एक आहे. १५व्या शतकात राणा कुंभा यांनी हा किल्ला बांधला होता. या किल्ल्याची भिंत ही जगातली दुसरी सर्वात मोठी भिंत आहे. ही भिंत ३६ किमी लांब आणि १५ फूट रुंद आहे. असे म्हटले जाते की, यावर एकत्र पाच घोडे धावू शकतात.

या किल्ल्याच्या आत ३६० मंदिरे आहेत. ज्यात ३०० प्राचीन जैन मंदिर आणि काही हिंदू मंदिरांचा समावेश आहे. हा एक अभेद्य किल्ला असून शत्रू कधीही या किल्ल्याची भिंत पार करु शकले नाहीत. किल्ल्याच्या चारही बाजूंनी ही भिंत उभारली असून ही भिंत चीननंतर जगातली दुसरी सर्वात मोठी भिंत आहे. 

राजस्थानच्या आमेर, जेसलमेर, रणथम्बोर, चित्तोडगढ आणि कुंभलगढ किल्ल्यांचा २०१३ मध्ये वर्ल्ड हेरिटेज साइट यादीत समावेश करण्यात आला आहे. 

किल्ल्याची बनावट

या किल्ल्याची उभारणी १४४३ मध्ये सुरु केली होती आणि तब्बल १५ वर्षांनंतर म्हणजेच १४५८ मध्ये हा किल्ला बांधून पूर्ण झाला होता. या किल्ल्याच्या उंच जागांवर मंदिरे, महल आणि राहण्यासाठी इमारती बांधल्या आहेत. तर सपाट जागांचा वापर शेतीसाठी केला गेलाय. तर खोल भागांचा वापर पाणी साचवण्यासाठी केला गेलाय. 

या किल्ल्याच्या आत आणखी एक किल्ला असून त्याला कटारगढ या नावाने ओळखले जाते. या किल्ल्याला सात विशाल दारं असून ते आजही सुरक्षित आहेत. या किल्ल्याच्या प्रमुख भागात बादल महल आणि कुंभा महल सर्वात वर आहेत. महाराणा उदय सिंह यांनाही पन्ना धायने याच किल्ल्यात लपवून पालन पोषण केलं होतं.

कधी जाल?

ऑक्टोबर ते मार्च महिन्यादरम्यानचा काळ इथे फिरायला जाण्यासाठी परफेक्ट काळ आहे. उन्हाळ्यात इथे फिरायला येण्याची चूक अजिबात करु नये. कारण त्यावेळी इथलं तापमान ३२ ते ४५ डिग्री असतं. तर पावसाळ्यात फार जास्त प्रमाणात पाऊस असतो. 

कसे जाल?

विमान मार्गे - उदयपूर हे येथील सर्वात जवळचं एअरपोर्ट आहे. हे कुंभलगढपासून दोन तासांच्या अंतरावर आहे. दिल्ली आणि मुंबईहून इथे येण्यासाठी फ्लाइट उपलब्ध आहेत. त्यासोबतच अहमदाबादहूनही तुम्ही विमानाने उदयपूरला पोहोचू शकता.

रेल्वे मार्ग - फालना हे येथील सर्वात जवळील रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वे स्टेशनपासून कुंभलगढ केवळ ८४ किमी अंतरावर आहे. सर्वच मोठ्या शहरांमधून इथे पोहोचण्यासाठी रेल्वे सेवा उपलब्ध आहे. 

रस्ते मार्ग - राजसमंदहून कुंभलगढचं अंतर हे ४८ किमी आहे. नाथव्दारहून ५१ किमी, सदरीहून ६० किमी, उदयपूरहून १०५ किमी, भीलवाडाहून १५७ किमी, जोधपूरहून २०७ किमी, अजमेरहून २१३ किमी आणि जयपूरहून ३४५ किमी अंतर आहे. 

टॅग्स :FortगडTravel Tipsट्रॅव्हल टिप्सJara hatkeजरा हटके