शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

एक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित

By नामदेव मोरे | Updated: June 11, 2023 13:36 IST

राजमाता जिजाऊंनी स्वत: मोहीम काढून हा किल्ला जिंकला असल्यामुळेही त्याला इतिहासात वेगळे स्थान प्राप्त झाले आहे. 

- नामदेव मोरे, किल्ले रांगणा ऊर्फ प्रसिद्धगड सह्याद्रीच्या रांगेतून दक्षिणेस पसरलेल्या व घाटमाथ्यापासून अलग झालेल्या डोंगरावर गोवा, कोकण व महाराष्ट्र यांच्या जवळ मोक्याच्या ठिकाणी वसला आहे. शिलाहार राजा दुसरा भोज याने हा किल्ला बांधला असला, तरी स्वराज्यात त्याला विशेष महत्त्व. राजमाता जिजाऊंनी स्वत: मोहीम काढून हा किल्ला जिंकला असल्यामुळेही त्याला इतिहासात वेगळे स्थान प्राप्त झाले आहे. 

कोल्हापूरच्या माणसांप्रमाणे तेथील किल्लेही रांगडेच. जिल्ह्यातील १३ प्रमुख किल्ल्यांमध्ये सर्वांत रांगडा म्हणून रांगणाची ओळख आहे. इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार असलेल्या या किल्ल्याविषयी ‘एक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित’ असे म्हटले जाते. या वैशिष्ट्यामुळेच इतिहासप्रेमींची पावले गडाकडे वळत असतात.

औरंगजेबाच्या दख्खन मोहिमेमध्येही त्याला हा किल्ला जिंकता आला नाही. गडाच्या भव्य बुरुजाच्या डाव्या बाजूने दरीच्या माथ्यावरून छोट्या वाटेने पुढे गेल्यावर पहिला दरवाजा येतो. रणमंडळ संज्ञेप्रमाणे या दरवाजाची रचना केली आहे. पहिल्या दरवाजापासून पुढे गेले की बुरुजाआड लपलेला दुसरा दरवाजा आढळतो. पायवाटेने पुढे गेले की कोरडा तलाव, दगडात बांधलेली जोती आढळतात. एक बुरुजात हनुमंताचे शिल्प कोरलेले पाहावयास मिळते. 

गडावर बारमाही पाणी असलेला तलाव पाहावयास मिळतो. रांगणाई मंदिर व इतर छोटी मंदिरेही आहेत. गडावर ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष, तलाव, दरवाजे, तटबंदी व पाहण्यासारखे बरेच काही आहे. गडाच्या सभोवतीचे जंगल, भौगोलिकदृष्ट्या असलेले महत्त्व लक्षात येते. प्रत्येक इतिहासप्रेमींनी भेट द्यावी, असाच हा किल्ला असून वर्षभर शिवप्रेमींचा गडावर राबता असतो.

काय पाहाल?

- गडावरील पहिला, दुसरा दरवाजा, रांगणाई देवीचे मंदिर, शिवमंदिर, वाडा, वाड्यातील विहिर, तटबंदी, जुन्या बांधकामाचे अवशेष, शिलालेख, भव्य तटबंदी, चिलखती बुरूज आहे. - कोकणातील सिंधुदुर्ग व कोल्हापूरच्या सीमेवर असलेला हा किल्ला म्हणजे स्वराज्याचा राखणदारच. - या गडालाही निसर्गाचे वरदान लाभले असून पुरातन बांधकामाच्या व इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा येथे पाहावयास मिळत असतात. - माथ्यावरील बारा कमानी असलेल्या दगडात खोदून काढलेला दरवाजाही पाहता येतो.

कसे जाल?

कोल्हापूर-गारगोटी कडगावमार्गे पारगावला जाता येते. पाटगावपासून तांब्याचीवाडी मार्गे पटवाडी व तेथून पुढे चिक्केवाडीपर्यंत जाता येते. चिक्केवाडीतून पायवाट रांगण्यावर जाते. कोकणातील कुडाळजवळील नारुर आणि केखडे गावातूनही रांगणा किल्ल्यावर जाण्यासाठी वाट आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTravel Tipsट्रॅव्हल टिप्स