शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

एक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित

By नामदेव मोरे | Updated: June 11, 2023 13:36 IST

राजमाता जिजाऊंनी स्वत: मोहीम काढून हा किल्ला जिंकला असल्यामुळेही त्याला इतिहासात वेगळे स्थान प्राप्त झाले आहे. 

- नामदेव मोरे, किल्ले रांगणा ऊर्फ प्रसिद्धगड सह्याद्रीच्या रांगेतून दक्षिणेस पसरलेल्या व घाटमाथ्यापासून अलग झालेल्या डोंगरावर गोवा, कोकण व महाराष्ट्र यांच्या जवळ मोक्याच्या ठिकाणी वसला आहे. शिलाहार राजा दुसरा भोज याने हा किल्ला बांधला असला, तरी स्वराज्यात त्याला विशेष महत्त्व. राजमाता जिजाऊंनी स्वत: मोहीम काढून हा किल्ला जिंकला असल्यामुळेही त्याला इतिहासात वेगळे स्थान प्राप्त झाले आहे. 

कोल्हापूरच्या माणसांप्रमाणे तेथील किल्लेही रांगडेच. जिल्ह्यातील १३ प्रमुख किल्ल्यांमध्ये सर्वांत रांगडा म्हणून रांगणाची ओळख आहे. इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार असलेल्या या किल्ल्याविषयी ‘एक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित’ असे म्हटले जाते. या वैशिष्ट्यामुळेच इतिहासप्रेमींची पावले गडाकडे वळत असतात.

औरंगजेबाच्या दख्खन मोहिमेमध्येही त्याला हा किल्ला जिंकता आला नाही. गडाच्या भव्य बुरुजाच्या डाव्या बाजूने दरीच्या माथ्यावरून छोट्या वाटेने पुढे गेल्यावर पहिला दरवाजा येतो. रणमंडळ संज्ञेप्रमाणे या दरवाजाची रचना केली आहे. पहिल्या दरवाजापासून पुढे गेले की बुरुजाआड लपलेला दुसरा दरवाजा आढळतो. पायवाटेने पुढे गेले की कोरडा तलाव, दगडात बांधलेली जोती आढळतात. एक बुरुजात हनुमंताचे शिल्प कोरलेले पाहावयास मिळते. 

गडावर बारमाही पाणी असलेला तलाव पाहावयास मिळतो. रांगणाई मंदिर व इतर छोटी मंदिरेही आहेत. गडावर ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष, तलाव, दरवाजे, तटबंदी व पाहण्यासारखे बरेच काही आहे. गडाच्या सभोवतीचे जंगल, भौगोलिकदृष्ट्या असलेले महत्त्व लक्षात येते. प्रत्येक इतिहासप्रेमींनी भेट द्यावी, असाच हा किल्ला असून वर्षभर शिवप्रेमींचा गडावर राबता असतो.

काय पाहाल?

- गडावरील पहिला, दुसरा दरवाजा, रांगणाई देवीचे मंदिर, शिवमंदिर, वाडा, वाड्यातील विहिर, तटबंदी, जुन्या बांधकामाचे अवशेष, शिलालेख, भव्य तटबंदी, चिलखती बुरूज आहे. - कोकणातील सिंधुदुर्ग व कोल्हापूरच्या सीमेवर असलेला हा किल्ला म्हणजे स्वराज्याचा राखणदारच. - या गडालाही निसर्गाचे वरदान लाभले असून पुरातन बांधकामाच्या व इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा येथे पाहावयास मिळत असतात. - माथ्यावरील बारा कमानी असलेल्या दगडात खोदून काढलेला दरवाजाही पाहता येतो.

कसे जाल?

कोल्हापूर-गारगोटी कडगावमार्गे पारगावला जाता येते. पाटगावपासून तांब्याचीवाडी मार्गे पटवाडी व तेथून पुढे चिक्केवाडीपर्यंत जाता येते. चिक्केवाडीतून पायवाट रांगण्यावर जाते. कोकणातील कुडाळजवळील नारुर आणि केखडे गावातूनही रांगणा किल्ल्यावर जाण्यासाठी वाट आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTravel Tipsट्रॅव्हल टिप्स