शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

इथे ना गर्दी ना धावपळ, फक्त मिळेल तुम्हाला हवी असलेली शांतता आणि निसर्गाची साथ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 12:04 IST

ऑफिसच्या धावपळीतून थोडावेळ बाहेर पडायचं असेल आणि टेन्शन फ्री होऊन शांत वेळ घालवायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक सुंदर ठिकाण शोधून आणलं आहे.

ऑफिसच्या धावपळीतून थोडावेळ बाहेर पडायचं असेल आणि टेन्शन फ्री होऊन शांत वेळ घालवायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक सुंदर ठिकाण शोधून आणलं आहे. या ठिकाणाबाबत तुम्ही फार ऐकलं नसेल. कारण इथे ना फार जास्त गर्दी असते ना जास्त लोकांना हे ठिकाण माहीत आहे. इथे तुम्हाला केवळ शांतता आणि निसर्गाची सुंदरता अनुभवायला मिळेल. नेहमीच्या धावपळीच्या जीवनाला विसरून एका वेगळ्याच विश्वात शिरायचं असेल तर तुमच्यासाठी हे ठिकाण परफेक्ट ठरेल. चला जाणून घेऊ कुठे आहे हे ठिकाण.

कुठे आहे हे ठिकाण?

हिमाचल प्रदेशमधील कल्पा हे ठिकाण आपल्या कल्पनेच्या पलिकडे आहे. कारण इथे इतकं काही आहे की, आपण कल्पनाही करू शकत नाही. तसं या ठिकाणावर राहणं थोडं कठिण आहे. पण अशक्य नाही आणि तुम्हाला हवी असलेली शांतता जर इथे मिळणार असेल तर त्यासाठी थोडा त्रास करून घेण्यात काय गैर. रोमांचक ट्रिपची आवड असणाऱ्यांना हे ठिकाण नक्कीच आवडेल. 

तुम्हाला हवी असलेली शांतता

तुम्ही कधीही न अनुभवलेली आणि तुम्हाला हवी असलेली शांतता इथे अनुभवायला मिळेल. कल्पा हे ठिकाण समुद्र सपाटीपासून २९६० मीटर उंचीवर स्थित एक छोटं गाव आहे. कल्पा येथे पोहोचण्यासाठी तुम्हाला सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन हे शिमला आहे. हे स्टेशन कल्पापासून साधारण २४४ किमी अंतरावर दूर आहे. आधी कल्पा किन्नोर जिल्ह्याचं मुख्यालय होतं. पण आता रिकांग पियो किन्नोरचं मुख्यालय आहे. शिमल्याहून तुम्हाला रिकांग पियो आणि कल्पासाठी सहज टॅक्सी मिळू शकते.

काय आहे खासियत?

कल्पा हे एक डोंगर-दऱ्यांच्या कुशीत वसलेलं एक छोटं सुंदर गाव आहे. इथे तुम्हाला शिमला, मनाली आणि नैनीतालसारखी गर्दी मिळणार नाही. तुम्हाला इथे केवळ शांतता मिळेल. तसेच येथून तुम्हाला कैलाश पर्वतावरील सुंदर नजारा बघायला मिळेल. त्यासोबतच इथे सफरचंदाच्या बागाही आहेत. या बागा येथील स्थानिकांचा मुख्य व्यवसाय आहे. तसेच इथे तुम्ही बौद्ध मठ आणि मंदिरेही बघू शकता.

ट्रेकिंगशिवाय ट्रिप अपूर्ण

गावातील चौकातून तुम्ही जर वरच्या दिशेने जाल तुम्हाला एक व्ह्यू पॉइंट मिळेल. येथून तुम्ही दुसऱ्या गावांचा सुंदर नजाराही बघू शकता. त्यासोबतच तुम्ही इथे ट्रेकिंगही करू शकता. इथे येऊन ट्रेकिंग नाही केलं तर तुमची ट्रिप अर्धवट राहील. त्यामुळे कल्पापासून रोघी गावापर्यंत ५ किमी अंतराचा ट्रेक करा. हा अनुभव आयुष्यभर तुमच्या स्मरणात राहील. इथे तुम्हाला कमी दरात हॉटेलही मिळू शकतात.

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशTravel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन