शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

इथे ना गर्दी ना धावपळ, फक्त मिळेल तुम्हाला हवी असलेली शांतता आणि निसर्गाची साथ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 12:04 IST

ऑफिसच्या धावपळीतून थोडावेळ बाहेर पडायचं असेल आणि टेन्शन फ्री होऊन शांत वेळ घालवायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक सुंदर ठिकाण शोधून आणलं आहे.

ऑफिसच्या धावपळीतून थोडावेळ बाहेर पडायचं असेल आणि टेन्शन फ्री होऊन शांत वेळ घालवायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक सुंदर ठिकाण शोधून आणलं आहे. या ठिकाणाबाबत तुम्ही फार ऐकलं नसेल. कारण इथे ना फार जास्त गर्दी असते ना जास्त लोकांना हे ठिकाण माहीत आहे. इथे तुम्हाला केवळ शांतता आणि निसर्गाची सुंदरता अनुभवायला मिळेल. नेहमीच्या धावपळीच्या जीवनाला विसरून एका वेगळ्याच विश्वात शिरायचं असेल तर तुमच्यासाठी हे ठिकाण परफेक्ट ठरेल. चला जाणून घेऊ कुठे आहे हे ठिकाण.

कुठे आहे हे ठिकाण?

हिमाचल प्रदेशमधील कल्पा हे ठिकाण आपल्या कल्पनेच्या पलिकडे आहे. कारण इथे इतकं काही आहे की, आपण कल्पनाही करू शकत नाही. तसं या ठिकाणावर राहणं थोडं कठिण आहे. पण अशक्य नाही आणि तुम्हाला हवी असलेली शांतता जर इथे मिळणार असेल तर त्यासाठी थोडा त्रास करून घेण्यात काय गैर. रोमांचक ट्रिपची आवड असणाऱ्यांना हे ठिकाण नक्कीच आवडेल. 

तुम्हाला हवी असलेली शांतता

तुम्ही कधीही न अनुभवलेली आणि तुम्हाला हवी असलेली शांतता इथे अनुभवायला मिळेल. कल्पा हे ठिकाण समुद्र सपाटीपासून २९६० मीटर उंचीवर स्थित एक छोटं गाव आहे. कल्पा येथे पोहोचण्यासाठी तुम्हाला सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन हे शिमला आहे. हे स्टेशन कल्पापासून साधारण २४४ किमी अंतरावर दूर आहे. आधी कल्पा किन्नोर जिल्ह्याचं मुख्यालय होतं. पण आता रिकांग पियो किन्नोरचं मुख्यालय आहे. शिमल्याहून तुम्हाला रिकांग पियो आणि कल्पासाठी सहज टॅक्सी मिळू शकते.

काय आहे खासियत?

कल्पा हे एक डोंगर-दऱ्यांच्या कुशीत वसलेलं एक छोटं सुंदर गाव आहे. इथे तुम्हाला शिमला, मनाली आणि नैनीतालसारखी गर्दी मिळणार नाही. तुम्हाला इथे केवळ शांतता मिळेल. तसेच येथून तुम्हाला कैलाश पर्वतावरील सुंदर नजारा बघायला मिळेल. त्यासोबतच इथे सफरचंदाच्या बागाही आहेत. या बागा येथील स्थानिकांचा मुख्य व्यवसाय आहे. तसेच इथे तुम्ही बौद्ध मठ आणि मंदिरेही बघू शकता.

ट्रेकिंगशिवाय ट्रिप अपूर्ण

गावातील चौकातून तुम्ही जर वरच्या दिशेने जाल तुम्हाला एक व्ह्यू पॉइंट मिळेल. येथून तुम्ही दुसऱ्या गावांचा सुंदर नजाराही बघू शकता. त्यासोबतच तुम्ही इथे ट्रेकिंगही करू शकता. इथे येऊन ट्रेकिंग नाही केलं तर तुमची ट्रिप अर्धवट राहील. त्यामुळे कल्पापासून रोघी गावापर्यंत ५ किमी अंतराचा ट्रेक करा. हा अनुभव आयुष्यभर तुमच्या स्मरणात राहील. इथे तुम्हाला कमी दरात हॉटेलही मिळू शकतात.

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशTravel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन