शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
2
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
3
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
4
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
5
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
6
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
7
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
8
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
9
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
10
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
11
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
12
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
13
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
14
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
15
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
16
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
17
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
18
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
19
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
20
वाढत्या वायुप्रदूषणाची चिंता; महापालिका पुन्हा अॅक्शन मोडवर, विकासकामांवर 'वॉच', अभियंते, पर्यावरण विभागातील अधिकारी, पोलिस करणार पाहणी
Daily Top 2Weekly Top 5

इथे ना गर्दी ना धावपळ, फक्त मिळेल तुम्हाला हवी असलेली शांतता आणि निसर्गाची साथ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 12:04 IST

ऑफिसच्या धावपळीतून थोडावेळ बाहेर पडायचं असेल आणि टेन्शन फ्री होऊन शांत वेळ घालवायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक सुंदर ठिकाण शोधून आणलं आहे.

ऑफिसच्या धावपळीतून थोडावेळ बाहेर पडायचं असेल आणि टेन्शन फ्री होऊन शांत वेळ घालवायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक सुंदर ठिकाण शोधून आणलं आहे. या ठिकाणाबाबत तुम्ही फार ऐकलं नसेल. कारण इथे ना फार जास्त गर्दी असते ना जास्त लोकांना हे ठिकाण माहीत आहे. इथे तुम्हाला केवळ शांतता आणि निसर्गाची सुंदरता अनुभवायला मिळेल. नेहमीच्या धावपळीच्या जीवनाला विसरून एका वेगळ्याच विश्वात शिरायचं असेल तर तुमच्यासाठी हे ठिकाण परफेक्ट ठरेल. चला जाणून घेऊ कुठे आहे हे ठिकाण.

कुठे आहे हे ठिकाण?

हिमाचल प्रदेशमधील कल्पा हे ठिकाण आपल्या कल्पनेच्या पलिकडे आहे. कारण इथे इतकं काही आहे की, आपण कल्पनाही करू शकत नाही. तसं या ठिकाणावर राहणं थोडं कठिण आहे. पण अशक्य नाही आणि तुम्हाला हवी असलेली शांतता जर इथे मिळणार असेल तर त्यासाठी थोडा त्रास करून घेण्यात काय गैर. रोमांचक ट्रिपची आवड असणाऱ्यांना हे ठिकाण नक्कीच आवडेल. 

तुम्हाला हवी असलेली शांतता

तुम्ही कधीही न अनुभवलेली आणि तुम्हाला हवी असलेली शांतता इथे अनुभवायला मिळेल. कल्पा हे ठिकाण समुद्र सपाटीपासून २९६० मीटर उंचीवर स्थित एक छोटं गाव आहे. कल्पा येथे पोहोचण्यासाठी तुम्हाला सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन हे शिमला आहे. हे स्टेशन कल्पापासून साधारण २४४ किमी अंतरावर दूर आहे. आधी कल्पा किन्नोर जिल्ह्याचं मुख्यालय होतं. पण आता रिकांग पियो किन्नोरचं मुख्यालय आहे. शिमल्याहून तुम्हाला रिकांग पियो आणि कल्पासाठी सहज टॅक्सी मिळू शकते.

काय आहे खासियत?

कल्पा हे एक डोंगर-दऱ्यांच्या कुशीत वसलेलं एक छोटं सुंदर गाव आहे. इथे तुम्हाला शिमला, मनाली आणि नैनीतालसारखी गर्दी मिळणार नाही. तुम्हाला इथे केवळ शांतता मिळेल. तसेच येथून तुम्हाला कैलाश पर्वतावरील सुंदर नजारा बघायला मिळेल. त्यासोबतच इथे सफरचंदाच्या बागाही आहेत. या बागा येथील स्थानिकांचा मुख्य व्यवसाय आहे. तसेच इथे तुम्ही बौद्ध मठ आणि मंदिरेही बघू शकता.

ट्रेकिंगशिवाय ट्रिप अपूर्ण

गावातील चौकातून तुम्ही जर वरच्या दिशेने जाल तुम्हाला एक व्ह्यू पॉइंट मिळेल. येथून तुम्ही दुसऱ्या गावांचा सुंदर नजाराही बघू शकता. त्यासोबतच तुम्ही इथे ट्रेकिंगही करू शकता. इथे येऊन ट्रेकिंग नाही केलं तर तुमची ट्रिप अर्धवट राहील. त्यामुळे कल्पापासून रोघी गावापर्यंत ५ किमी अंतराचा ट्रेक करा. हा अनुभव आयुष्यभर तुमच्या स्मरणात राहील. इथे तुम्हाला कमी दरात हॉटेलही मिळू शकतात.

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशTravel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन