शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात थंड ठिकाण भारतात, 'या' हिवाळ्यात देऊ शकता भेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 12:38 IST

सामान्यपणे उन्हाळ्यात थंड असलेल्या शहरात लोक फिरायला जातात. पण काही लोक असेही असतात जे थंडीच्या ठिकाणी हिवाळ्यातही फिरायला जातात.

(Image Credit : wikipedia.org)

सामान्यपणे उन्हाळ्यात थंड असलेल्या शहरात लोक फिरायला जातात. पण काही लोक असेही असतात जे थंडीच्या ठिकाणी हिवाळ्यातही फिरायला जातात. त्यांना वेगळा, भन्नाट अनुभव घ्यायचा असतो. तुम्हाही हिवाळ्यात सर्वात थंड ठिकाणाला भेट द्यायची असेल तर तुम्ही भारतातील सर्वात थंड ठिकाणाला भेट द्या. आज आम्ही तुम्हाला जगातल्या सर्वात थंड ठिकाणांपैकी एक आणि भारतातील सर्वात जास्त थंड ठिकाणाची माहिती देणार आहोत.

जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे द्रास

(Image Credit : Social Media)

जम्मू-काश्मीरच्या कारगिल जिल्ह्यात एक छोटसं गाव द्रास आहे. या ठिकाणाबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. पण हे जगातलं सर्वात थंड दुसरं ठिकाण आहे. पहिल्या क्रमांकावर रशियातील ओइमाकॉन जो हे छोटं शहर आहे. द्रासमध्ये तापमान -२० डिग्रीपर्यंत पोहोचतं. याने मेंदूच्या नसाही गोठल्या जातात. 

गेट वे ऑफ लडाख

(Image Credit : thebetterindia.com)

द्रास या ठिकाणाला गेटवे ऑफ लडाख असंही म्हटलं जातं. इथे अनेक हॉटेल्स असून तिथे राहण्याची पूर्ण व्यवस्था आहे. पण जास्त लोक इथे रात्री थांबत नाही. कारण इथे रात्री गोठवणारी थंडी असते. सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान द्रास येथील तापमान २३ डिग्रीच्या आसपास राहतं. त्यामुळे या वातावरणात तुम्ही इथे फिरायला जाऊ शकता. 

कारगिल वॉर मेमोरिअल

(Image Credit : YouTube)

हे ठिकाण प्रसिद्ध असण्याचं आणखी एक कारण म्हणजे इथे तयार करण्यात आलेलं कारगिल वॉर मेमोरिअल. याला द्रास वॉर मेमोरिअल असंही म्हटलं जातं. हे मेमोरिअल तोलोलिंग डोंगरामध्ये इंडियन आर्मीने तयार केलं. १९९९ मध्ये तयार करण्यात आलेल्या या मेमोरिअलचा उद्देश भारत-पाक कारगिल युद्धातील शहीद भारतीय सैनिकांना मानवंदना देणं हा आहे. 

जोजिला पास

(Image Credit : wikipedia.org)

इथे फिरायला येणाऱ्या लोकांसाठी फिरण्यासाठी वेगवेगळी ठिकाणे आहेत. कारगिल वॉर मेमोरिअलसोबतच येथील जोजिला पासही बघण्यासारखं आहे. इथे साहसी प्रवासी मोठ्या प्रमाणात येतात.  लडाखला काश्मीरशी जोडणाऱ्या या भागातील रस्त्यांवर वेगळ्या अनुभवासाठी लोक इथे येतात.

सुरू व्हॅली ट्रॅक

(Image Credit : wikipedia.org)

येथील डोंगराळ रस्त्यांवर ट्रेकिंगचा आनंदही तुम्ही घेऊ शकता. सुरू व्हॅलीहून द्रासपर्यंतचा ट्रेकिंगचा रोमांचक प्रवास तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील. डोंगरावर पसरलेली बर्फाची सुंदर चादर तुम्हीही कधीही विसरू शकणार नाही. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सJammu Kashmirजम्मू-काश्मीर