शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

सीमा सडक संघटनेकडून भारत-चीन सीमेवर तयार होणार ७५ कॅफे, पर्यटकांसाठी खास सोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 10:55 IST

१२ राज्ये आणि काही केंद्रशासित प्रदेशात असे ७५ कॅफे बांधले जाणार आहेत. यामुळे सीमा भागात व्यावसायिक उलाढाल वाढेल आणि सीमावर्ती भागातील जनतेला रोजगार निर्माण होणार आहे. शिवाय पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा त्यामुळे उपलब्ध होणार आहेत.

देशभरातील आंतरराष्ट्रीय, दुर्गम भागात रस्ते बांधण्याचे काम करणाऱ्या सीमा सडक संघटन म्हणजे बीआरओ तर्फे आता भारत चीन आणि भारत पाकिस्तान सीमा भागात कॅफे उभारण्याचे काम सुरु झाले असून रक्षा मंत्रालयाने यासाठी परवानगी दिली आहे. १२ राज्ये आणि काही केंद्रशासित प्रदेशात असे ७५ कॅफे बांधले जाणार आहेत. यामुळे सीमा भागात व्यावसायिक उलाढाल वाढेल आणि सीमावर्ती भागातील जनतेला रोजगार निर्माण होणार आहे. शिवाय पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा त्यामुळे उपलब्ध होणार आहेत.

सेनेच्या युद्ध गरजा पूर्ण करतानाच बीआरओ पाकिस्तान आणि चीन सीमा भागातील नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक उत्थानासाठी प्रयत्नशील आहे. या दुर्गम भागात पर्यटन वाढू लागले आहे. या भागातील प्रेक्षणीय स्थळांना मोठ्या संखेने पर्यटक भेटी देऊ लागले आहेत. त्यामुळे दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेला हा भाग आता विकसित होऊ लागला आहे.

विषम भौगोलिक परिस्थिती आणि विचित्र हवामान यामुळे पर्यटकांना पायाभूत सुविधा मिळणे या कॅफे मुळे शक्य होणार आहे. हे कॅफे खोलण्यासाठी परवाने दिले जात असून त्याची मुदत १५ वर्षे आहे. ही मुदत पाच वर्षे नंतर वाढवून घेता येणार आहे. या कॅफे परिसरात पार्किंग, फूड प्लाझा, रेस्टरूम, मेडिकल रूम अश्या सुविधा मिळणार आहेत. एकूण ७५ कॅफे पैकी १९ अरुणाचल प्रदेशात, १२ जम्मू काश्मीर मध्ये, १४ लदाख मध्ये, ११ उत्तराखंड, ७ हिमाचल, ५ राजस्थान, २ आसाम आणि १-१ नागालँड, पंजाब, सिक्कीम आणि प.बंगाल, मणिपूर येथे असतील.

 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स