शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

राजीव गांधी INS Virat ने 'या' ठिकाणी गेले होते फिरायला, जाणून घ्या या सुंदर ठिकाणाची खासियत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 17:30 IST

१९८७ सालाचे शेवटचे दिवस होते. जगभरातील लोक नव्या वर्षाच्या स्वागताच्या तयारीला लागले होते. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी परिवारासोबत आणि खास मित्रांसोबत भारतातीलच एका आयलॅंडवर गेले होते.

(Image Credit : cruisemapper.com)

दिल्लीमध्ये आयोजित प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्यावर टिका केली. पंतप्रधान म्हणाले की, राजीव गांधी हे INS Virat ही युद्धनौका घेऊन फिरायला गेले होते. INS Virat चा राजीव गांधी हे खाजगी वाहनासारखा वापर करत होते, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. त्यानंतर राजीव गांधी कुठे फिरायला गेले होते, त्या ठिकाणाचीही चर्चा सुरू झाली आहे. 

ते १९८७ सालाचे शेवटचे दिवस होते. जगभरातील लोक नव्या वर्षाच्या स्वागताच्या तयारीला लागले होते. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी परिवारासोबत आणि खास मित्रांसोबत भारतातीलच एका आयलॅंडवर गेले होते, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपानंतर या द्वीपाची चर्चा रंगली आहे. 

काय आहे त्या द्वीपाचं नाव?

ज्या जागेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहेत, त्या ठिकाणाचं नाव आहे बंगाराम(Bangaram) आणि हा द्वीप केंद्र शासित प्रदेश लक्ष्यद्वीपचा भाग आहे. या द्वीपचं एकूण क्षेत्रफळ साधारण ०.६२३ स्क्वेअर किलोमीटर आहे. या द्वीपाच्या मधोमध एक खाऱ्या पाण्याचा तलाव आहे. या तलावाच्या चारही बाजूंनी नारळाची झाडे आहेत. 

बंगाराम व्दीपवर टूरिज्म

बंगाराम द्वीपवर १९७४ मध्ये टूरिज्मला सुरूवात झाली. तेव्हा तिथे आयलॅंड बीच रिसॉर्टची सुरूवात झाली होती. त्यावेळी इथे पोहेचणे फार कठीण होते. कारण कमर्शिअल फ्लाइट इथपर्यंत येत नव्हती. नंतर जेव्हा कोच्चि ते अगत्तीपर्यंत विमान सेवा सुरू झाली तेव्हा बंगाराममध्ये पर्यटनाची दारे उघडी झाली. या रिसॉर्टमध्ये ६० कॉटेज आहेत. तशी तर लक्ष्यद्वीपमध्ये दारूबंदी आहे. पण या आयलॅंडवर तुम्ही मद्यसेवन करू शकता. हा द्वीप रातोरात चर्चेत तेव्हा आला, जेव्हा तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आपल्या कुटूंबियांसोबत आणि मित्रपरिवारासोबत इथे सुट्टी घालवायला आले होते. 

बंगाराममध्ये काय खास?

(Image Credit : TripAdvisor)

जर तुम्हाला बंगाराम द्वीपला फिरायला जायचं असेल तर आधी तुम्हाला हे जाणून घ्यावं लागेल की, तिथे काय खास आहे. इथे तुम्हाला समुद्राचा सुंदर नजारा बघायला मिळेल आणि पाणीही भारतातील इतर समुद्र किनाऱ्यांपेक्षा अधिक स्वच्छ मिळेल. समुद्राच्या मधे दूरदूरपर्यंत पसरलेली वाळू, ताडाची झाडे, समुद्राचं गरम पाणी, मनमोहक वातावरण, सुंदर सूर्यास्त हे सगळं इथे अनुभवता येऊ शकतं. तसेच इथे जाऊन तुम्ही स्कूबा डायव्हिंग, डीप सी फिशिंगसारख्या अॅडव्हेंचरचा आनंदही घेऊ शकता. 

कसे पोहोचाल?

बंगाराममध्ये सुट्टी घालवण्याचं मनात ठरवलं असेल तर आता हे जाणून घ्या की, इथे पोहोचाल कसे. येथील जवळचं एअरपोर्ट अगत्ती आहे. त्यासोबतच कोचीन आतंरराष्ट्रीय एअरपोर्टला उतरूनही तुम्ही इथे पोहोचू शकता. या दोन्ही ठिकाणांवर पोहोचण्यासाठी बंगळुरू, कोच्चि, चेन्नई व देशातील इतर विमान सेवा उपलब्ध आहेत. 

कधी जाल?

(Image Credit : TravelTriangle)

इथे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात निसर्गाचं सुंदर रूप बघू शकता. तसेच उन्हाळ्यात तुम्ही इथे मार्च ते मे महिन्यादरम्यान जाऊ शकता. या दिवसात इथे थोडी गरमी असते. पावसाळ्यात जून ते ऑगस्टमध्ये इथे जाल तर येथील हिरवळ आणि वातावरण पाहून तुम्ही या ठिकाणाच्या प्रेमात पडाल. तसेच हिवाळ्यात तुम्ही इथे डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात जाऊ शकता. 

बंगारामला जाताना या गोष्टी ठेवा लक्षात

- बंगारामला जाताना परमिट घेणे विसरू नका. इथे जाण्यासाठी कोच्चिमध्ये ट्रॅव्हल एजन्टकडून तुम्ही परमिट घेऊ शकता. 

- इथे जाताना सोबत कॅश घेऊन जावी लागेल, कारण इथे एटीएम नाहीत. 

- इथे कॉटेजची संख्या कमी आहे. अशात जर इथे जाण्याचा प्लॅन असेल तर आधीच बुकिंग करून ठेवावं. 

- जर तुम्ही खाण्याचे शौकीन असाल तर कोच्चिवरूनच स्नॅक्स घेऊन जा. 

- इथे गेल्यावर तुम्हाला नेटवर्कची अडचण येऊ शकते. जर तुमच्याकडे बीएसएनएलचं मोबाइल कनेक्शन असेल तर अडचण कमी येईल. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन