शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

राजीव गांधी INS Virat ने 'या' ठिकाणी गेले होते फिरायला, जाणून घ्या या सुंदर ठिकाणाची खासियत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 17:30 IST

१९८७ सालाचे शेवटचे दिवस होते. जगभरातील लोक नव्या वर्षाच्या स्वागताच्या तयारीला लागले होते. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी परिवारासोबत आणि खास मित्रांसोबत भारतातीलच एका आयलॅंडवर गेले होते.

(Image Credit : cruisemapper.com)

दिल्लीमध्ये आयोजित प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्यावर टिका केली. पंतप्रधान म्हणाले की, राजीव गांधी हे INS Virat ही युद्धनौका घेऊन फिरायला गेले होते. INS Virat चा राजीव गांधी हे खाजगी वाहनासारखा वापर करत होते, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. त्यानंतर राजीव गांधी कुठे फिरायला गेले होते, त्या ठिकाणाचीही चर्चा सुरू झाली आहे. 

ते १९८७ सालाचे शेवटचे दिवस होते. जगभरातील लोक नव्या वर्षाच्या स्वागताच्या तयारीला लागले होते. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी परिवारासोबत आणि खास मित्रांसोबत भारतातीलच एका आयलॅंडवर गेले होते, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपानंतर या द्वीपाची चर्चा रंगली आहे. 

काय आहे त्या द्वीपाचं नाव?

ज्या जागेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहेत, त्या ठिकाणाचं नाव आहे बंगाराम(Bangaram) आणि हा द्वीप केंद्र शासित प्रदेश लक्ष्यद्वीपचा भाग आहे. या द्वीपचं एकूण क्षेत्रफळ साधारण ०.६२३ स्क्वेअर किलोमीटर आहे. या द्वीपाच्या मधोमध एक खाऱ्या पाण्याचा तलाव आहे. या तलावाच्या चारही बाजूंनी नारळाची झाडे आहेत. 

बंगाराम व्दीपवर टूरिज्म

बंगाराम द्वीपवर १९७४ मध्ये टूरिज्मला सुरूवात झाली. तेव्हा तिथे आयलॅंड बीच रिसॉर्टची सुरूवात झाली होती. त्यावेळी इथे पोहेचणे फार कठीण होते. कारण कमर्शिअल फ्लाइट इथपर्यंत येत नव्हती. नंतर जेव्हा कोच्चि ते अगत्तीपर्यंत विमान सेवा सुरू झाली तेव्हा बंगाराममध्ये पर्यटनाची दारे उघडी झाली. या रिसॉर्टमध्ये ६० कॉटेज आहेत. तशी तर लक्ष्यद्वीपमध्ये दारूबंदी आहे. पण या आयलॅंडवर तुम्ही मद्यसेवन करू शकता. हा द्वीप रातोरात चर्चेत तेव्हा आला, जेव्हा तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आपल्या कुटूंबियांसोबत आणि मित्रपरिवारासोबत इथे सुट्टी घालवायला आले होते. 

बंगाराममध्ये काय खास?

(Image Credit : TripAdvisor)

जर तुम्हाला बंगाराम द्वीपला फिरायला जायचं असेल तर आधी तुम्हाला हे जाणून घ्यावं लागेल की, तिथे काय खास आहे. इथे तुम्हाला समुद्राचा सुंदर नजारा बघायला मिळेल आणि पाणीही भारतातील इतर समुद्र किनाऱ्यांपेक्षा अधिक स्वच्छ मिळेल. समुद्राच्या मधे दूरदूरपर्यंत पसरलेली वाळू, ताडाची झाडे, समुद्राचं गरम पाणी, मनमोहक वातावरण, सुंदर सूर्यास्त हे सगळं इथे अनुभवता येऊ शकतं. तसेच इथे जाऊन तुम्ही स्कूबा डायव्हिंग, डीप सी फिशिंगसारख्या अॅडव्हेंचरचा आनंदही घेऊ शकता. 

कसे पोहोचाल?

बंगाराममध्ये सुट्टी घालवण्याचं मनात ठरवलं असेल तर आता हे जाणून घ्या की, इथे पोहोचाल कसे. येथील जवळचं एअरपोर्ट अगत्ती आहे. त्यासोबतच कोचीन आतंरराष्ट्रीय एअरपोर्टला उतरूनही तुम्ही इथे पोहोचू शकता. या दोन्ही ठिकाणांवर पोहोचण्यासाठी बंगळुरू, कोच्चि, चेन्नई व देशातील इतर विमान सेवा उपलब्ध आहेत. 

कधी जाल?

(Image Credit : TravelTriangle)

इथे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात निसर्गाचं सुंदर रूप बघू शकता. तसेच उन्हाळ्यात तुम्ही इथे मार्च ते मे महिन्यादरम्यान जाऊ शकता. या दिवसात इथे थोडी गरमी असते. पावसाळ्यात जून ते ऑगस्टमध्ये इथे जाल तर येथील हिरवळ आणि वातावरण पाहून तुम्ही या ठिकाणाच्या प्रेमात पडाल. तसेच हिवाळ्यात तुम्ही इथे डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात जाऊ शकता. 

बंगारामला जाताना या गोष्टी ठेवा लक्षात

- बंगारामला जाताना परमिट घेणे विसरू नका. इथे जाण्यासाठी कोच्चिमध्ये ट्रॅव्हल एजन्टकडून तुम्ही परमिट घेऊ शकता. 

- इथे जाताना सोबत कॅश घेऊन जावी लागेल, कारण इथे एटीएम नाहीत. 

- इथे कॉटेजची संख्या कमी आहे. अशात जर इथे जाण्याचा प्लॅन असेल तर आधीच बुकिंग करून ठेवावं. 

- जर तुम्ही खाण्याचे शौकीन असाल तर कोच्चिवरूनच स्नॅक्स घेऊन जा. 

- इथे गेल्यावर तुम्हाला नेटवर्कची अडचण येऊ शकते. जर तुमच्याकडे बीएसएनएलचं मोबाइल कनेक्शन असेल तर अडचण कमी येईल. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन