शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

भारतातील स्कॉटलंन्ड म्हणा किंवा दुसरं काश्मिर; 'या' ठिकाणांचं सौंदर्य आहे लाजवाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 15:22 IST

उंच-उंच डोंगर आणि त्यांच्यावर पसरलेली हिरवीगार झाडं पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पुरेसं आहे. हिरव्यागार सुंदर घाटांमध्ये पसरलेले कॉफी आणि चहाचे मळे, संत्र्यांच्या बागा पाहणं म्हणजे, स्वर्ग सुखचं. अशा सुंदर ठिकाणी फिरायला जाण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते.

उंच-उंच डोंगर आणि त्यांच्यावर पसरलेली हिरवीगार झाडं पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पुरेसं आहे. हिरव्यागार सुंदर घाटांमध्ये पसरलेले कॉफी आणि चहाचे मळे, संत्र्यांच्या बागा पाहणं म्हणजे, स्वर्ग सुखचं. अशा सुंदर ठिकाणी फिरायला जाण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. भारतातही अनेक सुंदर ठिकाणं आहेत. ज्यांना परदेशातील ठिकाणांच्या उपमा देण्यात आलेल्या आहेत. अनेक ठिकाणांना स्कॉटलॅन्ड असं तर काहींना मिनी काश्मिर असंही संबोधलं जातं.  

कुर्ग, कर्नाटक 

कर्नाटकातील पश्चिमी घाटावर वसलेला एक जिल्हा ज्या कुर्ग किंवा कोडागु असं म्हणतात. येथे चारही बाजूंना निसर्गसौंदर्य पसरलेलं दिसेल. येथे निसर्गसौंदर्यासोबतच पाहण्यासाठी खूप काही आहे. जर तुम्ही कुर्गमध्ये फिरण्यासाठी जात असाल तर या ठिकाणी जायला विसरू नका. 

राजा की सीट 

कुर्ग हिल स्टेशनमध्ये एक ठिकाण असं आहे ज्याला राजा की सीट असं म्हटलं जातं. या ठिकाणावर कुर्गचे राजा संध्याकाळी सुर्यास्त पाहण्यासाठी जात असतं. तुम्हीही एका संध्याकाळी सूर्यास्ताचं दृश्य अनुभवण्यासाठी जाऊ शकता. हा अद्भूत नजारा तुम्हीही कधीही विसरू शकत नाही. 

अब्बे फॉल

अब्बे वॉटर फॉल हा सुंदर चहाच्या बागांमध्ये स्थित आहे. याच्या आजूबाजूला खूपसारी सुंदर ठिकाणे आहेत. त्यामुळे इथे भेट देणाऱ्या पर्यटकांची मोठी गर्दी असते. डोंगरावरुन खाली कोसळणारं पाणी डोळ्यांचं पारणं फेडतात आणि मनालाही वेगळाच आनंद देऊन जातं. यासोबतच येथील इरुपू फॉल्सही आवर्जून बघावा असाच आहे. इथे एक पवित्र मंदिरही आहे. 

इरप्पू फॉल

भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांमध्ये समाविष्ट असणारा हा घाट आपल्या अनोख्या सौंदर्यासाठी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. येथे एक इरप्पू फॉल असून यांच सौंदर्य पाहून तुम्हीही हैराण व्हाल. हा झरा पुढे जाऊन लक्ष्मणतीर्थ नदीला मिळतो. त्यामुळे याला पवित्र मानलं जातं त्यामुळेच अनेक लोक येथे येत असतात. 

दुबारे एलिफंट कॅम्प 

जर तुम्हाला हत्तीसारख्या विशाल प्राण्यांना भेट द्यायची असेल तर येथे तुम्ही नक्की जा. येथे हत्तीना प्रशिक्षण देण्यात येतं. तुम्ही येथे येऊन त्यांच्यासोबत वेळ घालवू शकता.

 बयालकुप्पे

हे भारतातील दुसंर सर्वात जास्त तिबेटी लोकसंख्या असणारं ठिकाण आहे. चारही बाजूंनी मठांनी वेढलेलं हे ठिकाण तुम्हाला अध्यात्मिक जगामध्ये घेऊन जाईल. येथील सर्वात प्रसिद्ध मठ आहे नमद्रोलिंग जो सुंदर बाग-बगिच्यांनी वेढलेला आहे. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटनIndiaभारत