शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

भारतातील स्कॉटलंन्ड म्हणा किंवा दुसरं काश्मिर; 'या' ठिकाणांचं सौंदर्य आहे लाजवाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 15:22 IST

उंच-उंच डोंगर आणि त्यांच्यावर पसरलेली हिरवीगार झाडं पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पुरेसं आहे. हिरव्यागार सुंदर घाटांमध्ये पसरलेले कॉफी आणि चहाचे मळे, संत्र्यांच्या बागा पाहणं म्हणजे, स्वर्ग सुखचं. अशा सुंदर ठिकाणी फिरायला जाण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते.

उंच-उंच डोंगर आणि त्यांच्यावर पसरलेली हिरवीगार झाडं पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पुरेसं आहे. हिरव्यागार सुंदर घाटांमध्ये पसरलेले कॉफी आणि चहाचे मळे, संत्र्यांच्या बागा पाहणं म्हणजे, स्वर्ग सुखचं. अशा सुंदर ठिकाणी फिरायला जाण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. भारतातही अनेक सुंदर ठिकाणं आहेत. ज्यांना परदेशातील ठिकाणांच्या उपमा देण्यात आलेल्या आहेत. अनेक ठिकाणांना स्कॉटलॅन्ड असं तर काहींना मिनी काश्मिर असंही संबोधलं जातं.  

कुर्ग, कर्नाटक 

कर्नाटकातील पश्चिमी घाटावर वसलेला एक जिल्हा ज्या कुर्ग किंवा कोडागु असं म्हणतात. येथे चारही बाजूंना निसर्गसौंदर्य पसरलेलं दिसेल. येथे निसर्गसौंदर्यासोबतच पाहण्यासाठी खूप काही आहे. जर तुम्ही कुर्गमध्ये फिरण्यासाठी जात असाल तर या ठिकाणी जायला विसरू नका. 

राजा की सीट 

कुर्ग हिल स्टेशनमध्ये एक ठिकाण असं आहे ज्याला राजा की सीट असं म्हटलं जातं. या ठिकाणावर कुर्गचे राजा संध्याकाळी सुर्यास्त पाहण्यासाठी जात असतं. तुम्हीही एका संध्याकाळी सूर्यास्ताचं दृश्य अनुभवण्यासाठी जाऊ शकता. हा अद्भूत नजारा तुम्हीही कधीही विसरू शकत नाही. 

अब्बे फॉल

अब्बे वॉटर फॉल हा सुंदर चहाच्या बागांमध्ये स्थित आहे. याच्या आजूबाजूला खूपसारी सुंदर ठिकाणे आहेत. त्यामुळे इथे भेट देणाऱ्या पर्यटकांची मोठी गर्दी असते. डोंगरावरुन खाली कोसळणारं पाणी डोळ्यांचं पारणं फेडतात आणि मनालाही वेगळाच आनंद देऊन जातं. यासोबतच येथील इरुपू फॉल्सही आवर्जून बघावा असाच आहे. इथे एक पवित्र मंदिरही आहे. 

इरप्पू फॉल

भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांमध्ये समाविष्ट असणारा हा घाट आपल्या अनोख्या सौंदर्यासाठी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. येथे एक इरप्पू फॉल असून यांच सौंदर्य पाहून तुम्हीही हैराण व्हाल. हा झरा पुढे जाऊन लक्ष्मणतीर्थ नदीला मिळतो. त्यामुळे याला पवित्र मानलं जातं त्यामुळेच अनेक लोक येथे येत असतात. 

दुबारे एलिफंट कॅम्प 

जर तुम्हाला हत्तीसारख्या विशाल प्राण्यांना भेट द्यायची असेल तर येथे तुम्ही नक्की जा. येथे हत्तीना प्रशिक्षण देण्यात येतं. तुम्ही येथे येऊन त्यांच्यासोबत वेळ घालवू शकता.

 बयालकुप्पे

हे भारतातील दुसंर सर्वात जास्त तिबेटी लोकसंख्या असणारं ठिकाण आहे. चारही बाजूंनी मठांनी वेढलेलं हे ठिकाण तुम्हाला अध्यात्मिक जगामध्ये घेऊन जाईल. येथील सर्वात प्रसिद्ध मठ आहे नमद्रोलिंग जो सुंदर बाग-बगिच्यांनी वेढलेला आहे. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटनIndiaभारत