शहरं
Join us  
Trending Stories
1
जागोजागी कमांडो, ५०० CCTV...; नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी दिल्लीत चोख सुरक्षा
2
Video : एका खेळाडूवर अवलंबून नाही! IND vs PAK लढतीपूर्वी विराटच्या प्रश्नावर Rohit Sharmaचं उत्तर
3
पंकजाताई निवडून नाही आल्या तर...; व्हायरल व्हिडिओतील युवकाचा मृतदेह आढळला 
4
"मला मंत्री व्हायचं नाही, तर..."; मंत्रिपदाच्या शर्यतीतून श्रीकांत शिंदेंची माघार?
5
निकालानंतर 'या' शहरातील लोकांची चांदी; जमिनीच्या भावात तब्बल ५०-१०० टक्क्यांनी वाढ
6
३ धावांवर ३ विकेट्स! Quinton de Kock 'डायमंड डक' ठरला, आफ्रिकेचा डाव गडगडला, Video 
7
रेसकोर्सची जमीन हडपण्याचा प्रयत्न थांबवा; आदित्य ठाकरे यांचे राज्यपालांना पत्र
8
"NDA सरकार पडणार", PM मोदींच्या शपथविधीपूर्वी ममता बॅनर्जींचे मोठे भाकीत
9
रोहित शर्माला पुन्हा दुखापत, संजना गणेसनची पोस्ट अन् जसप्रीत बुमराह नेतृत्व करण्याची चर्चा
10
Sonia Gandhi : सोनिया गांधी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा, खरगे यांचा प्रस्ताव मंजूर
11
दक्षिण आफ्रिकेने फास आवळला, नेदरलँड्सचा संघ कसाबसा शतकपार पोहोचला
12
Monsoon Update : महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी! मान्सून काही तासांत मुंबईत धडकणार
13
राष्ट्रीय महामार्गावरचा दिशादर्शक फलक काेसळला; दुचाकीस्वार ठार 
14
...तर INDIA आघाडीनं आणखी ९ जागा जिंकल्या असत्या; महाराष्ट्रातील ४ जागांचा समावेश
15
"एखादं मंत्रिपद मिळावं म्हणून शिंदे गटाची आदळआपट सुरु"; राजकीय भूकंपावरुन सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर
16
रोहित, विराट यांना मित्रच समज...! शाहीन आफ्रिदीला भारतीय चाहत्यांना प्रेमळ सल्ला, Video 
17
SBIच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या; एक्सपर्ट म्हणाले, "१००० च्या वर जाणार..."
18
चीनमधून एक बातमी आली अन् सोनं 'धडाम'...; गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढण्याची शक्यता!
19
Flipkart पूर्वी PhonePe चा येणार आयपीओ, काय आहे प्लॅन; जाणून घ्या
20
'भिंतीवरचं पेंटिंग मिटवशील पण सत्य...?', दलजीत कौरने पुन्हा पतीवर साधला निशाणा

जिल्हा परिषद, पंचायत समितीत शिवसेना-भाजपाला मतदान नको  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 6:54 AM

राज्यभरातील एसटी कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगारांनी चार दिवसांचा संप पुकारला होता. त्या वेळी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला समिती नेमण्याचे आदेश दिले.

कल्याण : राज्यभरातील एसटी कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगारांनी चार दिवसांचा संप पुकारला होता. त्या वेळी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला समिती नेमण्याचे आदेश दिले. या समितीने तीन आठवड्यांत अहवाल सादर करणे आवश्यक होते. मात्र, राज्य सरकारने हा अहवालच उच्च न्यायालयात सादर केलेला नाही. सरकारने कर्मचाºयांच्या डोळ्यांत धूळफेक केल्याने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांत शिवसेना-भाजपाला मतदान न करण्याचा निर्णय मनसे एसटी कर्मचारी संघटनेने घेतला आहे. मनसेच्या एसटी कर्मचारी संघटनेचे सचिव महादेव म्हस्के यांनी ही माहिती दिली.यासंदर्भात कल्याणमध्ये गुरुवारी एक बैठक झाली. कल्याण आणि ठाणे एसटी डेपोतील कामगारांच्या कृती समितीचे पदाधिकारीही या बैठकीला उपस्थित होते. राज्यात भाजपा आणि शिवसेना सत्तेत आहे. या सत्ताधारी पक्षाने कामगारांविरोधात भूमिका घेतल्याचे म्हस्के यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी तर पुढील २५ वर्षांत वेतन आयोग देता येणार नाही, असे वक्तव्य करून कर्मचाºयांच्या जखमेवर मीठ चोळले. याबाबत, आॅक्टोबर महिन्यात एसटी कामगारांनी पुकारलेल्या संपासमोर प्रशासनाला नमते घ्यावे लागले. हा संप मोडीत काढण्यासाठी सरकारने समिती नेमली. समितीचा अहवाल तीन आठवड्यांत विचारात घेऊन तो उच्च न्यायालयाकडे सादर करणे आवश्यक होते. पण, हा अहवालच अद्याप सादर झालेला नाही. सत्ताधारी सेना-भाजपा हे कामगारविरोधी असल्याने त्यांनी या आंदोलनास आश्वासनाची पाने पुसली.ठाणे जिल्ह्यात गावागावांत एसटी फिरते. गावकºयांची प्रवासी सेवा करणाºया एसटी कामगारांची सरकार उपेक्षा करते. या सरकारच्या विरोधात अर्थात शिवसेना-भाजपाविरोधात मतदान करा, असे आवाहन एसटी कर्मचारी ठाणे जिल्ह्यातील विविध गावांत फिरून मतदारांना करणार आहे.कल्याणमध्ये एसटी कामगार संघटनेच्या मनसेप्रणीत संघटनेची बैठक पार पडली. त्या बैठकीला ठाणे बस डेपोतील कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीस महाराष्ट्र एसटी कृती समिती व शिवसेना व भाजपाप्रणीत कामगार संघटना उपस्थित नव्हत्या. या संघटना वगळून हा निर्णय घेतल्याचे म्हस्के यांनी स्पष्ट केले आहे.एसटी कामगारांची शिवसेना-भाजपाविरोधात असलेली नाराजी निवडणुकांत भोवण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपा स्वबळावर लढत आहे, तर शिवसेनेने राष्ट्रवादीची साथ घेतली आहे. एसटी कामगारांनी अशा प्रकारची भूमिका जाहीर केल्याने त्याचा फटका केवळ शिवसेना-भाजपाला बसणार नसून राष्ट्रवादीलाही बसू शकतो.काँग्रेसला होणार फायदाच्निवडणुकीच्या रिंगणात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी उतरले आहे. काँग्रेस आणि अन्य पक्षांचे उमेदवार तुरळक स्वरूपात दिसतात. प्रमुख पक्ष शिवसेना-भाजपा एकमेकांविरोधात उभे ठाकले असताना त्यांनाच मतदान न करण्याचे आवाहन केले जात असल्यास त्याचा अप्रत्यक्ष फायदा काँग्रेसला मिळू शकतो.

टॅग्स :thaneठाणे