शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शून्य उपयोग, लॉकडाऊनचा फटका शहरातील व्यापाऱ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 23:58 IST

लॉकडाऊनचा फटका शहरातील व्यापाºयांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. असे असतानाही शहरातील व्यापारी प्रशासनाला सातत्याने सहकार्य करीत आहेत.

- पंकज पाटील अंबरनाथ : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून शहरातील व्यापाऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. शहरात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. मात्र या निर्णयाचा कोणताही फायदा कोरोनाची संख्या कमी करण्यासाठी झालेला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान करून जे लॉकडाऊन राबविण्यात आले त्याचा कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शून्य उपयोग झाला हेच समोर आले आहे. लॉकडाऊनचा फटका शहरातील व्यापाºयांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. असे असतानाही शहरातील व्यापारी प्रशासनाला सातत्याने सहकार्य करीत आहेत. मात्र लॉकडाऊन जाहीर झाल्यावर रस्त्यांवर कोणीच दिसणार नाही याची काळजी घेणे गरजेचे होते.मात्र गेल्या तीन आठवड्यात प्रशासनामार्फत कडक लॉकडाऊन राबवण्यासाठी कोणतीच ठोस उपाययोजना राबवली गेली नाही. केवळ दुकाने बंद ठेवून प्रशासन लॉकडाऊनचे यश शोधण्याच्या मागे लागले आहे.शहरातील रिक्षा आणि दुचाकीस्वार रस्त्यावर भटकत आहेत. नागरिकही विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. अशा परिस्थितीमुळे शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कितपत यश येईल याची शाश्वती खुद्द प्रशासनही देऊ शकत नाही. शहरात लॉक डाऊन शिथिल झाल्यावर व्यापाºयांना एक दिवसाआड दुकान उघडण्याची परवानगी दिली होती. मात्र त्याच काळात कोरोनाचा प्रभाव वाढल्याने पुन्हा लॉकडाऊन जाहीर केले. असे असूनही रुग्णांच्या संख्येत वाढच झालेली आहे.शहराच्या हिताच्या दृष्टीने आम्ही प्रशासनाला प्रत्येकवेळी मदत केली आहे. आता प्रशासनाने व्यापाºयांच्या हिताचाही विचार करावा. शहरात व्यापाºयांना योग्य अटी आणि नियम घालून व्यवसाय करण्याची संधी द्यावी एवढीच माफक अपेक्षा आहे. २२ मार्चपासून ते १२ जुलैपर्यंत मोजक्या दिवसांत व्यापाºयांना व्यवसाय करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आता व्यापारी आपला तोटा किती सहन करणार, याचाही विचार करण्याची गरज आहे.- खानजी धल, अध्यक्ष,अंबरनाथ व्यापारी संघ

टॅग्स :thaneठाणे