शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

होय, राज्यपालांना महाशिवआघाडीचे नेते भेटणार, एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 14:42 IST

राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम असला तरी, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार

ठाणे - सत्ता-स्थापनेपेक्षा शेतकऱ्यांचे हित महत्वाचे असून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी महाआघाडीचे नेते राज्यपालांची भेट घेणार असल्याचे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीदेखील सुरु करण्याची मागणी यावेळी करण्यात येणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे महाआघाडीचे नेते राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेविषयी काही हालचाली करतील अशी अपेक्षा करण्यात आली होती, ती एवढ्या लवकर होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम असला तरी, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देत आहेत. आज महाआघाडीचे नेते राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेविषयी काही हालचाली करतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी राज्यपालांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ठाणे महापालिकेच्या महापौर पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल करण्यात आला, यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सत्ता-स्थापनेपेक्षा त्यांना आर्थिक मदत मिळणे आवश्यक असल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले. सत्तास्थापनेबाबत सर्वच आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अधिकार दिले आहेत. त्यामुळे तेच यासंदर्भात निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, महापौर पदासाठी आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केलेल्या नरेश म्हस्के आणि पल्लवी कदम यांना शुभेच्छाही दिल्या.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणेShiv Senaशिवसेना