शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

यंदा निर्माल्यही झाले ५० टक्क्यांनी कमी, ठाणेकरांचे सामाजिक भान  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 02:05 IST

ठाणे महापालिका प्रदूषण नियंत्रण कक्ष आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने निर्माल्य संकलन आणि व्यवस्थापन हा उपक्रम ठाण्यात राबवला जातो. यंदाचे या उपक्रमाचे १० वे वर्ष आहे. या उपक्रमांतर्गत विसर्जन घाटांवर निर्माल्य कलश ठेवले जातात.

- स्नेहा पावसकरठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अनेकांनी गणेशोत्सव साजरा केला नाही किंवा अतिशय साध्या पद्धतीने केला. अर्थातच याचा परिणाम निर्माल्य संकलनावरही झाला. आतापर्यंत सात दिवसांचे गणपती विसर्जन झालेले असून ठाण्यात केवळ १३ ते १४ टन निर्माल्य गोळा झाले आहे. दरवर्षीच्या निर्माल्य संकलनाच्या तुलनेत ही संख्या अतिशय कमी असून यंदा ५० टक्के घट झाली आहे. त्याचबरोबर यंदा थर्माकोलचा वापर १०० टक्के न करता पर्यावरणप्रेमी अशी ओळख असलेल्या ठाणेकरांनी सामाजिक भान जपले आहे.ठाणे महापालिका प्रदूषण नियंत्रण कक्ष आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने निर्माल्य संकलन आणि व्यवस्थापन हा उपक्रम ठाण्यात राबवला जातो. यंदाचे या उपक्रमाचे १० वे वर्ष आहे. या उपक्रमांतर्गत विसर्जन घाटांवर निर्माल्य कलश ठेवले जातात. स्वयंसेवक ते निर्माल्य स्वीकारतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही निर्माल्य कलश ठिकठिकाणी ठेवण्यात आले होते. तसेच काहींनी गणपती घरीच विसर्जन केले असले तरी निर्माल्य मात्र जमा केले. कोरोनामुळे साधेपणाने साजऱ्या झालेल्या गणेशोत्सवाचा परिणाम निर्माल्य संकलनावरही पाहायला मिळाला. दीड दिवसाच्या गणपती विसर्जनादरम्यान सुमारे तीन टन, पाच दिवसांचे गणपती विसर्जनादरम्यान साधारण साडेचार टन तर सात दिवसाच्या विसर्जनादरम्यान सहा टन निर्माल्य जमा झाले आहे. एकूण १३ ते १४ टन निर्माल्य जमा झाले आहे.दरवर्षी सात दिवसात सुमारे ३० टन निर्माल्य जमा होते, मात्र यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा झाल्याने सजावट, आरास, हार-फुले यावरचा खर्च बहुतांश टाळला गेला आहे. परिणामी निर्माल्यात ५० टक्के घट झाली.विशेष म्हणजे यंदाच्या निर्माल्यात थर्माकोल अजिबात आढळले नाही. थर्माकोलचा वापर ठाणेकरांनी केलेला नाही, असेच दिसते. प्लास्टिकचा वापरही ८० टक्के केलेला नाही. तसेच इतर अविघटनशील पदार्थांचा वापरही करणे ठाणेकरांनी टाळलेले दिसले. सजावटीला यंदा प्राधान्यच न दिल्याने सजावटीचे साहित्यही निर्माल्यात कमी होते. हे निर्माल्य वर्गीकरण करून पुढे प्रक्रियेसाठी पाठवले आहे.- भटू सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी,समर्थ भारत व्यासपीठजनजागृतीचा होत आहे फायदा : यापूर्वी सजावटीसाठी थर्माकोलबरोबर प्लास्टिक, कार्डबोर्ड, हिरे, चमकीच्या टिकल्या यांचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जात असे. गेल्या काही वर्षांत झालेल्या जनजागृतीमुळे या सर्वांचा वापर कमी होत गेला. मात्र कोरोनामुळे यंदा कुठल्याही वस्तू आढळल्या नाहीत.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव