शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

यंदा निर्माल्यही झाले ५० टक्क्यांनी कमी, ठाणेकरांचे सामाजिक भान  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 02:05 IST

ठाणे महापालिका प्रदूषण नियंत्रण कक्ष आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने निर्माल्य संकलन आणि व्यवस्थापन हा उपक्रम ठाण्यात राबवला जातो. यंदाचे या उपक्रमाचे १० वे वर्ष आहे. या उपक्रमांतर्गत विसर्जन घाटांवर निर्माल्य कलश ठेवले जातात.

- स्नेहा पावसकरठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अनेकांनी गणेशोत्सव साजरा केला नाही किंवा अतिशय साध्या पद्धतीने केला. अर्थातच याचा परिणाम निर्माल्य संकलनावरही झाला. आतापर्यंत सात दिवसांचे गणपती विसर्जन झालेले असून ठाण्यात केवळ १३ ते १४ टन निर्माल्य गोळा झाले आहे. दरवर्षीच्या निर्माल्य संकलनाच्या तुलनेत ही संख्या अतिशय कमी असून यंदा ५० टक्के घट झाली आहे. त्याचबरोबर यंदा थर्माकोलचा वापर १०० टक्के न करता पर्यावरणप्रेमी अशी ओळख असलेल्या ठाणेकरांनी सामाजिक भान जपले आहे.ठाणे महापालिका प्रदूषण नियंत्रण कक्ष आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने निर्माल्य संकलन आणि व्यवस्थापन हा उपक्रम ठाण्यात राबवला जातो. यंदाचे या उपक्रमाचे १० वे वर्ष आहे. या उपक्रमांतर्गत विसर्जन घाटांवर निर्माल्य कलश ठेवले जातात. स्वयंसेवक ते निर्माल्य स्वीकारतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही निर्माल्य कलश ठिकठिकाणी ठेवण्यात आले होते. तसेच काहींनी गणपती घरीच विसर्जन केले असले तरी निर्माल्य मात्र जमा केले. कोरोनामुळे साधेपणाने साजऱ्या झालेल्या गणेशोत्सवाचा परिणाम निर्माल्य संकलनावरही पाहायला मिळाला. दीड दिवसाच्या गणपती विसर्जनादरम्यान सुमारे तीन टन, पाच दिवसांचे गणपती विसर्जनादरम्यान साधारण साडेचार टन तर सात दिवसाच्या विसर्जनादरम्यान सहा टन निर्माल्य जमा झाले आहे. एकूण १३ ते १४ टन निर्माल्य जमा झाले आहे.दरवर्षी सात दिवसात सुमारे ३० टन निर्माल्य जमा होते, मात्र यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा झाल्याने सजावट, आरास, हार-फुले यावरचा खर्च बहुतांश टाळला गेला आहे. परिणामी निर्माल्यात ५० टक्के घट झाली.विशेष म्हणजे यंदाच्या निर्माल्यात थर्माकोल अजिबात आढळले नाही. थर्माकोलचा वापर ठाणेकरांनी केलेला नाही, असेच दिसते. प्लास्टिकचा वापरही ८० टक्के केलेला नाही. तसेच इतर अविघटनशील पदार्थांचा वापरही करणे ठाणेकरांनी टाळलेले दिसले. सजावटीला यंदा प्राधान्यच न दिल्याने सजावटीचे साहित्यही निर्माल्यात कमी होते. हे निर्माल्य वर्गीकरण करून पुढे प्रक्रियेसाठी पाठवले आहे.- भटू सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी,समर्थ भारत व्यासपीठजनजागृतीचा होत आहे फायदा : यापूर्वी सजावटीसाठी थर्माकोलबरोबर प्लास्टिक, कार्डबोर्ड, हिरे, चमकीच्या टिकल्या यांचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जात असे. गेल्या काही वर्षांत झालेल्या जनजागृतीमुळे या सर्वांचा वापर कमी होत गेला. मात्र कोरोनामुळे यंदा कुठल्याही वस्तू आढळल्या नाहीत.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव