शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

शांता शेळके यांच्या साहित्याचा श्रोता हाच समीक्षक होता - वामनराव देशपांडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 17:47 IST

शांताबाई शेळके यांच्याकडे असामान्य अशी बुद्धीमत्ता होती तरी देखील त्यांना आपली कला फुलविण्यासाठी कष्ट घ्यावे लागले होते.

डोंबिवली- शांताबाई शेळके यांच्याकडे असामान्य अशी बुद्धीमत्ता होती तरी देखील त्यांना आपली कला फुलविण्यासाठी कष्ट घ्यावे लागले होते. त्यांच्या कवितांमध्ये तत्वज्ञानाचा बेस आहे. म्हणूनच गदिमा, शांता शेळके यांच्या वाटयाला समीक्षा कधी गेली नाही. श्रोता हाच त्यांचा समीक्षक होता, असे मत ज्येष्ठ साहित्यिक वामनराव देशपांडे यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे डोंबिवली शाखा आणि डोंबिवली ग्रंथसंग्रहालय, डोंबिवली (प.) यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानाचे पहिले पुष्प कवियत्री शांता शेळके या विषयावर गुंफण्यात आले होते. यावेळी देशपांडे बोलत होते. विनायक सभागृहात शुक्रवारी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. लक्ष्मीनारायण ट्रस्टचे माधव जोशी, मसापचे कार्याध्यक्ष वामनराव देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

देशपांडे म्हणाले, शांताबाईच्या कविता या आकाशापर्यंत नेण्यासाठी संगीतकार व गायकांनी मदत केली. त्यामुळे त्या एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचल्या आहेत. विद्या विनयन  शोभते असे म्हणतात. त्यांचे एक रूप म्हणजे शांताबाई होत्या. शांताबाई हा विषय एक-दोन तासामध्ये मांडता येण्यासारखा नाही. ही सुरुवात असू शकते. समग्र शांताबाई समजून घेतल्या पाहिजेत. त्यांच्याकडून विनम्रता शिकून घ्यावी. माणसांनी स्वत: मधील दुर्गणांचा शोध घ्यावा आणि दुसऱ्या व्यक्तीमधील चांगल्या गुणांकडे पाहावे. त्यांचे कौतुक करावे. दुसऱ्या व्यक्तीमधील दोष काढले तर व्यक्ती कोमजून जाते. समीक्षक दोष काढण्याचे काम करतात, असे ही त्यांनी सांगितले. 

माधव जोशी म्हणाले, शांता शेळके या चांगल्या कवयित्री होत्या. तशा त्या ललित लेख ही त्याच तोडीचे लिहीत असे. ललित लेखन, कथा, चित्रपटकथा, अनुवाद असे साहित्याचे सर्व प्रकार त्यांनी हाताळले आहेत. त्यांना बोलण्याची हौस होती. त्यानंतर त्यांच्या एकेदिवशी मनात आले की आपण मौन बाळगावे. पण मौन धरल्यानंतर भाजीवाले, दूधवाले यांच्याशी संवाद कसा साधणार म्हणून त्यांनी कमी बोलण्याचे ठरविले. या सवयींचा मला पुढे जाऊन फायदा झाला. यामुळे समोरच्या व्यक्तींचे मला निरीक्षण करता येऊ लागले. शांताबाई या गोष्टीवेल्लाळ होत्या. संस्कृत भाषेचा प्रचंड व्यासंग होता. त्यांचा परिणाम म्हणून त्यांना शब्दकळा प्रसन्न होती. शब्दांचा अतोनात सोस असल्यामुळे त्यांच्या भाषेला एक ओघवती अशी प्रसन्नशैली होती. चिंतन आणि वाचन यांच्यामुळे त्यांच्या लिखाणात वाचनीयता आहे. आपल्या लिखाणात त्या सहजरीत्या संदर्भ त्या देत असतात, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली