शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
4
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
5
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
6
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
7
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
8
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
9
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
10
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
11
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
12
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
13
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
14
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
15
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
16
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
17
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
18
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
19
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक नदी दिनविशेष, ठाणे जिल्ह्यातील नद्यांच्या आरोग्याची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 00:26 IST

संडे अँकर। पर्यावरणतज्ज्ञांचे मत : मागील १५ ते २० वर्षांत झाला कोंडमारा

स्नेहा पावसकर ।

ठाणे : ठाणे जिल्ह्यात सुमारे १० नद्या असून त्या जिल्ह्यासह मुंबई शहराचीही तहान भागवतात. या नद्यांचा आपण पिण्याच्या पाण्यासाठी आणि एकूणच वापरासाठी पुरेपूर उपयोग करून घेतला आहे. पण, गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील नद्यांच्या आरोग्याची हेळसांड झाली आहे. त्या काही प्रमाणात दूषित झाल्या आहेत. औद्योगिक, रासायनिक प्रदूषणांमुळे मृतावस्थेत गेल्या आहेत. या नद्यांचे सौंदर्य राखायचे असेल आणि येत्या काळातील पाण्याचे दुर्भिक्ष टाळायचे असेल, तर नैसर्गिक संपत्ती असलेल्या नदीचे मानवाने संवर्धन केले पाहिजे. नदीप्रति असलेली आपली वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारी ओळखून वर्तन ठेवले पाहिजे, असे मत पर्यावरणतज्ज्ञांनी रविवारी साजऱ्या होणाºया जागतिक नदी दिनाच्या निमित्ताने व्यक्त केले.

नदी ही आपली माता आहे. तिच आपले खºया अर्थाने भरणपोषण करते. ठाणे जिल्ह्यात उल्हास, बारवी, भातसा, काळू, वालधुनी, भारंगी, शाई अशा अनेक नद्या-उपनद्या आहेत. जिल्ह्यात दरवर्षी मोठा पाऊस पडत असल्याने या नद्यांना पाणीही पुष्कळ असते. गेल्या काही वर्षांत सरासरी पाऊस कमी झाल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीटंचाई जाणवते. ठाणे जिल्ह्यासह मुंबईची तहान भागवण्यासाठी या नद्यांवर आपण धरणे बांधली. धरणांमुळे आपला पिण्याच्या आणि वापरण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. पण, दुसरीकडे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरू होणारे नवे औद्योगिक प्रकल्प, होणाºया रासायनिक प्रक्रिया, शेतीत होणारे औषधी प्रयोग, सांडपाणी यामुळे गेल्या काही वर्षांत नद्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित होऊ लागल्या आहेत. पावसाळ्याचे दिवसवगळता वर्षभर या नद्या जणू मृतावस्थेत असतात. या नद्यांची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यांचे संवर्धन केले पाहिजे, असे मतज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक अविनाश कुबल यांनी व्यक्त केले.पाणी पिण्यायोग्य राहिले नाहीमागील १५-२० वर्षांतच या नद्यांची अतिशय वाईट अवस्था झालेली आहे. म्हणजे साधारण १५-२० वर्षांपूर्वी जिल्ह्यातील नदीच्या पाण्याची गुणवत्ता चांगली होती. पाणी पिण्यायोग्य, वापरण्यायोग्य होते. पण, आता ती राहिली नाही. यासाठी प्रशासन आपल्या पातळीवर नेमून दिलेल्या जबाबदारीनुसार योग्य ती खबरदारी घेत आहे. मात्र, नागरिकांनीही वेळीच आपली जबाबदारी ओळखून नद्या प्रदूषित होणाºया क्रिया थांबवल्या पाहिजे, असेही कुबल म्हणाले. 

टॅग्स :thaneठाणेriverनदी