शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

जागतिक नदी दिनविशेष, ठाणे जिल्ह्यातील नद्यांच्या आरोग्याची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 00:26 IST

संडे अँकर। पर्यावरणतज्ज्ञांचे मत : मागील १५ ते २० वर्षांत झाला कोंडमारा

स्नेहा पावसकर ।

ठाणे : ठाणे जिल्ह्यात सुमारे १० नद्या असून त्या जिल्ह्यासह मुंबई शहराचीही तहान भागवतात. या नद्यांचा आपण पिण्याच्या पाण्यासाठी आणि एकूणच वापरासाठी पुरेपूर उपयोग करून घेतला आहे. पण, गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील नद्यांच्या आरोग्याची हेळसांड झाली आहे. त्या काही प्रमाणात दूषित झाल्या आहेत. औद्योगिक, रासायनिक प्रदूषणांमुळे मृतावस्थेत गेल्या आहेत. या नद्यांचे सौंदर्य राखायचे असेल आणि येत्या काळातील पाण्याचे दुर्भिक्ष टाळायचे असेल, तर नैसर्गिक संपत्ती असलेल्या नदीचे मानवाने संवर्धन केले पाहिजे. नदीप्रति असलेली आपली वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारी ओळखून वर्तन ठेवले पाहिजे, असे मत पर्यावरणतज्ज्ञांनी रविवारी साजऱ्या होणाºया जागतिक नदी दिनाच्या निमित्ताने व्यक्त केले.

नदी ही आपली माता आहे. तिच आपले खºया अर्थाने भरणपोषण करते. ठाणे जिल्ह्यात उल्हास, बारवी, भातसा, काळू, वालधुनी, भारंगी, शाई अशा अनेक नद्या-उपनद्या आहेत. जिल्ह्यात दरवर्षी मोठा पाऊस पडत असल्याने या नद्यांना पाणीही पुष्कळ असते. गेल्या काही वर्षांत सरासरी पाऊस कमी झाल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीटंचाई जाणवते. ठाणे जिल्ह्यासह मुंबईची तहान भागवण्यासाठी या नद्यांवर आपण धरणे बांधली. धरणांमुळे आपला पिण्याच्या आणि वापरण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. पण, दुसरीकडे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरू होणारे नवे औद्योगिक प्रकल्प, होणाºया रासायनिक प्रक्रिया, शेतीत होणारे औषधी प्रयोग, सांडपाणी यामुळे गेल्या काही वर्षांत नद्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित होऊ लागल्या आहेत. पावसाळ्याचे दिवसवगळता वर्षभर या नद्या जणू मृतावस्थेत असतात. या नद्यांची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यांचे संवर्धन केले पाहिजे, असे मतज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक अविनाश कुबल यांनी व्यक्त केले.पाणी पिण्यायोग्य राहिले नाहीमागील १५-२० वर्षांतच या नद्यांची अतिशय वाईट अवस्था झालेली आहे. म्हणजे साधारण १५-२० वर्षांपूर्वी जिल्ह्यातील नदीच्या पाण्याची गुणवत्ता चांगली होती. पाणी पिण्यायोग्य, वापरण्यायोग्य होते. पण, आता ती राहिली नाही. यासाठी प्रशासन आपल्या पातळीवर नेमून दिलेल्या जबाबदारीनुसार योग्य ती खबरदारी घेत आहे. मात्र, नागरिकांनीही वेळीच आपली जबाबदारी ओळखून नद्या प्रदूषित होणाºया क्रिया थांबवल्या पाहिजे, असेही कुबल म्हणाले. 

टॅग्स :thaneठाणेriverनदी