शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
2
'या' ५ घटनांचा उल्लेख करत राहुल गांधींनी निशाणा साधला; म्हणाले, “मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात”
3
कतारने पुन्हा एकदा दाखवली आपली ताकद! एका फोनवर थांबवलं पाक-अफगाणिस्तानचं युद्ध 
4
Video - भलताच स्टार्टअप! तिकीट काढलं, मेट्रोत चढला अन् मागितली भीक; प्रवासी झाले हैराण
5
रुबलच नाही तर चिनी चलन वापरून भारत करतंय तेल खरेदीचं पेमेंट; रशियाच्या उपपंतप्रधानांचा दावा
6
राज ठाकरेंनी केली नक्कल, अजितदादांनी दिले उत्तर; म्हणाले, “मिमिक्री करणारे फक्त आता...”
7
अंकुश चौधरी-तेजश्री प्रधानच्या 'ती सध्या काय करते'चा सीक्वेल येणार? सतीश राजवाडे म्हणाले...
8
रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारताची 'नो कमेंट', पण भूमिकेवर ठाम
9
धक्कादायक! मोबाईलवर गेम खेळताना १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; 'सडन गेमर डेथ' म्हणजे काय?
10
मिलेनियल्स ठरवत आहेत घरांचा ट्रेंड; १ ते १.५ कोटी रुपयांच्या घरांना मिळतेय सर्वाधिक पसंती, कोणतं शहर आवडीचं?
11
'तो' एक सेकंद वाचवून गेला जीव! किरकोळ वाद झाला, पत्नी उडी मारणार तेवढ्यात पतीने हात पकडला
12
चीनने दुखती नस दाबताच अमेरिका नरमला! भारताकडे मागितली मदत; म्हणाले, आपण आता...
13
Diwali 2025: गोसेवा ही दत्त कृपेची गुरुकिल्ली? वसुबारसेच्या मुहूर्तावर जाणून घ्या 'हे' गुपित!
14
FASTag वार्षिक पास २ महिन्यांतच ठरला 'सुपरहिट'; २५ लाख युजर्सचा आकडा पार, किती झालं ट्रान्झॅक्शन?
15
दिवाळी २०२५: लक्ष्मी देवीला घरी आणायचा विचार करताय? ‘या’ गोष्टी करा; स्थापना नियम, योग्य दिशा
16
वर्षाला व्याजच ५०० कोटी मिळेल, किंग खानला पान मसाल्याच्या जाहिरातीची वेळ का यावी? ध्रुव राठीचा सवाल
17
मोठी गंमत! उद्धव ठाकरे करणार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन; गेल्यावर्षीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली...  
18
त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर पत्नीला कायमचं संपवलं; इंजेक्शन देऊन पतीनेच केले खतरनाक कृत्य
19
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
20
जहीर इकबालने कॅमेऱ्यासमोरच सोनाक्षीच्या बेबी बंपवर ठेवला हात अन्... Video व्हायरल

जागतिक नदी दिनविशेष, ठाणे जिल्ह्यातील नद्यांच्या आरोग्याची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 00:26 IST

संडे अँकर। पर्यावरणतज्ज्ञांचे मत : मागील १५ ते २० वर्षांत झाला कोंडमारा

स्नेहा पावसकर ।

ठाणे : ठाणे जिल्ह्यात सुमारे १० नद्या असून त्या जिल्ह्यासह मुंबई शहराचीही तहान भागवतात. या नद्यांचा आपण पिण्याच्या पाण्यासाठी आणि एकूणच वापरासाठी पुरेपूर उपयोग करून घेतला आहे. पण, गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील नद्यांच्या आरोग्याची हेळसांड झाली आहे. त्या काही प्रमाणात दूषित झाल्या आहेत. औद्योगिक, रासायनिक प्रदूषणांमुळे मृतावस्थेत गेल्या आहेत. या नद्यांचे सौंदर्य राखायचे असेल आणि येत्या काळातील पाण्याचे दुर्भिक्ष टाळायचे असेल, तर नैसर्गिक संपत्ती असलेल्या नदीचे मानवाने संवर्धन केले पाहिजे. नदीप्रति असलेली आपली वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारी ओळखून वर्तन ठेवले पाहिजे, असे मत पर्यावरणतज्ज्ञांनी रविवारी साजऱ्या होणाºया जागतिक नदी दिनाच्या निमित्ताने व्यक्त केले.

नदी ही आपली माता आहे. तिच आपले खºया अर्थाने भरणपोषण करते. ठाणे जिल्ह्यात उल्हास, बारवी, भातसा, काळू, वालधुनी, भारंगी, शाई अशा अनेक नद्या-उपनद्या आहेत. जिल्ह्यात दरवर्षी मोठा पाऊस पडत असल्याने या नद्यांना पाणीही पुष्कळ असते. गेल्या काही वर्षांत सरासरी पाऊस कमी झाल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीटंचाई जाणवते. ठाणे जिल्ह्यासह मुंबईची तहान भागवण्यासाठी या नद्यांवर आपण धरणे बांधली. धरणांमुळे आपला पिण्याच्या आणि वापरण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. पण, दुसरीकडे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरू होणारे नवे औद्योगिक प्रकल्प, होणाºया रासायनिक प्रक्रिया, शेतीत होणारे औषधी प्रयोग, सांडपाणी यामुळे गेल्या काही वर्षांत नद्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित होऊ लागल्या आहेत. पावसाळ्याचे दिवसवगळता वर्षभर या नद्या जणू मृतावस्थेत असतात. या नद्यांची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यांचे संवर्धन केले पाहिजे, असे मतज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक अविनाश कुबल यांनी व्यक्त केले.पाणी पिण्यायोग्य राहिले नाहीमागील १५-२० वर्षांतच या नद्यांची अतिशय वाईट अवस्था झालेली आहे. म्हणजे साधारण १५-२० वर्षांपूर्वी जिल्ह्यातील नदीच्या पाण्याची गुणवत्ता चांगली होती. पाणी पिण्यायोग्य, वापरण्यायोग्य होते. पण, आता ती राहिली नाही. यासाठी प्रशासन आपल्या पातळीवर नेमून दिलेल्या जबाबदारीनुसार योग्य ती खबरदारी घेत आहे. मात्र, नागरिकांनीही वेळीच आपली जबाबदारी ओळखून नद्या प्रदूषित होणाºया क्रिया थांबवल्या पाहिजे, असेही कुबल म्हणाले. 

टॅग्स :thaneठाणेriverनदी