शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

जागतिक मूत्रपिंड दिनविशेष: भारतात दरवर्षी पडते दोन लाख रुग्णांची भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 00:33 IST

दिनेश महाजन यांची माहिती; डायलेसिस सेंटरची कमतरता, आजार टाळण्यासाठी जागृतीची गरज

डोंबिवली : मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांमध्ये किडनी विकाराचे प्रमाण अधिक आहे. मधुमेह असलेल्या ७० टक्के रुग्णांना तर, उच्च रक्तदाब असलेल्या २० टक्के लोकांना किडनीचे विकार होतात. भारतात दरवर्षी दोन लाख किडनीच्या रुग्णांची भर पडत आहे. मात्र, त्यांच्या तुलनेत डायलेसिस सेंटरची संख्या कमी आहे. किडनीचे विकार वाढत असताना मुळातच हा रोग होऊ नये, याकरिता जागृतीची गरज आहे, असे मत मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. दिनेश महाजन यांनी व्यक्त केले.जागतिक मूत्रपिंड दिनाच्या निमित्ताने गुरुवारी डोंबिवली पत्रकार संघातर्फे डॉ. महाजन यांचा ‘तरुण वयातील किडनी विकार आणि त्यापासून बचाव’ या विषयावर वार्तालाप झाला. यावेळी ते बोलत होते. डॉ. महाजन म्हणाले, डोंबिवली शहरात डायलेसिस सेंटरची संख्या कमी आहे. किडनीने आपले कार्य करणे बंद केले की, त्यावर कोणताही उपचार नाही. किडनीरोग वाढू नये, याकरिता उपचार केले जातात. काही अल्प प्रमाणात अनुवांशिक रुग्ण दिसून येत आहे. भारतात किडनी रुग्णांचे १७ टक्के प्रमाण आहे. ३० ते ३५ वयोगटांतील तरुणांना या आजाराने ग्रासले आहे. आजार टाळण्यासाठी विविध तपासण्या आणि औषधे घेण्याकडे दुर्लक्ष न करता आहार, विहार आणि व्यायाम आणि डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आरोग्यदायी जीवनशैली आत्मसात करावी, असा सल्ला डॉ. महाजन यांनी दिला. किडनी या रोगावरील उपचार अत्यंत खर्चिक आहेत. त्यामुळे हा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. परंतु, त्यासाठी पायाभूत आरोग्यसुविधा उभ्या करणे सरकारी पातळीवरही शक्य नाही. त्यामुळे हा आजार होऊ न देणे, याची काळजी सर्वांनी घेण्याची गरज आहे. हिमोग्लोबिनची कमतरता, लघवीला फेस येणे, जेवण कमी जाणे, उलटी आदी प्राथमिक लक्षणे रुग्णांमध्ये दिसून येतात.एक किडनी खराब झाल्यास एका किडनीवर व्यक्ती व्यवस्थित आयुष्य जगू शकते. दुसरी किडनी तो भार उचलत असते. केवळ आई, वडील, भाऊ, बहीण आणि बे्रनडेड व्यक्तीच किडनी दान करून शकते. मात्र, किडनी रुग्णांची प्रतीक्षायादी आहे. एखाद्या रुग्णाला चार ते पाच वर्षे किडनीदात्याची वाट पाहावी लागते. दोन्ही किडन्या खराब झाल्यास रुग्णाला डायलेसिस करावे लागते. या पद्धतीबाबत समाजात चुकीची माहिती आहे, असे त्यांनी सांगितले.आजार टाळण्यासाठी काय काळजी घ्यालकिडनीचा आजार टाळण्यासाठी जास्तीतजास्त पाणी प्यावे. मिठाचा वापर आहारात कमी करावा. तेलाचे प्रमाणही नियंत्रणात असले पाहिजे. जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा.मांसाहारी जेवण आठवड्यातून एकदाच घ्यावे. मद्यपान करू नये. लठ्ठपणा कमी करावा. मधुमेही रुग्णांनी सहा महिन्यांतून आणि सामान्य नागरिकांनी वर्षातून एकदा तपासणी करावी, असा सल्लाही महाजन यांनी दिला.कृत्रिम किडनीसाठी संशोधन सुरूकिडनी खराब झाल्यास त्यावर उपचार करता यावे, याकरिता अमेरिका आणि युरोप या प्रगत देशांत संशोधन सुरू आहे. थ्रीडी प्रिंटिंग आणि कृत्रिम किडनी तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, येत्या पाच वर्षांत तरी हे संशोधन पूर्णत्वास येण्याची शक्यता नाही. त्याला आणखी जास्त कालावधी लागेल. पण, हे संशोधन यशस्वी झाल्यास किडनी रुग्णांना दिलासा मिळण्यास मदत होईल, असे डॉ. महाजन यांनी सांगितले. 

टॅग्स :Healthआरोग्य