शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
3
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
4
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
5
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
6
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
7
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
8
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
9
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
10
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
11
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
12
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
13
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
14
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
15
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
16
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
17
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
18
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
19
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
20
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

ठाणे, पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर श्रमजीवींची धडक, सरकारविरोधात दोन्ही जिल्ह्यांत भव्य मोर्चे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 19:01 IST

ठाणे/ पालघर- निराधार, आदिम आणि दुर्बल घटकांसाठी असणाऱ्या अंत्योदय लाभार्थ्यांपैकी दोनपेक्षा कमी लाभार्थ्यांच्या शिधापत्रिका रद्द करण्याच्या शासनाच्या तुघलकी आदेशाविरोधात आज श्रमजीवी संघटनेने ठाणे व पालघर जिल्ह्यात तीव्र आंदोलन केले.

ठाणे/ पालघर- निराधार, आदिम आणि दुर्बल घटकांसाठी असणाऱ्या अंत्योदय लाभार्थ्यांपैकी दोनपेक्षा कमी लाभार्थ्यांच्या शिधापत्रिका रद्द करण्याच्या शासनाच्या तुघलकी आदेशाविरोधात आज श्रमजीवी संघटनेने ठाणे व पालघर जिल्ह्यात तीव्र आंदोलन केले. दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आज भव्य मोर्चा काढून श्रमजीवीच्या हजारो कष्टकरी बांधवांनी गरीबांच्या तोंडचा घास पळविणा-या शासनाचा आणि प्रशासनाचा तीव्र निषेध केला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. हे अन्यायकारक पत्र शासनाने मागे घेतले नाही तर श्रमजीवी तीव्र आंदोलन छेडणार, असा इशारा यावेळी देण्यात आला.पालघर जिल्ह्यात - १३४५४, ठाणे -१०३००, रायगड -१४३००, नाशिक - ८००० याप्रमाणे केवळ या चार जिल्ह्यांमध्येच असे सुमारे ४६०५४ गरीब आदिवासी , कातकरी , अंत्योदय योजनेचे लाभार्थी ना अंत्योदय योजनेतून कमी करून त्यांना मिळणारे ३५ किलो धान्य कमी करून त्यांना अन्न सुरक्षेच्या प्राधान्य यादीत समाविष्ट करण्याचे आदेश 21 सप्टेंबर 2017 रोजी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांनी एका पत्राद्वारे दिले. हे सर्व लाभार्थी अन्न सुरक्षेच्या प्राधान्य यादीत घेऊन त्यांना महिन्याला प्रति व्यक्ती  केवळ ५ किलो धान्य या आदेशानुसार यापुढे दिले जाईल असा हा निर्णय आहे. मुळात 2013 साली जेव्हा अन्न सुरक्षा कायदा झाला तेव्हा अंत्योदय या 2001 सालीच्या  अंत्योदय योजनेला या कायद्याने कोणतीही बाधा अली नव्हती. त्यामुळे प्राधान्य कुटुंबाना प्रति व्यक्ती पाच किलो तर अंत्योदय लाभार्थ्यांना35 किलो धान्य मिळण्याची तरतूद आहे. प्रधान सचिवांनी जारी केलेल्या या पत्रामुळे अंत्योदय लाभार्थ्यांच्या तोंडचा घास पाठविण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे. या प्रश्नावर महिन्याभरापूर्वी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक  पंडित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत पत्रव्यवहार केला होता.आज याबाबत संघटनेने केलेल्या आंदोलनामुळे सरकारला चांगलीच धडक देण्यात श्रमजीवी संघटनेला यश आले. ठाणे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात सुमारे आठ ते दहा हजार सभासद महिला पुरुष सहभागी झाले होते, यावेळी सरचिटणीस बाळाराम भोईर, जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय कोळेकर, उपाध्यक्ष अशोक सापटे, प्रमोद पवार, राजेश चन्ने, दशरथ भालके, किसन चौरे, सुनील लोणे, जया पारधी, संगीता भोमटे, नंदा वाघे इत्यादी कार्यकर्ते नेतृत्व करत होते,तर पालघर मध्ये देखील या मोर्चाला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद होता दहा हजारपेक्षा जास्त लोक पालघर जिल्ह्याच्या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष केशव नानकर, उपाध्यक्ष  रामभाऊ  वारणा, सहसरचिटणीस विजय जाधव, जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड, ज्ञानेश्वर शिर्के,उल्हास भानुशाली यांसह जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी होते. यावेळी उपजिल्हाधिकारी नवनाथ जरे यांना निवेदन सादर करण्यात आले. ठाण्यातील एक नामांकित वकील प्रदीप टिल्लू यांनी या मोर्चाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना शिस्तीचे धडे देणाऱ्या कष्टकऱ्यांच्या मोर्चा, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.ऍड. टिल्लू म्हणाले की गेली अनेक वर्षे श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली लाखो लोकांचे मोर्चे निघतात. मात्र जराही बेशिस्त आढळत नाही, कुणालाही त्रास न देता हे कष्टकरी श्रमजीवी बांधव आपल्या भावना सरकारकडे पोहोचविण्यासाठी येत असतात हे कौतुकास्पद आहे. आज ठाणे पालघर प्रमाणे रायगड आणि नाशिक जिल्ह्यातही श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून अंत्योदयबाबत घेतलेला अन्यायकारक निर्णय मागे घेण्याची मागणी असणारे निवेदन सादर केले.

टॅग्स :thaneठाणे