शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

किसानसभेनंतर आता सोमवारी श्रमजीवींचा आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 03:50 IST

किसान सभेच्या मोर्चाला यश मिळाल्यानंतर आता वन हक्क, घरखालच्या जमिनी, रोजगार, कुपोषण आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न आदी मागण्या घेऊन ठाणे जिल्ह्यातील हजारो आदिवासी शासनाविरोधात १९ मोर्चा रोजी आक्रोश मोर्चा काढणार आहेत.

ठाणे : किसान सभेच्या मोर्चाला यश मिळाल्यानंतर आता वन हक्क, घरखालच्या जमिनी, रोजगार, कुपोषण आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न आदी मागण्या घेऊन ठाणे जिल्ह्यातील हजारो आदिवासी शासनाविरोधात १९ मोर्चा रोजी आक्रोश मोर्चा काढणार आहेत. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित यांच्या नेतृत्त्वाखालील या लाँग मार्चव्दारे आदिवासी मुंबईत धडकणार आहेत.आदिवासी, कातकरी ठाणे येथे एकत्र येऊन ते आझाद मैदानावर पायी जाणार आहेत. ‘आदिवासी कष्टकरी, ढोर नाय,माणूस हाय, माणुसकीची भीक नको, हक्क हवा, हक्क हवा ’आदी घोषणा देत हा लॉग मार्च मुंबईत शिरणार आहे. मुंबई उपनगरातील आदिवासी बांधवांसह ठाणे, पालघर, रायगड आदी चार जिल्ह्यातील हजारो आदिवासी बांधव ठाण्यात एकत्र येऊन ठाण्यातून विराट लाँग मार्च ने ठाणे ते मुबई असे अंतर सरकारचा निषेध करणार असल्याचे श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी सांगितले.आदिवासी विद्यार्थी एकलव्यासारखे संघर्षमय शिक्षण तर घेत आहेत. पण त्यांच्या दाखले आणि अ‍ॅडमिशन यात असलेल्या जाचक अटींमुळे ते आपोआपच शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकले जात आहेत. अशीच अवस्था आज ओबीसी आणि इतर विद्यार्थ्यांची आहे. प्रत्येक प्रवेशाला, शिष्यवृत्तीला जातपडताळणी सक्तीची आहे. मात्र, त्यासाठी असलेली व्यवस्था केवळ निवडून आलेल्या उमेदवारांसाठीच आहे, असे चित्र आहे. याशिवाय वनपट्यांच्या श्ोतीसाठी सर्वेक्षण, बैठका यांच्यातच आदिवासींच्या वानाचा हक्क अडकून पडला आहे. सरकार सहा महिन्यांच्या कालावधीत अंमलबजावणी करण्याचे सांगत आहे, मात्र, ती कोण आणि कशी करणार यात स्पष्टता नाही. याबाबत मंत्रालय स्तरावर नव्हे तर जिल्हा स्तरावर समिती नेमून त्यावर त्या त्या भागात काम करणाºया संघटनेचा पदाधिकारी सदस्य म्हणून घेऊन महिन्याला वन हक्क दाव्यांच्या पुर्ततेचा आढावा घ्यावा.>घर त्याची जमीन असे कायद्याने सांगितले मात्र घरखालच्या जमिनीचे हक्काचे दाखले मिळवण्यासाठी संघर्ष अजून सुरूच आहे. दोन वेळच्या भाकरीसाठी शेकडो किलोमीटर दूर स्थलांतरित व्हावे लागत आहे. रोजगार हमी योजना तर आहे मात्र प्रत्यक्ष रोजगार किती हा प्रश्न विचारला तर आजही उत्तर संतापजनक आहे, बेरोजगारीमुळे दारिद््र्याचे विदारक वास्तव हजारो आदिवासी बालकांचा भूकबळी घेत असल्याचे दिसत आहे.