शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

किसानसभेनंतर आता सोमवारी श्रमजीवींचा आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 03:50 IST

किसान सभेच्या मोर्चाला यश मिळाल्यानंतर आता वन हक्क, घरखालच्या जमिनी, रोजगार, कुपोषण आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न आदी मागण्या घेऊन ठाणे जिल्ह्यातील हजारो आदिवासी शासनाविरोधात १९ मोर्चा रोजी आक्रोश मोर्चा काढणार आहेत.

ठाणे : किसान सभेच्या मोर्चाला यश मिळाल्यानंतर आता वन हक्क, घरखालच्या जमिनी, रोजगार, कुपोषण आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न आदी मागण्या घेऊन ठाणे जिल्ह्यातील हजारो आदिवासी शासनाविरोधात १९ मोर्चा रोजी आक्रोश मोर्चा काढणार आहेत. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित यांच्या नेतृत्त्वाखालील या लाँग मार्चव्दारे आदिवासी मुंबईत धडकणार आहेत.आदिवासी, कातकरी ठाणे येथे एकत्र येऊन ते आझाद मैदानावर पायी जाणार आहेत. ‘आदिवासी कष्टकरी, ढोर नाय,माणूस हाय, माणुसकीची भीक नको, हक्क हवा, हक्क हवा ’आदी घोषणा देत हा लॉग मार्च मुंबईत शिरणार आहे. मुंबई उपनगरातील आदिवासी बांधवांसह ठाणे, पालघर, रायगड आदी चार जिल्ह्यातील हजारो आदिवासी बांधव ठाण्यात एकत्र येऊन ठाण्यातून विराट लाँग मार्च ने ठाणे ते मुबई असे अंतर सरकारचा निषेध करणार असल्याचे श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी सांगितले.आदिवासी विद्यार्थी एकलव्यासारखे संघर्षमय शिक्षण तर घेत आहेत. पण त्यांच्या दाखले आणि अ‍ॅडमिशन यात असलेल्या जाचक अटींमुळे ते आपोआपच शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकले जात आहेत. अशीच अवस्था आज ओबीसी आणि इतर विद्यार्थ्यांची आहे. प्रत्येक प्रवेशाला, शिष्यवृत्तीला जातपडताळणी सक्तीची आहे. मात्र, त्यासाठी असलेली व्यवस्था केवळ निवडून आलेल्या उमेदवारांसाठीच आहे, असे चित्र आहे. याशिवाय वनपट्यांच्या श्ोतीसाठी सर्वेक्षण, बैठका यांच्यातच आदिवासींच्या वानाचा हक्क अडकून पडला आहे. सरकार सहा महिन्यांच्या कालावधीत अंमलबजावणी करण्याचे सांगत आहे, मात्र, ती कोण आणि कशी करणार यात स्पष्टता नाही. याबाबत मंत्रालय स्तरावर नव्हे तर जिल्हा स्तरावर समिती नेमून त्यावर त्या त्या भागात काम करणाºया संघटनेचा पदाधिकारी सदस्य म्हणून घेऊन महिन्याला वन हक्क दाव्यांच्या पुर्ततेचा आढावा घ्यावा.>घर त्याची जमीन असे कायद्याने सांगितले मात्र घरखालच्या जमिनीचे हक्काचे दाखले मिळवण्यासाठी संघर्ष अजून सुरूच आहे. दोन वेळच्या भाकरीसाठी शेकडो किलोमीटर दूर स्थलांतरित व्हावे लागत आहे. रोजगार हमी योजना तर आहे मात्र प्रत्यक्ष रोजगार किती हा प्रश्न विचारला तर आजही उत्तर संतापजनक आहे, बेरोजगारीमुळे दारिद््र्याचे विदारक वास्तव हजारो आदिवासी बालकांचा भूकबळी घेत असल्याचे दिसत आहे.