शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण तहसील कार्यालयावर श्रमजीवींचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 03:17 IST

आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेने सोमवारी कल्याण तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

कल्याण : आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेने सोमवारी कल्याण तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी तहसीलदार अमित सानप यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. येत्या आठवडाभरात मागण्यांसंदर्भात बैठक घेण्यात येणार आहे, असे आश्वासन सानप यांनी मोर्चाला दिले आहे.श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस राजेश चन्ने यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चात नीरा जाधव, विष्णू वाघे, गणेश भामरे, नंदू जाधव, कोंडू मुकणे आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.कल्याण तालुक्यातील टिटवाळ्यातील गणेशवाडी, उतणे कातकरीपाडा, राया कलमवाडी, कोलम कातकरीपाडा, फळेगाव कातरीपाडा, वाहोली कातकरीपाडा, नडगाव, खाकरवाडी, कोम्याचीवाडी, पळसोली वैतागवाडी, वरप कातकरीवाडी या भागांमध्ये पाणीटंचाई भेडसावत आहे. तेथील रहिवाशांना शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा होत नाही. आदिवासींना हक्काची घरे दिलेली नाहीत. लहान मुलांचा कुपोषणाने मृत्यू होत आहे. अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकेवरील आदिवासीधारकाला ३५ किलो अन्नधान्य दिले पाहिजे. ते दिले जात नाही. त्याचा काळाबाजार केला जात आहे. आदिवासीपाड्यात विजेची व्यवस्था नाही. स्वतंत्र स्मशानभूमी नाही. अंगणवाड्यांची व्यवस्था नाही. स्तनदा व गरोदर मातांना आरोग्याची सुविधा नाही. ठाकरपाडा, मठाचीवाडी, चौरा, कोलम, दहिवलीवाडी, कोसले, काकडपाडा, गेरसा, ओझर्ली आदी २६ पाड्यांवर मुख्य रस्त्याला जोडणारे अंतर्गत रस्ते तयार केलेले नाहीत. आदिवासींच्या कब्जेवहिवाटीवरील जागेवर चुकीचे शेरे मारले आहेत. ते दुरुस्त केले जावेत, या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

टॅग्स :kalyanकल्याण