शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

मीरा भाईंदर न्यायालयाचे काम निधीअभावी रखडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 01:28 IST

विविध पोलीस ठाणी व कार्यालयांच्या अनुषंगाने दाखल होणारे गुन्हे व दावे यासाठी थेट ठाणे येथील न्यायालयात जावे लागते.

मीरा रोड : मीरा भार्इंदर शहरासाठी स्वतंत्र न्यायालयाची मागणी गेली अनेक वर्ष होत असली तरी, शासनाने आवश्यक निधीची तरतूदच न केल्याने न्यायालयासह न्यायाधिशांच्या निवासी इमारतीची कामे रखडली आहेत. त्यामुळे न्यायालयाचे कामकाज कधी सुरु होणार, असा प्रश्न नागरिकांसह प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना पडला आहे.मीरा भार्इंदर शहरात ६ पोलीस ठाणी, २ उपअधीक्षक कार्यालय, ठाणे ग्रामीण पोलीसांची वाहतूक शाखा, अनैतिक मानवी वाहतूक शाखा तसेच स्थानिक गुन्हे शाखा आहे. महापालिकेच्या कामकाजाचा व्याप मोठा असून, अपर तहसिलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी कार्यालयही आहेत. विविध पोलीस ठाणी व कार्यालयांच्या अनुषंगाने दाखल होणारे गुन्हे व दावे यासाठी थेट ठाणे येथील न्यायालयात जावे लागते. पोलीस, पालिका, महसूल आदींच्या दाव्यांप्रमाणेच असंख्य खाजगी दाव्यांसाठी नागरिकांनासुध्दा ठाण्याच्या न्यायालयाशिवाय पर्याय नाही.ठाणे न्यायालयात सर्वात जास्त दावे हे मीरा भार्इंदरचे असूनही न्यायालयाच्या कामासाठी मात्र ठाण्याला खेपा माराव्या लागत असल्याने नागरिकांसह प्रशासनाचा वेळ आणि पैसा नाहक वाया जातो. नागरिकांना तर कामाचा खाडा करुन न्यायालयाच्या पायराया झिजवाव्या लागतात. त्यातही एका तारखेला काम होत नसल्याने वर्षानुवर्षे चकरा सुरुच असतात.मीरा भार्इंदरसाठी स्वतंत्र दिवाणी आणि फौजदारी न्यायालय व्हावे अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. मीरा भार्इंदरमधील वकिलांनीदेखील यासाठी आपली ताकद लावली असताना, ठाण्यातील वकीलांचा मात्र न्यायालय स्थलांतरीत करण्यास विरोध होता. परंतु २०१३ साली मीरा भार्इंदरमध्ये न्यायालय बांधकामास तत्कालिन काँग्रेस आघाडी सरकारने मान्यता दिली.न्यायालयाची ३ मजली इमारत, ज्यात ६ न्यायदालन कक्ष व न्यायाधिशांच्या ६ निवासस्थानासाठी तीन मजली स्वतंत्र इमारत अशी मंजुरी होती. परंतु महापालिकेने न्यायाधिशांच्या निवसी इमारतीसाठी केवळ दोन मजल्याचीच परवानगी दिल्याने आता ४ न्यायाधिशांसाठीच निवस्थान होणार आहे. भाजप युती शासनाच्या काळात फडणवीस सरकारने या दोन्ही इमारतींच्या कामांसाठी पुरेशी आर्थिक तरतुदच न केल्याने कामे रखडली. न्यायाधिशांच्या निवासस्थानाच्या इमारतीचे काम २०१७ पासून बंद असून केवळ तळमजल्याचे आरसीसी व पहिल्या मजल्याच्या स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे.मुख्य न्यायालय इमारतीचे स्टील्ट अधिक ३ मजल्याचे बांधकाम पूर्ण झाले असून सॅनीटरी, प्लंबींगचे काम काही प्रमाणात बाकी आहे. अंतर्गत रंगकामाचा एक कोट बाकी आहे.ठाण्याला येणे - जाणे ठरते त्रासदायकन्यायालयाची पायरी चढण्याची पाळी कोणावर येऊ नये या मताचे आपण असलो तरी न्यायालयीन कामकाजासाठी शहरातील नागरिकांना स्वतंत्र दिवाणी व फौजदारी न्यायालयाची गरज आहे. ठाणे येथे न्यायालयात ये - जा करणे नागरिकांसह पोलीस, पालिका आदींना त्रासदायक बनले आहे.फडणवीस सरकारच्या काळात मीरा भार्इंदर न्यायालयासाठी निधीची तरतुद न केली गेल्याने न्यायालयाचे काम रखडले असल्याची टीका केली जात आहे. हे काम ठाकरे सरकारच्या काळात पूर्ण केले जाईल असे सेना आ. प्रताप सरनाईक यांनी सांगितले. निधीअभावी न्यायालयाचे काम रखडल्याने नागरिकांना ठाण्याला खेपा माराव्या लागतात याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरCourtन्यायालयthaneठाणे