शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

मीरा भाईंदर न्यायालयाचे काम निधीअभावी रखडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 01:28 IST

विविध पोलीस ठाणी व कार्यालयांच्या अनुषंगाने दाखल होणारे गुन्हे व दावे यासाठी थेट ठाणे येथील न्यायालयात जावे लागते.

मीरा रोड : मीरा भार्इंदर शहरासाठी स्वतंत्र न्यायालयाची मागणी गेली अनेक वर्ष होत असली तरी, शासनाने आवश्यक निधीची तरतूदच न केल्याने न्यायालयासह न्यायाधिशांच्या निवासी इमारतीची कामे रखडली आहेत. त्यामुळे न्यायालयाचे कामकाज कधी सुरु होणार, असा प्रश्न नागरिकांसह प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना पडला आहे.मीरा भार्इंदर शहरात ६ पोलीस ठाणी, २ उपअधीक्षक कार्यालय, ठाणे ग्रामीण पोलीसांची वाहतूक शाखा, अनैतिक मानवी वाहतूक शाखा तसेच स्थानिक गुन्हे शाखा आहे. महापालिकेच्या कामकाजाचा व्याप मोठा असून, अपर तहसिलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी कार्यालयही आहेत. विविध पोलीस ठाणी व कार्यालयांच्या अनुषंगाने दाखल होणारे गुन्हे व दावे यासाठी थेट ठाणे येथील न्यायालयात जावे लागते. पोलीस, पालिका, महसूल आदींच्या दाव्यांप्रमाणेच असंख्य खाजगी दाव्यांसाठी नागरिकांनासुध्दा ठाण्याच्या न्यायालयाशिवाय पर्याय नाही.ठाणे न्यायालयात सर्वात जास्त दावे हे मीरा भार्इंदरचे असूनही न्यायालयाच्या कामासाठी मात्र ठाण्याला खेपा माराव्या लागत असल्याने नागरिकांसह प्रशासनाचा वेळ आणि पैसा नाहक वाया जातो. नागरिकांना तर कामाचा खाडा करुन न्यायालयाच्या पायराया झिजवाव्या लागतात. त्यातही एका तारखेला काम होत नसल्याने वर्षानुवर्षे चकरा सुरुच असतात.मीरा भार्इंदरसाठी स्वतंत्र दिवाणी आणि फौजदारी न्यायालय व्हावे अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. मीरा भार्इंदरमधील वकिलांनीदेखील यासाठी आपली ताकद लावली असताना, ठाण्यातील वकीलांचा मात्र न्यायालय स्थलांतरीत करण्यास विरोध होता. परंतु २०१३ साली मीरा भार्इंदरमध्ये न्यायालय बांधकामास तत्कालिन काँग्रेस आघाडी सरकारने मान्यता दिली.न्यायालयाची ३ मजली इमारत, ज्यात ६ न्यायदालन कक्ष व न्यायाधिशांच्या ६ निवासस्थानासाठी तीन मजली स्वतंत्र इमारत अशी मंजुरी होती. परंतु महापालिकेने न्यायाधिशांच्या निवसी इमारतीसाठी केवळ दोन मजल्याचीच परवानगी दिल्याने आता ४ न्यायाधिशांसाठीच निवस्थान होणार आहे. भाजप युती शासनाच्या काळात फडणवीस सरकारने या दोन्ही इमारतींच्या कामांसाठी पुरेशी आर्थिक तरतुदच न केल्याने कामे रखडली. न्यायाधिशांच्या निवासस्थानाच्या इमारतीचे काम २०१७ पासून बंद असून केवळ तळमजल्याचे आरसीसी व पहिल्या मजल्याच्या स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे.मुख्य न्यायालय इमारतीचे स्टील्ट अधिक ३ मजल्याचे बांधकाम पूर्ण झाले असून सॅनीटरी, प्लंबींगचे काम काही प्रमाणात बाकी आहे. अंतर्गत रंगकामाचा एक कोट बाकी आहे.ठाण्याला येणे - जाणे ठरते त्रासदायकन्यायालयाची पायरी चढण्याची पाळी कोणावर येऊ नये या मताचे आपण असलो तरी न्यायालयीन कामकाजासाठी शहरातील नागरिकांना स्वतंत्र दिवाणी व फौजदारी न्यायालयाची गरज आहे. ठाणे येथे न्यायालयात ये - जा करणे नागरिकांसह पोलीस, पालिका आदींना त्रासदायक बनले आहे.फडणवीस सरकारच्या काळात मीरा भार्इंदर न्यायालयासाठी निधीची तरतुद न केली गेल्याने न्यायालयाचे काम रखडले असल्याची टीका केली जात आहे. हे काम ठाकरे सरकारच्या काळात पूर्ण केले जाईल असे सेना आ. प्रताप सरनाईक यांनी सांगितले. निधीअभावी न्यायालयाचे काम रखडल्याने नागरिकांना ठाण्याला खेपा माराव्या लागतात याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरCourtन्यायालयthaneठाणे