शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अंबरनाथ चिखलोली धरणाच्या पाणलोटक्षेत्रतच कारखाने आणि त्यांच्या संरक्षण भिंतींचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 19:44 IST

अंबरनाथ नगरपरिषद क्षेत्रला पाणी पुरवठा करणा-या चिखलोली धरणाच्या पानलोट क्षेत्रतच कंपन्या आणि त्यांच्या संरक्षण भिंतींचे काम सुरु असल्याने त्याचा त्रास धरणाला आहे. पानलोटक्षेत्रत नव्याने बांधकाम होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे.

ठळक मुद्दे धरणाच्या पाणलोट क्षेत्रत अनेक कारखाने धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव प्रलंबितपानलोट क्षेत्रतच संरक्षण भिंतींचे काम

अंबरनाथ - अंबरनाथ नगरपरिषद क्षेत्रला पाणी पुरवठा करणा-या चिखलोली धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्या अनुशंगाने शासनस्तरावर पाठपुरावा देखील सुरु आहे. मात्र धरनाची उंची वाढल्यावर धरणाच्या पाणलोट क्षेत्रत अनेक कारखाने आड येणार आहेत. धरणाच्या पानलोट क्षेत्रतच कंपन्या आणि त्यांच्या संरक्षण भिंतींचे काम सुरु असल्याने त्याचा त्रस धरणाला होणार आहे. या प्रकरणी एमआयडीसी आणि लघुपाटबंधारे विभाग यांच्यात ताळमेळ नसल्याचे समार आले आहे.     अंबरनाथ पूर्व भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी चिखलोली धरणाचा वापर केला जात आहे. या धरणाच्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी प्रक्रिया केंद्र उभारले आहे. या पाण्यावर प्रक्रिया करुन शहरात पाणी पुरवठा होत असल्याने या धरणाचे महत्व वाढत आहे. शहराला जास्त पाणी मिळावे यासाठी प्राधिकरणाने या धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव मंजुर केला आहे. धरणाची उंची 4 मिटर वाढल्यावर धरणाचे पाणलोटक्षेत्र देखील वाढणार आहे. याची कल्पना लघुपाटबंधारे विभाग आणि एमआयडीसी या दोघांनाही आहे. मात्र असे असतांना देखील धरणाच्या पाणलोटक्षेत्रतच कंपन्या उभारण्याचे काम सुरु आहे. या आधी देखील काम सुरु असतांना ते काम थांबविण्यात आले होते. आता पुन्हा संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरु असल्याने धरणाची उंची वाढविण्याच्या कामाला बाधा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असतांना पानलोटक्षेत्रत नव्याने बांधकाम होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे. मात्र त्यावर कोणताच तोडगा निघत नसल्याने धरणाला आणि धरणातील पाण्याला धोका निर्माण झाला आहे.  

टॅग्स :thaneठाणेambernathअंबरनाथDamधरण