शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

एसआरएच्या २५ योजनांची कामे पाच वर्षांपासून अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यात एसआरए अंतर्गत ७५ प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार त्यातील ४५ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ठाण्यात एसआरए अंतर्गत ७५ प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार त्यातील ४५ प्रकल्प पूर्ण झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे, तर ३० प्रकल्पातील २५ प्रकल्पांची कामे २०१६ पासून सुरू असून, ती अद्यापही पूर्ण झालेली नाहीत, तर ५ योजना या पहिल्याच टप्यात असल्याची माहिती उघड झाली आहे.

विशेष म्हणजे यापूर्वी एसआरए योजनेत २६९ चौरस फुटांचेच घर मिळत होते. तसेच तीनचाच एफएसआय मिळत होता. त्यातही या योजनेची मंजुरी घेण्यासाठी मुंबईच्या खेटा माराव्या लागत होत्या. परंतु, आता वाढीव एफएसआय बरोबर ३०० चौरस फुटांचे घर मिळणार असल्याने आणि ठाण्यात आता एसआरए योजनेचे स्वतंत्र प्राधिकरण झाल्याने या योजनांना चालना तर मिळणार आहेच, शिवाय विकासकही या योजनांसाठी पुढे येतील असा दावा केला जात आहे.

ठाणे शहराला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी नागपूर आणि पुणे शहरांच्या धर्तीवर २०१५ मध्ये एसआरए योजना ठाण्यामध्ये आणण्यात आली. या योजनेअंतर्गत ठाण्यात ७५ प्रकल्प राबविण्याचे निश्चित करण्यात आले. परंतु, या योजनेतील घरे छोटी असल्याने आणि एफएसआयही कमी असल्याने विकासक या योजना राबविण्यासाठी पुढे येत नव्हते. त्यामुळे या योजनेला काहीशी खीळ बसली होती. मुंबई याच योजनेच्या माध्यमातून चारचा एफएसआय दिला जात होता. तसेच ३०० चौरस फुटांचे घर दिले जात होते. परंतु, ठाण्यात मात्र यासाठीचा नियम वेगळा होता. येथे तीनचाच एफएसआय मिळत होता. तसेच २६९ चौरस फुटांचे घर दिले जात होते. परंतु, मागील डिसेंबरमध्ये एसआरए प्राधिकरणाने ठाण्यालाही मुंबईप्रमाणे न्याय देण्याचे निश्चित केले आणि त्यानुसार पुढील योजना राबविण्याचे स्पष्ट केले आहे.

मुंबईप्रमाणे ठाण्यातील एसआरए योजनेलाही अशाच पद्धतीने न्याय मिळणार असल्याने येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना हक्काच्या घरांचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाण्यातील २५ लाख लोकसंख्येतील तब्बल ५४ टक्के लोक हे झोपडपट्टीत राहतात. शहारत २२७ झोपड्पट्ट्या असून, तब्बल २.३२ लाख घरे आहेत, तर नऊ लाख लोक त्या ठिकाणी वास्तव्य करीत आहेत. बीएसयूपी आणि एसआरडी अंतर्गत महापालिकेने काही घरे बांधली; मात्र अद्यापही दोन लाख घरांची मागणी कायम आहे. त्यामुळे आता एसआरएच्या योजनेचा लाभ येथील रहिवाशांना मिळू शकणार आहे. दरम्यान, आतापर्यंत एसआरए अंतर्गत ७५ योजनांची कामे हाती घेण्यात आली होती. त्यातील ४५ योजनांची कामे पूर्ण झाली असल्याची माहिती एसआरएच्या सूत्रांनी दिली.

-----------------

पाच योजनांच्या केवळ फाईलचा प्रवास

३० योजनांपैकी २५ योजनांची कामे २०१६ पासून सुरू आहेत. परंतु, ही कामे आजही पूर्ण होऊ शकलेली नाहीत. एका प्रकल्पासाठी साधारणपणे तीन वर्षांचा कालावधी जातो असे सांगितले जाते. परंतु, आता पाच वर्षे उलटूनही या योजनांची कामे पूर्ण झाली नसल्याचेच दिसून आले आहे, तर पाच योजनांच्या केवळ फाईलच अद्याप हलविण्याचे काम सुरू आहे. या योजनांची केवळ प्राथमिक स्वरुपातच कामे सुरू असून, त्या केव्हा पूर्ण होणार हे सांगणे कठीण आहे.