शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का! दगडू सकपाळ यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश
2
“पुतिन यांचा १० वर्षे प्रयत्न पण अपयश, मी ८ युद्धे थांबवली, प्रत्येकासाठी नोबेल हवे”: ट्रम्प
3
"नाकातून रक्त, रक्ताच्या उलट्या अन्..."; व्हेनेझुएलात अमेरिकेनं वापरलं 'मिस्ट्री वेपन'! मादुरो यांच्या सैनिकानंच सांगितला संपूर्ण थरार
4
मुंबई पोलिसांना कडक सॅल्यूट! हरवलेले ३३,५१४ मोबाइल परत केले; युपीतच १६५० सापडले, २ कोटी...
5
भारतीय 'सबीह खान' यांची Apple मध्ये जादू! २३४ कोटींचे वार्षिक पॅकेज; कुठे झालंय शिक्षण?
6
भारताला जागतिक धक्का! १० शक्तिशाली देशांच्या यादीतून नाव गायब; रँकिंगमध्ये देश कितव्या स्थानी?
7
कारचा चक्काचूर, कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांना अपघात; दोघे जागीच दगावले
8
२५ वर्षे सत्ता, पण मूलभूत प्रश्न सुटले नाही?; शिंदेसेनेचे उत्तर, विरोधकांना आयतीच संधी, नेते म्हणाले…
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना शुभ-फलदायी, पैशांचा ओघ राहील; ४ राशींना संघर्ष, संमिश्र काळ!
10
पात्र, अपात्र धारावीकरांना धारावीतच घर; पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार: मुख्यमंत्री फडणवीस
11
आजचे राशीभविष्य : रविवार ११ जानेवारी २०२६; आर्थिक लाभ आणि प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आपण खुश व्हाल, अचानक नशिबाची साथ मिळेल 
12
"बीस साल बाद एकत्र आलेले विकासात खोडा घालत आहेत"; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
13
हिस्ट्री शीटर ते थेट निवडणुकीच्या रिंगणात; अंगावर २५ गुन्हे असलेल्या सज्जू मलिकला राष्ट्रवादीकडून उमेदवारी
14
दाढीवाले जातीय तेढ निर्माण करून मागतात मते; सरकार नसून तमासगीर झालंय: हर्षवर्धन सपकाळ
15
भाजपने विकास केला म्हणून 'ते' वैतागले आहेत; मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्यावर बोलणे टाळले
16
'अहमदाबादचे नामांतर करण्याची हिंमत दाखवा'; अमित शाहांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचे आव्हान
17
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
18
महापालिका रणांगणात मनसेची 'नवी फळी'; २६ उमेदवार कोट्यवधी संपत्तीचे मालक
19
पास घरी राहिला म्हणून चिमुकल्याला कंडक्टरने एसटीतून हायवेवर उतरवले!
20
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

एसआरएच्या २५ योजनांची कामे पाच वर्षांपासून अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यात एसआरए अंतर्गत ७५ प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार त्यातील ४५ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ठाण्यात एसआरए अंतर्गत ७५ प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार त्यातील ४५ प्रकल्प पूर्ण झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे, तर ३० प्रकल्पातील २५ प्रकल्पांची कामे २०१६ पासून सुरू असून, ती अद्यापही पूर्ण झालेली नाहीत, तर ५ योजना या पहिल्याच टप्यात असल्याची माहिती उघड झाली आहे.

विशेष म्हणजे यापूर्वी एसआरए योजनेत २६९ चौरस फुटांचेच घर मिळत होते. तसेच तीनचाच एफएसआय मिळत होता. त्यातही या योजनेची मंजुरी घेण्यासाठी मुंबईच्या खेटा माराव्या लागत होत्या. परंतु, आता वाढीव एफएसआय बरोबर ३०० चौरस फुटांचे घर मिळणार असल्याने आणि ठाण्यात आता एसआरए योजनेचे स्वतंत्र प्राधिकरण झाल्याने या योजनांना चालना तर मिळणार आहेच, शिवाय विकासकही या योजनांसाठी पुढे येतील असा दावा केला जात आहे.

ठाणे शहराला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी नागपूर आणि पुणे शहरांच्या धर्तीवर २०१५ मध्ये एसआरए योजना ठाण्यामध्ये आणण्यात आली. या योजनेअंतर्गत ठाण्यात ७५ प्रकल्प राबविण्याचे निश्चित करण्यात आले. परंतु, या योजनेतील घरे छोटी असल्याने आणि एफएसआयही कमी असल्याने विकासक या योजना राबविण्यासाठी पुढे येत नव्हते. त्यामुळे या योजनेला काहीशी खीळ बसली होती. मुंबई याच योजनेच्या माध्यमातून चारचा एफएसआय दिला जात होता. तसेच ३०० चौरस फुटांचे घर दिले जात होते. परंतु, ठाण्यात मात्र यासाठीचा नियम वेगळा होता. येथे तीनचाच एफएसआय मिळत होता. तसेच २६९ चौरस फुटांचे घर दिले जात होते. परंतु, मागील डिसेंबरमध्ये एसआरए प्राधिकरणाने ठाण्यालाही मुंबईप्रमाणे न्याय देण्याचे निश्चित केले आणि त्यानुसार पुढील योजना राबविण्याचे स्पष्ट केले आहे.

मुंबईप्रमाणे ठाण्यातील एसआरए योजनेलाही अशाच पद्धतीने न्याय मिळणार असल्याने येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना हक्काच्या घरांचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाण्यातील २५ लाख लोकसंख्येतील तब्बल ५४ टक्के लोक हे झोपडपट्टीत राहतात. शहारत २२७ झोपड्पट्ट्या असून, तब्बल २.३२ लाख घरे आहेत, तर नऊ लाख लोक त्या ठिकाणी वास्तव्य करीत आहेत. बीएसयूपी आणि एसआरडी अंतर्गत महापालिकेने काही घरे बांधली; मात्र अद्यापही दोन लाख घरांची मागणी कायम आहे. त्यामुळे आता एसआरएच्या योजनेचा लाभ येथील रहिवाशांना मिळू शकणार आहे. दरम्यान, आतापर्यंत एसआरए अंतर्गत ७५ योजनांची कामे हाती घेण्यात आली होती. त्यातील ४५ योजनांची कामे पूर्ण झाली असल्याची माहिती एसआरएच्या सूत्रांनी दिली.

-----------------

पाच योजनांच्या केवळ फाईलचा प्रवास

३० योजनांपैकी २५ योजनांची कामे २०१६ पासून सुरू आहेत. परंतु, ही कामे आजही पूर्ण होऊ शकलेली नाहीत. एका प्रकल्पासाठी साधारणपणे तीन वर्षांचा कालावधी जातो असे सांगितले जाते. परंतु, आता पाच वर्षे उलटूनही या योजनांची कामे पूर्ण झाली नसल्याचेच दिसून आले आहे, तर पाच योजनांच्या केवळ फाईलच अद्याप हलविण्याचे काम सुरू आहे. या योजनांची केवळ प्राथमिक स्वरुपातच कामे सुरू असून, त्या केव्हा पूर्ण होणार हे सांगणे कठीण आहे.