शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

एसआरएच्या २५ योजनांची कामे पाच वर्षांपासून अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यात एसआरए अंतर्गत ७५ प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार त्यातील ४५ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ठाण्यात एसआरए अंतर्गत ७५ प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार त्यातील ४५ प्रकल्प पूर्ण झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे, तर ३० प्रकल्पातील २५ प्रकल्पांची कामे २०१६ पासून सुरू असून, ती अद्यापही पूर्ण झालेली नाहीत, तर ५ योजना या पहिल्याच टप्यात असल्याची माहिती उघड झाली आहे.

विशेष म्हणजे यापूर्वी एसआरए योजनेत २६९ चौरस फुटांचेच घर मिळत होते. तसेच तीनचाच एफएसआय मिळत होता. त्यातही या योजनेची मंजुरी घेण्यासाठी मुंबईच्या खेटा माराव्या लागत होत्या. परंतु, आता वाढीव एफएसआय बरोबर ३०० चौरस फुटांचे घर मिळणार असल्याने आणि ठाण्यात आता एसआरए योजनेचे स्वतंत्र प्राधिकरण झाल्याने या योजनांना चालना तर मिळणार आहेच, शिवाय विकासकही या योजनांसाठी पुढे येतील असा दावा केला जात आहे.

ठाणे शहराला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी नागपूर आणि पुणे शहरांच्या धर्तीवर २०१५ मध्ये एसआरए योजना ठाण्यामध्ये आणण्यात आली. या योजनेअंतर्गत ठाण्यात ७५ प्रकल्प राबविण्याचे निश्चित करण्यात आले. परंतु, या योजनेतील घरे छोटी असल्याने आणि एफएसआयही कमी असल्याने विकासक या योजना राबविण्यासाठी पुढे येत नव्हते. त्यामुळे या योजनेला काहीशी खीळ बसली होती. मुंबई याच योजनेच्या माध्यमातून चारचा एफएसआय दिला जात होता. तसेच ३०० चौरस फुटांचे घर दिले जात होते. परंतु, ठाण्यात मात्र यासाठीचा नियम वेगळा होता. येथे तीनचाच एफएसआय मिळत होता. तसेच २६९ चौरस फुटांचे घर दिले जात होते. परंतु, मागील डिसेंबरमध्ये एसआरए प्राधिकरणाने ठाण्यालाही मुंबईप्रमाणे न्याय देण्याचे निश्चित केले आणि त्यानुसार पुढील योजना राबविण्याचे स्पष्ट केले आहे.

मुंबईप्रमाणे ठाण्यातील एसआरए योजनेलाही अशाच पद्धतीने न्याय मिळणार असल्याने येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना हक्काच्या घरांचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाण्यातील २५ लाख लोकसंख्येतील तब्बल ५४ टक्के लोक हे झोपडपट्टीत राहतात. शहारत २२७ झोपड्पट्ट्या असून, तब्बल २.३२ लाख घरे आहेत, तर नऊ लाख लोक त्या ठिकाणी वास्तव्य करीत आहेत. बीएसयूपी आणि एसआरडी अंतर्गत महापालिकेने काही घरे बांधली; मात्र अद्यापही दोन लाख घरांची मागणी कायम आहे. त्यामुळे आता एसआरएच्या योजनेचा लाभ येथील रहिवाशांना मिळू शकणार आहे. दरम्यान, आतापर्यंत एसआरए अंतर्गत ७५ योजनांची कामे हाती घेण्यात आली होती. त्यातील ४५ योजनांची कामे पूर्ण झाली असल्याची माहिती एसआरएच्या सूत्रांनी दिली.

-----------------

पाच योजनांच्या केवळ फाईलचा प्रवास

३० योजनांपैकी २५ योजनांची कामे २०१६ पासून सुरू आहेत. परंतु, ही कामे आजही पूर्ण होऊ शकलेली नाहीत. एका प्रकल्पासाठी साधारणपणे तीन वर्षांचा कालावधी जातो असे सांगितले जाते. परंतु, आता पाच वर्षे उलटूनही या योजनांची कामे पूर्ण झाली नसल्याचेच दिसून आले आहे, तर पाच योजनांच्या केवळ फाईलच अद्याप हलविण्याचे काम सुरू आहे. या योजनांची केवळ प्राथमिक स्वरुपातच कामे सुरू असून, त्या केव्हा पूर्ण होणार हे सांगणे कठीण आहे.