शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

उल्हासनगर रेल्वे अपघातात महिलेने दोन्ही पाय गमावले, एक तासाने आली रुग्णवाहिका

By सदानंद नाईक | Updated: March 9, 2025 16:21 IST

महिलेला रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी मुंबई सायन येथे हलविण्यात आले...

उल्हासनगर : उल्हासनगर रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमाविलेल्या महिलेला १ तास रुग्णवाहिका येण्याची प्रतीक्षा रेल्वे स्टेशनला करावी लागली. मध्यवर्ती रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतरही १०८ क्रमांकाच्या रुग्णावाहीकाचा घोळ कायम राहिल्याने, महिलेला रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी मुंबई सायन येथे हलविण्यात आले.

 उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील एका रुग्णाला तब्बल सहा तास १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका न मिळाल्याने, त्याचा मृत्यू झाल्याची घटना गेल्या महिन्यात घडली. शासनाच्या आरोग्य विभागाने याचा ठपका जिल्हा शल्यचिकित्सक व एका डॉक्टरांवर ठेवून त्यांना निलंबित केले. या घटनेनंतरही १०८ क्रमांकाच्या रुग्णावाहिकेचा घोळ कायम असल्याने, आरोग्य विभाग आता कोणावर कारवाई करते. याकडे सर्वांचे लक्ष लागले. शनिवारी दुपारी कमल साबळे या महिलेचा रेल्वे अपघात झाला. या अपघातात महिलेने आपले दोन्ही पाय गमावले. या महिलेला रेल्वे स्थानकातून मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यासाठी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका बोलावण्यात आली. मात्र १ तासाच्या प्रतीक्षेनंतर रुग्णवाहिका आली. तो पर्यंत महिलेला मरण यातना सहन कराव्या लागल्या.

 मध्यवर्ती रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी मुंबई सायन रुग्णालयात जखमी महिलेला हळविण्यासाठी पुन्हा डॉक्टर व नातेवाईकानी १०८ क्रमांकाच्या रुग्णावाहिकेला बोलाविले. मात्र एका तासाच्या प्रतीक्षेनंतरही रुग्णावाहीका आली नाही. अखेर खाजगी रुग्णवाहिकेने महिलेला सायन रुग्णालयात नेण्यासाठी खाजगी रुग्णवाहिकेला बोलाविले. यावेळी रुग्णवाहीकेच्या दराबाबत तू तू मै झाल्यावर, मध्यवर्ती रुग्णालयाने स्वतःची रुग्णावाहीका दिली. एकूणच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहीकेचा घोळ कायम असून याबाबत शासन कारवाई करणार का? की गोरगरीब रुग्णाच्या जीवासी खेळणार? असा प्रश्न रुग्णाच्या नातेवाईकानी यावेळी केला आहे. कोविड काळातील रुग्णवाहिका गेल्या कुठे? कोविड काळात महापालिका, रुग्णालय यांना देण्यात आलेल्या रुग्णवाहीका गेल्या कुठे? याच्या हिशेबाची मागणी सर्वसामान्य नागरिकाकडून होत आहे. 

टॅग्स :AccidentअपघातIndian Railwayभारतीय रेल्वेhospitalहॉस्पिटल