शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

३ महिन्याच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या आरोपी महिलेला बिहार राज्यातून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 16:32 IST

पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेऊन तिच्या ताब्यातून ३ महिन्याच्या लहान बाळाची सुखरूप सुटका करून गुन्ह्याची उकल केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) : ३ महिन्याच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या आरोपी महिलेला बिहार राज्यातून अटक केली आहे. सदर बालकाची सुखरूप सुटका करण्यात मांडवी पोलिसांना यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी व सपोनि शिवकुमार गायकवाड यांनी सोमवारी दिली आहे.

नालेश्वर नगर येथे राहणारे नबीउल्लाह चौधरी (३८) यांच्या ३ महिन्याच्या मुलाला १८ फेब्रुवारीला दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मेव्हण्याची पत्नी किताबुननिशा हिने खेळण्यासाठी बाहेर घेऊन जाते असे सांगून पळवून नेले होते. याप्रकरणी मांडवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी महिलेने आईच्या अंगावरील दुध पित असलेल्या ३ महिन्याच्या लहान बालकाचे अपहरण केले असल्याने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास अधिकारी व सपोनि बालाजी मुसळे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनि संदीप सावंत यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तपास सुरू केला. 

पोलीस पथकाने तपास करुन सदर महिला आरोपी बिहार राज्यातील नालंदा जिल्ह्यातील सरमेरा परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. प्राप्त माहितीच्या आधारे तपास टीम बिहारला गेली. नालंदा पोलीस घटकातील तांत्रिक विश्लेषण टिम आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने मांडवी पोलिसांनी बिहार झारखंड सीमावर्ती दुर्गम भागातील ग्राम सुर्यचक, मिरनगर, सरमेरा गावातील अनेक घरांत तपास करून महिला आरोपीचा शोध घेतला. आरोपी महिलेला ताब्यात घेऊन तिच्या ताब्यातून ३ महिन्याच्या लहान बाळाची सुखरूप सुटका करून गुन्ह्याची उकल केली. आरोपी महिलेला बिहार येथून ताब्यात घेऊन मांडवीला आणून अटक केले आहे.

पोलीस तपासात आरोपी महिलेचे लग्न झालेले असून तीला तीन अपत्य आहे. आरोपी महिलेचे सरमेरा गावातील एका पुरुषासोबत प्रेमसंबंध होते. तिला त्याच्यासोबत नव्याने संसार करायचा होता म्हणून तीने लग्न झाल्याचे व तीन अपत्याची माहिती प्रियकराला सांगितली नव्हती. आरोपी महिलेने प्रेम संबंधातून ती तिच्या प्रियकरापासून गरोदर असल्याची खोटी माहिती फोनद्वारे कळवायची. आरोपी महिलेच्या नणंदेचे ३ महिन्यांचे बालक हे तीचे व तिच्या प्रियकराचेच असल्याचे प्रियकरास व्हिडीओ कॉलद्वारे भासवत असायची. आरोपीला प्रियकरासोबत नव्याने संसार करण्याची इच्छा असल्याने तिच्या नणंदेच्या ३ महिन्यांच्या लहान बालकाचे अपहरण करून ती बालकासह बिहार येथे निघून गेल्याची हकीकत निष्पन्न झाली.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, अपर पोलीस आयुक्त दतात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, बोळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद सुर्वे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि बालाजी मुसळे व संदीप सावंत, पोलीस हवालदार राजेंद्र फड, नितीन गलांडे, गजानन गरिबे, विशाल भगत, जगदीश नाणेकर, अमोल साळुंखे आणि शितल बिराजदार यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी