शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
4
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
5
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
6
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
7
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
8
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
9
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
10
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
11
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
12
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
13
Video - "मी GPS लावला होता..."; हॉटेलमध्ये बायकोला रंगेहाथ पकडल्यावर ढसाढसा रडला नवरा
14
जागावाटपावरून महायुतीत तणाव! मुंबईत शिंदेसेनेला हव्यात १०० हून अधिक जागा, भाजपाचा प्लॅन बी तयार
15
वसंत मोरे मनसे कार्यालयात जाणार; ठाकरे बंधू युतीमुळे पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील रुसवे फुगवे दूर
16
IPL ऑक्शनच्या दिवशीच परफेक्ट ऑडिशन! व्यंकटेश अय्यरचा SMAT स्पर्धेतील टी-२० सामन्यात मोठा धमाका
17
पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदारांची नावं वगळली, SIRच्या मसुदा यादीतून धक्कादायक आकडेवारी समोर 
18
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
19
ICICI Prudential IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज अखेरची संधी; GMP ₹३०० च्या पार, धमाकेदार लिस्टिंगचे संकेत
20
पीएम नरेंद्र मोदी जॉर्डनच्या दौऱ्यावर; भारतासाठी का महत्वाचा आहे हा देश? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

आध्यात्माशिवाय आपले आणि देशाचे भले होणार नाही - मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 21:49 IST

देशाचे व आपले भले हे आध्यात्मा शिवाय होऊ शकत नाही. संतांचा उपदेश हा शासन यंत्रणेने व आपण सुध्दा ऐकला पाहिजे. संतांच्या मार्गदर्शना शिवाय काही होणार नाही. हळुहळु देशाची दिशा त्या मार्गावर वळत आहे.

मीरारोड - देशाचे व आपले भले हे आध्यात्माशिवाय होऊ शकत नाही. संतांचा उपदेश हा शासन यंत्रणेने व आपण सुध्दा ऐकला पाहिजे. संतांच्या मार्गदर्शना शिवाय काही होणार नाही. हळुहळु देशाची दिशा त्या मार्गावर वळत आहे. सर्वांनी मिळुन ती पुर्णपणे वळवावी लागेल. सर्वात आधी आपल्याला संतांच्या उपदेशांना आचरणात आणावे लागेल. शासन यंत्रणेचे पाऊल त्या दिशेने पडले आहे. आम्ही सुध्दा त्यासाठी प्रयत्न करत आहोत असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भार्इंदर येथे केले.भार्इंदरच्या बालाजी नगर येथे चातुर्मास साठी आलेले गच्छाधिपती आचार्य अभयदेवसुरीश्वरजी महाराज यांच्या दर्शनासाठी भागवत हे आले होते. यावेळी आचार्य मोक्षरत्न सुरीश्वरजी महाराज सुध्दा उपस्थित होते.आमच्या कार्यावर गुरदेव यांचे खुप स्रेह आणि आशिर्वाद आहेत. दरवर्षी असा योग जुळुन येतो आणि त्यांचा अशिर्वाद मिळतो. त्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहित. आपल्या देशाचे आणि आपले भले करायचे आहे तर आध्यात्माच्या आधारा शिावाय ती गोष्ट होऊ शकत नाही असे भागवत म्हणाले.आपण कितीही पैसा कमावला , कितीही साधन संपन्न झालो तरी जो पर्यंत आपल्या कडे सत्य व धर्म नाही तो पर्यंत आपण सुखी होऊ शकत नाही. जगात आणखी कोणी सुखी होत असेल तर गोष्ट वेगळी आहे. पण जगात दुसरं कोणी सुखी झाल्याचे दिसत नाही.अर्थ व काम याची पुर्ति होऊन सुध्दा जग दुखी आहे. आपल्या कडे सत्य व धर्म असल्याने कमतरता असली तरी सुखी असणारे लोक आहेत. त्यामुळे देशाची निती असेल, किंवा माझ्या परिवाराचे चलन असेल किंवा माझा स्वत:चा स्वभाव असेल त्याला आधार हा सत्य व धर्माचा आहे.सत्यला निरंतर संपर्कात ठेऊन त्याच्या प्रकाशात स्वत: चालणारे व आपल्याला चालवणारे संत असतात. संतांच्या मार्गदर्शना शिवाय काही होणार नाही. आनंदाची गोष्ट ही आहे की , हळुहळु देशाची दिशा त्या मार्गा कडे वळत आहे. सर्वांनी मिळुन देशाला पुर्णपणे त्या मार्गावर वळवावे लागेल. त्यामुळे सर्वात आधी आपल्याला संतांच्या उपदेशांना आचरणात आणावे लागेल.जिव हिंसा रोखण्याासाठी काही करणार असाल तर आपले जिवन आधी हिंसा मुक्त हवे.गाईसाठी काही करायचे तर गायचे संवर्धन व संरक्षण साठी काही करावे लागेल.कारण जे शासन तंत्र आहे तर पुर्णत: तसे बनलेले नाही. ते विपरीत गोष्टींसाठी बनले आहे. त्याला हळुहळु आपल्या सारखे करायचे आहे. शासन यंत्रणेत असणारयां पेक्षा त्याच्या बाहेर असतात त्यांचा दबाव वाढला तर तसे कार्य होते.संताचा उपदेश घेऊन, दिशा घेऊन जे शासन यंत्रणेत बसले आहेत ते त्यावर अमल करत आहेत. तो अमल हळुहळु होत आहे. संतांचा उपदेश शासन यंत्रणा व आपण पण ऐकला पाहिजे. सर्वच होत आहे असं नाही. आणि सर्व होईल असंही नाही. पण शासनाचे त्या दिशेने पाऊल पडले आहे.त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तुम्ही पण करा. आज संतांशी चर्चा झाली असता त्यांचे मन कळले. आता त्या दिशेने आम्ही पुढे जाऊ असे भागवत म्हणाले. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ