शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

अधिसूचनेशिवायच समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन, शेतकऱ्यांना गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 03:24 IST

समृद्धी महामार्गात जागा जाणाºया शेतकºयांना मोबदला चांगला मिळत असल्याने दलालांनी अनेक शेतकºयांना गंडा घालण्याचे काम केले आहे.

पंकज पाटीलअंबरनाथ : समृद्धी महामार्गाव्यतिरिक्त इतर कामासाठी भूसंपादन केले जाणार असून ती जागा नेमकी कोणती आहे, याची कल्पना केवळ अधिकारीवर्गालाच आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी दलालांची फळी पुढे करून शेतकºयांच्या जागा समृद्धी महामार्गात खरेदी करण्याचे काम सुरू केले. शेतकºयांनाही मोबदला चांगला मिळत असल्याने त्यांनी जागा देण्यासाठी दलाली देण्याची कबुली दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात ही जागा जाणारच आहे, याची कल्पना शेतकºयांना नसल्याने त्यांची दलालांमार्फत फसवणूक होत असल्याचा आरोप समृद्धीबाधित शेतकरी संघटनेने केला आहे.

समृद्धी महामार्गात जागा जाणाºया शेतकºयांना मोबदला चांगला मिळत असल्याने दलालांनी अनेक शेतकºयांना गंडा घालण्याचे काम केले आहे. समृद्धीच्या मूळ प्रस्तावासोबत इतर जागा समृद्धी महामार्गाच्या अनुषंगाने घेण्यात येणार आहे. मात्र, ती जागा नेमकी कोणती आहे, याची कल्पना शेतकºयांना नाही. याचे सर्व आराखडे अधिकाºयांकडे असल्याने जी जागा समृद्धीसाठी घेण्यात येणार आहे, त्या जागेच्या ठिकाणी असलेल्या शेतकºयांना फसवण्याचे काम दलालांनी सुरू केले आहे. शेतकºयांची जागा समृद्धीत जात असताना त्याच शेतकºयाला ती जागा समृद्धीमध्ये घेण्याचे आश्वासन दिले जात आहे. मुळात ती जागा जाणार आहे, याची कल्पना नसल्याने शेतकरी जागा यावी, यासाठी दलालांच्या आश्वासनांना बळी पडत आहेत. जागा गेल्यावर टक्केवारी ठरत असल्याने शेतकºयांच्या हक्काचे पैसे नाहक दलालीपोटी जात आहेत. मुळात शेतकºयांची जी जमीन जाणार आहे, त्या जागेचे नोटीफिकेशन तसेच त्याची प्रसिद्धी करणे गरजेचे आहे. तरच त्याची माहिती शेतकºयांना होईल. मात्र, नोटीफिकेशन न झाल्याने शेतकºयांना आपली जागा जात आहे, याची कल्पनाच नाही. याच संधीचा फायदा घेत अधिकाºयांनी नेमलेल्या दलालांमार्फत शेतकºयांसोबत परस्पर आर्थिक व्यवहार करून भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे. उशीद गावाच्या परिसरातील शेतकºयांना त्याचा फटका बसला आहे. उशीद गावातील अनेक शेतकºयांची जमीन जात असतानाही नोटीफिकेशन न काढताच भूसंपादनाची प्रक्रिया केल्याचा आरोप चंद्रकांत भोईर यांनी केला आहे.शेतकºयांना मोबदला वाढवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात दलालांनी दलाली लाटली आहे. भूसंपादन करताना शेतकºयांच्या शेतातील झाडांची संख्या आणि त्याचे मूल्य वाढवून घेण्याचे काम केले. सोबत, घर असलेल्या जागेवरील घरांचे मूल्य जास्त दाखवत शेतकºयांना पैसे देण्यात आले. मात्र, त्या पैशांतून दलाली लाटण्यात आली आहे. अधिकाºयांनी याच मार्गाने मोठी माया जमवल्याचा आरोप भोईर यांनी केला.यासंदर्भात शासनस्तरावर तक्रार केली आहे. जिल्हाधिकारी यांनी यासंदर्भात अधिकाºयांना ताकीद दिलेली होती. या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी भोईर यांनी केली. भूसंपादनाची जबाबदारी ही अधिकाºयांवर असल्याने थेट कोणताच व्यवहार अधिकाºयांसोबत झाला नाही. मात्र, अधिकाºयांनी नेमलेले दलाल हे गबर झाले आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी झाल्यास समृद्धीमध्ये सर्वाधिक लाभार्थी हे अधिकारी आणि दलाल असल्याचे चित्र त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गthaneठाणे