शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

आता तरी जाग येईल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 06:22 IST

रिक्षाचा प्रवास असुरक्षित; ‘त्या’ घटनेमुळे चिंतेचे वातावरण

- प्रशांत मानेकल्याण : रिक्षाचालकांची मुजोरी आणि मनमानी भाडेवसुलीच्या त्रासाला प्रवाशांना सामोरे जावे लागत असताना कल्याणमध्ये नुकतीच एक संतापजनक घटना घडली. रिक्षात बसलेल्या एका अल्पवयीन मुलीसोबत रिक्षाचालकाने अश्लील भाषेत बोलत घृणास्पद कृत्य केल्याचा प्रकार घडला आहे. एकीकडे अवैध रिक्षा चालवणाऱ्यांकडे वाहतूक प्रशासन यंत्रणेचे दुर्लक्ष झाले असताना नुकत्याच घडलेल्या प्रकारानंतर तरी संंबंधित यंत्रणेचे डोळे उघडतील का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

पश्चिमेत राहणारी १४ वर्षांची मुलगी शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर घरी परतत असताना एका रिक्षाचालकाने प्रवासादरम्यान तिच्याशी अश्लील कृत्य केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. त्यामुळे रिक्षाचा प्रवास असुरक्षित झाल्याचे पुन्हा उघड झाले आहे. रिक्षांची वाढती संख्या पाहता परवान्यांचे वाटप थांबवा, अशी मागणी रिक्षा संघटना सातत्याने करत आहे. रोजगाराचे कारण देत हे परवाने सरकारने सुरूच ठेवले असताना दुसरीकडे परवान्यांची ही खिरापत रिक्षा व्यवसायाच्या मुळावर उठली आहे.

कल्याण असो अथवा डोंबिवली, आज अनेक रिक्षा अवैध व्यवसाय करत आहेत. पासिंगविना त्या रस्त्यावर धावत आहेत. रिक्षा चालवणाºया चालकांकडे परवाना आणि बॅज असणे बंधनकारक आहे. काही रिक्षाचालक बॅज आणि परवाना नसलेल्या व्यक्तींना रिक्षा चालवायला अथवा भाड्याने देत आहेत. रिक्षाचा प्रवास असुरक्षित झाला असताना एका रिक्षाचालकाने अल्पवयीन शाळकरी मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार नुकताच घडला आहे.

पोलिसांकडून त्यांच्या स्तरावर कारवाई केली जाईल, पण अशाप्रकारच्या घटना होऊ नयेत म्हणून संबंधित प्रशासकीय यंत्रणा खबरदारी घेतील का? याबाबत सवाल उपस्थित होत आहे. अवैध रिक्षा व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केली जाते, असे दावे नेहमीच आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून केले जात असले तरी कल्याणमध्ये नुकत्याच घडलेल्या घटनेतून बोध घेऊन आता तरी संबंधित यंत्रणेने डोळसपणे कारवाई करावी,अशी मागणी होत आहे.

आरटीओ, वाहतूक शाखेचे होतेय अक्षम्य दुर्लक्ष

रिक्षाचालकांना गणवेश बंधनकारक आहे, पण आजच्या घडीला १५ ते १६ वर्षांची मुले बर्मुडा, हाफ पॅण्ट, टी-शर्ट अशा पेहरावात रिक्षा चालवताना दिसत आहेत. त्यातील अनेक जण गुटखा, मावा, मद्यपान, चरस आणि गांजाचे व्यसन करतात. रिक्षा स्टॅण्ड सोडून भाडे घेणे, उद्धट, उर्मट वागणूक त्याचबरोबर मनमानी भाडेआकारणीही त्यांच्याकडून केली जात असल्याचे चित्र कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये

बहुतांश ठिकाणी पाहायला मिळत आहे.

अशा वर्तणुकीमुळे प्रामाणिक व्यवसाय करणारा रिक्षाचालकही बदनाम होत आहे. याकडे आरटीओ आणि वाहतूक शाखेचे दुर्लक्ष होत असताना प्रवाशांना मारहाण करणे, एकट्या दुकट्या प्रवाशाला अज्ञात स्थळी नेऊन लुटणे असे प्रकार आधीही घडले आहेत. प्रवाशाजवळील मोबाइल, रोकड तसेच सोने चांदीचे दागिने लुबाडण्याच्या घटनाही सहप्रवाशाकडून रिक्षात घडल्या आहेत.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसPoliceपोलिस