शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

‘त्या’ ५७७ बोटींवर कारवाईचे धाडस तुम्ही दाखवणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 23:27 IST

संघटनांचा मत्स्यव्यवसाय आयुक्तांना सवाल : बंदी असतानाही मासेमारी

हितेन नाईक।

पालघर : राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने १ जूनपासून समुद्रात मासेमारीला बंदी घातली असतानाही समुद्रात मासेमारीसाठी बेकायदा राहणाऱ्या ५७७ मच्छीमार बोटींवर मत्स्यव्यवसाय आयुक्त राजीव जाधव कारवाईचे धाडस दाखवणार आहेत का? असा प्रश्न परंपरागत मच्छीमार व त्यांच्या संघटनांनी केला आहे.

जानेवारी ते मे यादरम्यान समुद्रात मत्स्यसाठ्याचे जतन व्हावे आणि मच्छीमारांची वित्त व जीविताची हानी होऊ नये, यासाठी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अंतर्गत १ जून ते ३१ जुलै असा ६१ दिवसांचा मासेमारी बंदी कालावधी जाहीर केला जातो. बंदी कालावधीत कुठल्याही प्रकारची मासेमारी होऊ नये, यासाठी मच्छीमार सहकारी संस्था, बोटमालक यांना कल्पना देत सर्व बंदरांत, मासे उतरविण्याच्या ठिकाणांवर गस्त घालण्याचे आदेश मत्स्यव्यवसाय विभागाचे कोकण विभाग, मुंबईचे प्रादेशिक उपायुक्त महेश देवरे यांनी १३ मे रोजी काढले होते. या आदेशाला न जुमानता पापलेटची लहान पिले पकडण्यासाठी वसई, उत्तन, सातपाटी, मुरबे येथील बोटी समुद्रात जातात.बंदी कालावधीत राज्याच्या १२ सागरी मैल समुद्राच्या परिसरात मासेमारी करणाºया बोटींना १ जूननंतर बंदरात मासे उतरविण्याची परवानगी असणार नाही व अशा बोटींवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे संबंधित बोटी ३१ मेपूर्वीच बंदरात पोहोचतील, अशा सूचना त्यांना देण्याचे आदेश आयुक्त जाधव यांनी दिले होते. बंदी कालावधीत संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात मासेमारी करणाºया बोटींद्वारे बेकायदा मासेमारी केली जाणार नाही तसेच मासेमारी बंदीचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश आयुक्त जाधव यांनी कोकणातील सर्व परवाना अधिकारी, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी यांना दिले होते. असे असताना उत्तन, वसई, पालघर तालुक्यातील काही बोटी १ ते ३ जूनदरम्यान समुद्रात मासेमारीसाठी तळ ठोकून राहिल्याचे निदर्शनास आले होते. ४ जूनला पालघर, ठाणे व कोकणात चक्रीवादळ धडकणार असल्याच्या सूचना देऊनही वसई (पाचूबंदर) येथील नाझरेस माऊली आणि दयावंत या दोन बोटी (बल्याव) समुद्रात होत्या. दुपारी चक्रीवादळाला सुरुवात झाल्यानंतर दैव बलवत्तर म्हणून त्या बचावल्या. या प्रकरणी मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाईचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यानुसार बोटींचा परवाना रद्द करण्यात येईल. तसेच व्हीआरसी रद्द, रा.स.वि.नी योजनेचा लाभ रद्द करण्यात येणार आहे.जिल्हाधिकाºयांनी १ जूनला घेतलेल्या पत्रकार परिषदेत ५७७ बोटी समुद्रात असल्याचे सांगितले होते. मात्र २ जूनपर्यंत समुद्रात १३ बोटी असल्याची माहिती पालघरचे मत्स्यव्यवसाय सहआयुक्त अजिंक्य पाटील यांनी दिली होती. मग असे असताना फक्त दोन बोटींवरच कारवाई का? असाही प्रश्न उपस्थित करून मत्स्यव्यवसाय विभागाच्या कारवाईबाबत साशंकता व्यक्त केली आहे.चोरट्या मार्गाने बोटी आल्या कशा?जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांनी आपल्या संस्थांतील एकही बोट ३१ मे पासून समुद्रात नसल्याचे लेखी लिहून दिले असताना, मासेमारी बंदी काळात चोरट्या मार्गाने बोटी आल्या कशा? असा प्रश्न जिल्हाधिकाºयांनी उपस्थित करून नाराजी व्यक्त केली होती. १ जूननंतर समुद्रात बेकायदा मासेमारी करणाºया बोटींवर कारवाई करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे बर्नल डिमेलो यांनी केली आहे. याबाबत आयुक्त राजीव जाधव यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही.

टॅग्स :thaneठाणेfishermanमच्छीमार