शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
4
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
5
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
6
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
7
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
8
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
9
दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
10
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
11
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
12
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
13
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
14
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
15
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
16
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
17
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
18
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
19
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
20
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ

‘त्या’ ५७७ बोटींवर कारवाईचे धाडस तुम्ही दाखवणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 23:27 IST

संघटनांचा मत्स्यव्यवसाय आयुक्तांना सवाल : बंदी असतानाही मासेमारी

हितेन नाईक।

पालघर : राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने १ जूनपासून समुद्रात मासेमारीला बंदी घातली असतानाही समुद्रात मासेमारीसाठी बेकायदा राहणाऱ्या ५७७ मच्छीमार बोटींवर मत्स्यव्यवसाय आयुक्त राजीव जाधव कारवाईचे धाडस दाखवणार आहेत का? असा प्रश्न परंपरागत मच्छीमार व त्यांच्या संघटनांनी केला आहे.

जानेवारी ते मे यादरम्यान समुद्रात मत्स्यसाठ्याचे जतन व्हावे आणि मच्छीमारांची वित्त व जीविताची हानी होऊ नये, यासाठी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अंतर्गत १ जून ते ३१ जुलै असा ६१ दिवसांचा मासेमारी बंदी कालावधी जाहीर केला जातो. बंदी कालावधीत कुठल्याही प्रकारची मासेमारी होऊ नये, यासाठी मच्छीमार सहकारी संस्था, बोटमालक यांना कल्पना देत सर्व बंदरांत, मासे उतरविण्याच्या ठिकाणांवर गस्त घालण्याचे आदेश मत्स्यव्यवसाय विभागाचे कोकण विभाग, मुंबईचे प्रादेशिक उपायुक्त महेश देवरे यांनी १३ मे रोजी काढले होते. या आदेशाला न जुमानता पापलेटची लहान पिले पकडण्यासाठी वसई, उत्तन, सातपाटी, मुरबे येथील बोटी समुद्रात जातात.बंदी कालावधीत राज्याच्या १२ सागरी मैल समुद्राच्या परिसरात मासेमारी करणाºया बोटींना १ जूननंतर बंदरात मासे उतरविण्याची परवानगी असणार नाही व अशा बोटींवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे संबंधित बोटी ३१ मेपूर्वीच बंदरात पोहोचतील, अशा सूचना त्यांना देण्याचे आदेश आयुक्त जाधव यांनी दिले होते. बंदी कालावधीत संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात मासेमारी करणाºया बोटींद्वारे बेकायदा मासेमारी केली जाणार नाही तसेच मासेमारी बंदीचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश आयुक्त जाधव यांनी कोकणातील सर्व परवाना अधिकारी, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी यांना दिले होते. असे असताना उत्तन, वसई, पालघर तालुक्यातील काही बोटी १ ते ३ जूनदरम्यान समुद्रात मासेमारीसाठी तळ ठोकून राहिल्याचे निदर्शनास आले होते. ४ जूनला पालघर, ठाणे व कोकणात चक्रीवादळ धडकणार असल्याच्या सूचना देऊनही वसई (पाचूबंदर) येथील नाझरेस माऊली आणि दयावंत या दोन बोटी (बल्याव) समुद्रात होत्या. दुपारी चक्रीवादळाला सुरुवात झाल्यानंतर दैव बलवत्तर म्हणून त्या बचावल्या. या प्रकरणी मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाईचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यानुसार बोटींचा परवाना रद्द करण्यात येईल. तसेच व्हीआरसी रद्द, रा.स.वि.नी योजनेचा लाभ रद्द करण्यात येणार आहे.जिल्हाधिकाºयांनी १ जूनला घेतलेल्या पत्रकार परिषदेत ५७७ बोटी समुद्रात असल्याचे सांगितले होते. मात्र २ जूनपर्यंत समुद्रात १३ बोटी असल्याची माहिती पालघरचे मत्स्यव्यवसाय सहआयुक्त अजिंक्य पाटील यांनी दिली होती. मग असे असताना फक्त दोन बोटींवरच कारवाई का? असाही प्रश्न उपस्थित करून मत्स्यव्यवसाय विभागाच्या कारवाईबाबत साशंकता व्यक्त केली आहे.चोरट्या मार्गाने बोटी आल्या कशा?जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांनी आपल्या संस्थांतील एकही बोट ३१ मे पासून समुद्रात नसल्याचे लेखी लिहून दिले असताना, मासेमारी बंदी काळात चोरट्या मार्गाने बोटी आल्या कशा? असा प्रश्न जिल्हाधिकाºयांनी उपस्थित करून नाराजी व्यक्त केली होती. १ जूननंतर समुद्रात बेकायदा मासेमारी करणाºया बोटींवर कारवाई करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे बर्नल डिमेलो यांनी केली आहे. याबाबत आयुक्त राजीव जाधव यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही.

टॅग्स :thaneठाणेfishermanमच्छीमार