शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

पापलेट नामशेष होणार?

By admin | Updated: April 25, 2016 02:56 IST

पालघर जिल्ह्यातील पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमाराना आर्थिक सुबत्ता देणारा पापलेट नामशेष होण्याची चिन्हे आहेत. पापलेट च्या मासेमारी साठी प्रसिद्ध असलेल्या

हितेन नाईक, पालघरपालघर जिल्ह्यातील पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमाराना आर्थिक सुबत्ता देणारा पापलेट नामशेष होण्याची चिन्हे आहेत. पापलेट च्या मासेमारी साठी प्रसिद्ध असलेल्या सातपाटी च्या दोन संस्थामध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत ३२४ टन ( ३ लाख २४ हजार किलो) पापलेटची आवक कमी झाली आहे. पालघर जिल्ह्यात ‘करल्या डोली’ द्वारे पापलेट च्या लहान पिल्लाची होणारी खुलेआम कत्तल हे या मागचे प्रमुख कारण असल्याचे माहित असूनही पालघर, वसई, उत्तन मधील काही मच्छीमारनी आता पासून पुन्हा करल्या डोलीच्या मच्छीमारीला मोठ्या प्रमाणात सुरु वात ही केली आहे.राज्याला ७२० किमी च विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला असून देशाला मत्स्य उत्पादनातून परकीय चलन मिळवून देणारा हा एक प्रमुख व्यवसाय आहे. परंतु मोठ्या यांत्रिकी, अद्ययावत सामुग्री युक्त नौकाद्वारे केली जाणारी अपरिमति मासेमारी, पर्ससीन जाळ्यांद्वारे होणारी विनाशकारी मासेमारी, रासायनिक करखान्यातून सोडण्यात येणारे प्रदूषित सांडपाणी, ओएनजीसी प्रकल्पातून होणारी तेल गळती, शासनाचे मच्छीमारांप्रति असलेले उदासीन धोरण इ.कारण मुळे मासेमारी व्यवसाय संपुष्टात येण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु झाली आहे.मागील अनेक वर्षा पासून राज्य शासनाने मासेमारी नियम अधिनियम १९८१ च्या अनुषंगाने १० जून ते १५ आॅगस्ट असा ६६ दिवसांचा पावसाळी मासेमारी बंदी कायदा घोषित करु न त्याची कडक अंमलबजावणी केल्याने मत्स्य प्रजनन आणि संवर्धन होवून मत्स्य उत्पादन समाधानकारक सुरु होते. परंतु अमर्याद व पर्ससीन सारख्या विनाशकारी मासेमारीमुळे दिवसेंदिवस मत्स्य उत्पादनात घट होऊ लागल्याने ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती संघ, पालघर यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील सर्व संस्थानी एकजूट दाखवित १५ मे पासून संपूर्ण मासेमारी बंद ठेवून मत्स्य प्रजनन आणि संवर्धनला हातभार लावला होता. हया मच्छीमारीच्या स्तुत्य उपक्र माला शासन स्तरावरून पाठिंबा मिळून पावसाळी मासेमरी बंदी कालावधीत मोठी वाढ होईल असे मच्छीमार संस्थाना अपेक्षित असतांना आताच्या राज्य शासना सह केंद्र शासनाने १ जून ते ३१ जुलै असा ६१ दिवसांचा कमी कालावधी जाहिर करून उलट मत्स्य उत्पादन घटविण्याचा विडा तर उचलला नाही ना? असा संतप्त सवाल मच्छीमारांमधून केला जात आहे.> १२ वर्षापासून सतत मोठ्या प्रमाणात या पापलेटच्या लहान पिल्लांची कत्तल होत असल्याने पापलेट या अत्यंत चविष्ट आणि एक्सपोर्ट होणाऱ््या हया माशाच्या उत्पादनाची घसरण मोठ्या वेगाने सुरु झाली आहे. च्समुद्री मात्स्यकी संशोधन केंद्र, मुंबई यांनी याबाबत मच्छीमारा मध्ये जनजागृति करून तुम्हाला चांगली आर्थिक सुबत्ता मिळवून देणाऱ्या या पापलेटला नामशेष करू नका असे अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून समजावून सांगूनही मच्छीमारांच्या मासेमारी पद्धतीमधे कुठलाही बदल झाल्याचे दिसून येत नाही. > २५ ग्रॅमच्या लहान पिलांच्या ५० किलो टपची विक्री अवघ्या २ ते ३ हजार रु पयात सध्या होत आहे. याच लहान पापलेटची वाढ पावसाळ्यानंतर चांगली होऊन मच्छीमारांना याच पापलेटचे ५० ते ५५ हजारांचे उत्पन मिळू शकते. अधिक पैशांच्या हव्यासापोटी आपण आपलेच नुकसान करत आहोत हे त्यांच्या लक्षात येऊनही ही मासेमारी थांबविण्याच्या दृष्टीने ते पावले उचलत नाहीत. चार महिन्यांपासून सातपाटीतील दोन्ही सहकारी संस्थेच्या खात्यावर पापलेट विक्र ीसाठी एकही साठा न आल्याने खरेदीसाठी लाखो रु पये अनामत रक्कम ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांनी ही अनामत काढून घेतल्याचे सर्वोदय संस्थेचे चेअरमन सुरेश म्हात्रे यानि सांगितले. हे रोखण्यास शासन आणि संबंधित सहकारी संस्था, संघटना प्रयत्न करूनही अपयशी ठरत आहेत.> अर्नाळा, वसई, उत्तन इ. भागातील मच्छीमार मोठ्या प्रमाणात करल्या डोलीचीच मासेमरी करतात. यांच्या डोलीचे आस हे दिवसें दिवस कमी होऊ लागल्याने आणि काही मच्छीमारानी दोन डोलीनची एक डोल बनविल्याने लहान पापलेटची शिकार या मासेमरी पद्धतीने मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. त्यामुळे १ एप्रिल पासून पुन्हा पालघर आणि वसई तालुक्यासह उत्तनमध्ये मोठ्या प्रमाणात पापलेटच्या लहान पिलांची बेछूट कत्तल सुरु झाली आहे. > वसई, पालघरमधील मच्छीमारानी ब्रिडिंग पिरियडमध्ये पापलेटच्या पिल्लांची मासेमारी केल्याने त्यांचेच नुकसान होते. थोडे थांबल्यास मोठे उत्पन मिळू शकते. मात्र काही मच्छीमार एकत नाहीत. - बी.पुरुषोत्तमा, शास्त्रज्ञ मात्स्यकी संशोधन केंद्र, मुंबई.