शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

दुर्घटनाग्रस्त पारस इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी पुढाकार घेणार; पप्पु कलानी धावले रहिवाश्यांच्या मदतीला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 17:48 IST

उल्हासनगर कॅम्प नं-५ कुलदेवी मंदिरासमोरील पाच मजली पारस इमारतीमधील प्लॅट नं-५०३ चा स्लॅब चौथ्या मजल्यावर पडून आकाश पोपटानी या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला.

उल्हासनगर- पप्पु कलानी यांनी आज कॅम्प नं-५ गांधी रोड कुलदेवी मंदिरासमोरील पारस इमारतीच्या दूर्घटनेत मृत्यू झालेल्या आकाश पोपटानी यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी इमारतीतील बेघर झालेल्या नागरिकांसोबततही सवांद साधत इमारतीच्या पुनर्बांधणीचे आश्वासन दिले आहे. यावेळी त्यांचे समर्थकही त्यांच्यासोबत होते.

उल्हासनगर कॅम्प नं-५ कुलदेवी मंदिरासमोरील पाच मजली पारस इमारतीमधील प्लॅट नं-५०३ चा स्लॅब चौथ्या मजल्यावर पडून आकाश पोपटानी या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली होती. या घटनेमुळे इमारतीमधील नागरिकांत भितीचे वातावरण आहे. राजकीय नेत्यांसह महापालिका अधिकारी, आमदार बालाजी किणीकर, खासदार श्रीकांत शिंदे यांनी दुर्घटनाग्रस्त पारस इमारतीला भेट देऊन शासनस्तरावर मदत करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान माजी आमदार पप्पु कलानी यांनी समर्थकांसह पारस इमारतीला भेट देऊन दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आकाश पोपटानी यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. तसेच रहिवाशांना इमारतीच्या पुनर्बांधणीचे आश्वासन देऊन दिलासा दिला. 

शहरात एका वर्षात अनेक इमारतीचे स्लॅब पडून हजारो जण बेघर झाले. तर दोन इमारतीच्या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला असून राज्य शासनाने अद्यापही मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई दिली नसल्याची टीका शहरातून होत आहे. महापालिकेने सुरक्षेचा उपाय म्हणून ज्या इमारतीचे स्लॅब पडले, त्या इमारती खाली केल्याने, हजारो नागरिक बेघर झाले. यांपैकी अनेकांनी नातेवाईकांचा आश्रय घेतला आहे. तर इतरांनी भाड्याच्या खोल्यात जाणे पसंत केले. इमारतीची पुनर्बांधणी होऊन हक्काचे घर मिळेल, या आशेवर हजारो नागरिकांची नजर शासन व महापालिकेच्या धोरणाकडे लागली आहे. महापालिकेने सुरक्षेचा उपाय म्हणून १० वर्ष जुन्या हजारो इमारतीला नोटीस पाठवून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास बजावले आहे. 

कलानीवर नागरिकांनी दाखवला विश्वास -पप्पु कलानी यांनी दुर्घटनाग्रस्त पारस इमारतीची पाहणी करून इमारतीमधील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी कलानी यांनी इमारतीच्या पुनर्बांधणीचे आश्वासन दिल्यावर, राहिवाश्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच पप्पु कलानी यांच्या शब्दावर आमचा विश्वास असल्याची प्रतिक्रियाही रहिवाशांनी दिली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरBuilding Collapseइमारत दुर्घटना