शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पर्यवेक्षकाच्या चुकीने आयटीआयच्या ३० विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:58 IST

पुनर्मूल्यांकन करणार : महाविद्यालय प्रशासनाचा दावा

ठाणे : वागळे इस्टेट येथील आयटीआय परीक्षेदरम्यान चुकीचे मार्गदर्शन केल्याने एकाचवेळी ३० विद्यार्थ्यांना शून्य गुण देण्यात आले. त्यामुळे अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी मनविसेकडे धाव घेताच त्यांनी तत्काळ आयटीआय महाविद्यालयावर धडक देऊन प्रशासनाला धारेवर धरले. त्यामुळे महाविद्यालय प्रशासन ताळ्यावर आले असून त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणाचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही. याबाबत महाविद्यालय प्रशासन काळजी घेणार असून या प्रकाराला जबाबदार शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी मनविसेने केली आहे.

अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा अर्थात आयटीआयच्या माध्यमातून जुलै २०१९ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल ८ डिसेंबर रोजी आॅनलाइन घोषित करण्यात आला. प्रथम वर्ष वर्गातील विद्यार्थ्यांच्या या वार्षिक परीक्षेत टर्नर व फिटर प्रवर्गांतील तब्बल ३४ जणांना शून्य गुण देण्यात आले. याबाबत विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधला, तेव्हा परीक्षेदरम्यान वर्गात पर्यवेक्षक असलेल्या मुरलीधर सरवदे या शिक्षकाने उत्तरपत्रिकेवर लिहिली जाणारी माहिती चुकीची सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असल्याचे मनविसे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी सांगितले. पाचंगे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहराध्यक्ष किरण पाटील, सचिव सचिन सरोदे यांनी महाविद्यालय प्रशासनाची भेट घेतली. त्यांना धारेवर धरून जाब विचारला.

प्रशासनानेही मनविसेच्या पदाधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेऊन याप्रकरणी आयटीआयचे प्राचार्य एस.एम. अंबाळकर यांना लेखी निवेदन दिले. वरिष्ठ पातळीवर याबाबत दखल घेऊन कार्यवाही करण्याचे आदेश दिले. यावेळी उपविभाग अध्यक्ष विनोद भुवड, मनविसे उपविभागाध्यक्ष गणेश शेलार, प्रसाद होडे, शाखाध्यक्ष संदीप पवार, उपशाखाध्यक्ष प्रवीण जाधव व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.‘पर्यवेक्षकाकडून आम्हाला चुकीचे मार्गदर्शन’आम्हाला पर्यवेक्षकाकडून चुकीचे मार्गदर्शन करण्यात आले. परंतु, शिक्षक विद्यार्थ्यांवर खापर फोडत असल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. तर, विद्यार्थ्यांना जेव्हा चूक समजली, तेव्हा त्यांनी तत्काळ सांगायला हवी होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचीदेखील चूक आहे, अशी सारवासारव प्राचार्य अंबाळकर यांनी केली. तरीही, आम्ही वरिष्ठ पातळीवर पुनर्मूल्यांकनाची मागणी केली असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :MNSमनसे