शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

माझ्या मुलीच्या मृत्यूनंतर तरी जाग येणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 00:53 IST

चार्मीच्या आईचा रेल्वेला सवाल : लेडिज स्पेशल, कल्याण-वाशी, पनवेल लोकलची मागणी

अनिकेत घमंडी ।लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : लोकलमधील गर्दीची माझी मुलगी बळी ठरली आहे. माझ्यावर ओढवलेला प्रसंग यापुढे कुठल्याही मातापित्यावर येऊ नये. या अपघातानंतर तरी रेल्वेला जाग येणार का? असा संतप्त सवाल रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या चार्मीची आई चंद्रिका पासड यांनी केला. आमचे नुकसान कधीही भरून निघणार नाही. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कल्याण-वाशी, कल्याण-पनवेल या मार्गांवर लोकल सुरू कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.अनेक वर्षांपासून डोंबिवलीतून जादा लोकलची मागणी रेल्वे प्रशासन, लोकप्रतिनिधींकडे केली जात होती. मात्र, या मागणीला नेहमीच केराची टोपली दाखवली जात असल्यामुळेच आमची मुलगी गमावल्याचा आक्रोश चंद्रिका यांनी केला. चार्मीच्या मृत्यूची दखल रेल्वेने घेतली असली, तरी डोंबिवली स्थानकातून महिला विशेष लोकल सोडण्यात येईल, तेव्हाच आमचे समाधान होईल. महिला प्रवाशांची संख्या वाढत आहे. रोजच कुठेना कुठे गर्दीमुळे अपघात होऊ न जखमी किंवा मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. महिलांसाठी प्रथम श्रेणी पकडून चारच डबे आहेत. ही एक प्रकारे थट्टाच आहे, असे त्या म्हणाल्या. मुलगी घरी आलेली पाहिल्याशिवाय आम्ही जेवत नव्हतो. आता आमच्या घशाखाली घासही उतरत नाही, असे सांगताना पासड यांना रडू कोसळले.जेव्हा ब्रिटिशांनी रेल्वे सुरू केली, तेव्हा महिलांसाठी एखादाच डबा असे. मात्र, १०० वर्षांनंतरही त्यांचे अवघे दोनतीनच डबे झाले. पूर्वी महिला नोकरी, शिक्षणासाठी फार दूर जात नव्हत्या. पण, आता परिस्थिती बदलली आहे. लाखोंच्या संख्येने महिला घराबाहेर पडतात, याचा विचार रेल्वे करणार आहे की नाही? रेल्वेने महिला डबे वाढवायला हवेत, जेणेकरून कुणाला आपली मुलगी, बहीण गमवावी लागणार नाही.- मेहुल पासड, चार्मीचा भाऊशिवसेनेकडून सांत्वनशिवसेनेचे शहरप्रमुख राजेश मोरे यांनी बुधवारी पासड कुटुंबीयांची भेट घेऊ न त्यांचे सांत्वन केले. त्यावेळी नवनीतनगर येथील पासड यांच्या घरी गुजराती समाजाचे जयंती गड्डा, कमलेश शहा, बब्बूभाई शहा, भावेश शहा, अमोल पाटील आदी उपस्थित होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, गृहमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे महिला विशेष लोकल, १५ डब्यांची लोकल आदी मागण्या कराव्यात, अशी मागणी चार्मीच्या कुटुंबीयांनी यावेळी केली.अपघात झाल्यापासून चार्मीचा फोटो छातीला कवटाळून त्या सांत्वनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला माझ्या मुलीचा काय दोष होता, असा सवाल करत आहेत. हसतमुख कामावर गेलेल्या चार्मीच्या मृत्यूनंतर आनंदाने भरलेले आमचे कुटुंब दु:खात बुडाले आहे. रेल्वे प्रशासनाने चार्मीच्या कुटुंबीयांना दिलासा द्यावा, असे मत रीटा मारू, जयंती गड्डा, कमलेश शहा यांनी व्यक्त केले.