शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

माझ्या मुलीच्या मृत्यूनंतर तरी जाग येणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 00:53 IST

चार्मीच्या आईचा रेल्वेला सवाल : लेडिज स्पेशल, कल्याण-वाशी, पनवेल लोकलची मागणी

अनिकेत घमंडी ।लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : लोकलमधील गर्दीची माझी मुलगी बळी ठरली आहे. माझ्यावर ओढवलेला प्रसंग यापुढे कुठल्याही मातापित्यावर येऊ नये. या अपघातानंतर तरी रेल्वेला जाग येणार का? असा संतप्त सवाल रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या चार्मीची आई चंद्रिका पासड यांनी केला. आमचे नुकसान कधीही भरून निघणार नाही. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कल्याण-वाशी, कल्याण-पनवेल या मार्गांवर लोकल सुरू कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.अनेक वर्षांपासून डोंबिवलीतून जादा लोकलची मागणी रेल्वे प्रशासन, लोकप्रतिनिधींकडे केली जात होती. मात्र, या मागणीला नेहमीच केराची टोपली दाखवली जात असल्यामुळेच आमची मुलगी गमावल्याचा आक्रोश चंद्रिका यांनी केला. चार्मीच्या मृत्यूची दखल रेल्वेने घेतली असली, तरी डोंबिवली स्थानकातून महिला विशेष लोकल सोडण्यात येईल, तेव्हाच आमचे समाधान होईल. महिला प्रवाशांची संख्या वाढत आहे. रोजच कुठेना कुठे गर्दीमुळे अपघात होऊ न जखमी किंवा मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. महिलांसाठी प्रथम श्रेणी पकडून चारच डबे आहेत. ही एक प्रकारे थट्टाच आहे, असे त्या म्हणाल्या. मुलगी घरी आलेली पाहिल्याशिवाय आम्ही जेवत नव्हतो. आता आमच्या घशाखाली घासही उतरत नाही, असे सांगताना पासड यांना रडू कोसळले.जेव्हा ब्रिटिशांनी रेल्वे सुरू केली, तेव्हा महिलांसाठी एखादाच डबा असे. मात्र, १०० वर्षांनंतरही त्यांचे अवघे दोनतीनच डबे झाले. पूर्वी महिला नोकरी, शिक्षणासाठी फार दूर जात नव्हत्या. पण, आता परिस्थिती बदलली आहे. लाखोंच्या संख्येने महिला घराबाहेर पडतात, याचा विचार रेल्वे करणार आहे की नाही? रेल्वेने महिला डबे वाढवायला हवेत, जेणेकरून कुणाला आपली मुलगी, बहीण गमवावी लागणार नाही.- मेहुल पासड, चार्मीचा भाऊशिवसेनेकडून सांत्वनशिवसेनेचे शहरप्रमुख राजेश मोरे यांनी बुधवारी पासड कुटुंबीयांची भेट घेऊ न त्यांचे सांत्वन केले. त्यावेळी नवनीतनगर येथील पासड यांच्या घरी गुजराती समाजाचे जयंती गड्डा, कमलेश शहा, बब्बूभाई शहा, भावेश शहा, अमोल पाटील आदी उपस्थित होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, गृहमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे महिला विशेष लोकल, १५ डब्यांची लोकल आदी मागण्या कराव्यात, अशी मागणी चार्मीच्या कुटुंबीयांनी यावेळी केली.अपघात झाल्यापासून चार्मीचा फोटो छातीला कवटाळून त्या सांत्वनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला माझ्या मुलीचा काय दोष होता, असा सवाल करत आहेत. हसतमुख कामावर गेलेल्या चार्मीच्या मृत्यूनंतर आनंदाने भरलेले आमचे कुटुंब दु:खात बुडाले आहे. रेल्वे प्रशासनाने चार्मीच्या कुटुंबीयांना दिलासा द्यावा, असे मत रीटा मारू, जयंती गड्डा, कमलेश शहा यांनी व्यक्त केले.